शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

चळवळीतून साहित्याची निर्मिती

By admin | Updated: January 19, 2016 01:39 IST

चळवळी याच साहित्यनिर्मितीचा आधार असतात. पण, या दोन्ही वाटा आता वेगवेगळ्या दिशेने चालल्या आहेत. सर्वांना मिळुन जातीविहीन समाज निर्माण करायचा आहे

प्रज्ञा केळकर-सिंग, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)चळवळी याच साहित्यनिर्मितीचा आधार असतात. पण, या दोन्ही वाटा आता वेगवेगळ्या दिशेने चालल्या आहेत. सर्वांना मिळुन जातीविहीन समाज निर्माण करायचा आहे. त्यामुळे दलित आणि ग्रामीण साहित्य असा भेदाभेद न करता, सर्वांनी मिळुन साहित्याची चळवळ पुढे घेऊन जाण्याची गरज आहे.सर्वसमावेशक विकास समाजाला एकत्र आणेल आणि त्यातुन सकस साहित्यनिर्मिती होइल, असा आशावाद परिसंवादामध्ये वक्तांनी व्यक्त केला. येथील ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये बदलते सामाजिक-राजकीय अस्तित्व आणि दलित व ग्रामीण साहित्य या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. दत्ता भगत अध्यक्षस्थानी होते.परिसंवादात अतुल लोंढे, प्रकाश खरात, डॉ. रा.रं.बोराडे, प्रा. शेषराव मोहिते, विनय कोरे, शेखर गायकवाड आदिंनी सहभाग नोंदवला. सर्वांनी सहित्य संमेलनाच्या नियोजनाचे भरभरुन कौतुक केले. या संमेलनाने यापुढील संमेलनांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे, असेही मत या वेळी मांडण्यात आले.खरात म्हणाले, ‘‘ नकार, विद्रोह आणि मानवता ही दलित सहित्याची त्रिसुत्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजात अभुतपुर्व जाग्रुती केली. मात्र, आता जीवनचे संदर्भ बदलले आहेत. दलित साहित्याच्या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.मोहिते म्हणाले, ‘‘ अर्थकारण हा सामाजिक आणि राजकीय बदलाचा पाया आहे. सकारात्मक राजकीय परिवर्तनाचा लाभ केवळ शहरी भागाला झाला. ग्रामीण भागाला मात्र जाणीवपुर्वक वंचित ठेवण्यात आले आहे. शेतक- यांच्या आत्महत्याकडे अत्यंत असंवेदनशीलतेने पाहिले जाते. हे सर्व चित्र ग्रामीण साहित्यामध्ये पहायला मिळते.आजकाल दलित साहित्यिक स्वतला दलित म्हणवून घेत नाहीत. दुसरीकडे या साहित्यिकांना एका चौकटीत बसवण्याचे, त्यांची अवहेलना करण्याचे काम समाजाकडुन केले जाते. शेखर गायकवाड म्हणाले, प्रशासकीय काम करताना ग्रामीण जीवनाचे अनेक पदर अनुभवायला मिळतात. वास्तव,भाषा, संस्कृती झपाट्याने बदलत आहे. या बदलाचे प्रतिबिंब साहित्यावर पडायला हवे.कोरे म्हणाले, ‘‘ समाजरचना बदलण्याचे काम सहकार चळवळीने केले. मात्र, या चळवळीवर सकारात्मक पद्धथीने झालेले लिखाण अपवादात्मक रितीनेच पहायला मिळेल. बदलती सामाजिक, राजकीय व्यवस्था लक्षात घेता भविष्यात साहित्यिकांना मोठे योगदान द्यावे लागणार आहे.भगत यांनी समाजातील बदलावर नेमके भाष्य केले. ते म्हणाले, समाज बदलत आहे. माणुस नव्याने विचार करु लागला आहे. आता यापुढे जाउन जातीभेद नष्ट करण्याची, त्यासाठी साहित्यातुन जाग्रुती करण्याची गरज आहे. वैज्ञानिक आव्हाने पेलण्याचे बौध्दिक सामर्थ्य समाजात निर्माण करण्याची गरज आहे. पुरुषोत्तम काळे यांनी सूत्रसंचालन केले.