शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

चळवळीतून साहित्याची निर्मिती

By admin | Updated: January 19, 2016 01:39 IST

चळवळी याच साहित्यनिर्मितीचा आधार असतात. पण, या दोन्ही वाटा आता वेगवेगळ्या दिशेने चालल्या आहेत. सर्वांना मिळुन जातीविहीन समाज निर्माण करायचा आहे

प्रज्ञा केळकर-सिंग, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)चळवळी याच साहित्यनिर्मितीचा आधार असतात. पण, या दोन्ही वाटा आता वेगवेगळ्या दिशेने चालल्या आहेत. सर्वांना मिळुन जातीविहीन समाज निर्माण करायचा आहे. त्यामुळे दलित आणि ग्रामीण साहित्य असा भेदाभेद न करता, सर्वांनी मिळुन साहित्याची चळवळ पुढे घेऊन जाण्याची गरज आहे.सर्वसमावेशक विकास समाजाला एकत्र आणेल आणि त्यातुन सकस साहित्यनिर्मिती होइल, असा आशावाद परिसंवादामध्ये वक्तांनी व्यक्त केला. येथील ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये बदलते सामाजिक-राजकीय अस्तित्व आणि दलित व ग्रामीण साहित्य या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. दत्ता भगत अध्यक्षस्थानी होते.परिसंवादात अतुल लोंढे, प्रकाश खरात, डॉ. रा.रं.बोराडे, प्रा. शेषराव मोहिते, विनय कोरे, शेखर गायकवाड आदिंनी सहभाग नोंदवला. सर्वांनी सहित्य संमेलनाच्या नियोजनाचे भरभरुन कौतुक केले. या संमेलनाने यापुढील संमेलनांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे, असेही मत या वेळी मांडण्यात आले.खरात म्हणाले, ‘‘ नकार, विद्रोह आणि मानवता ही दलित सहित्याची त्रिसुत्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजात अभुतपुर्व जाग्रुती केली. मात्र, आता जीवनचे संदर्भ बदलले आहेत. दलित साहित्याच्या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.मोहिते म्हणाले, ‘‘ अर्थकारण हा सामाजिक आणि राजकीय बदलाचा पाया आहे. सकारात्मक राजकीय परिवर्तनाचा लाभ केवळ शहरी भागाला झाला. ग्रामीण भागाला मात्र जाणीवपुर्वक वंचित ठेवण्यात आले आहे. शेतक- यांच्या आत्महत्याकडे अत्यंत असंवेदनशीलतेने पाहिले जाते. हे सर्व चित्र ग्रामीण साहित्यामध्ये पहायला मिळते.आजकाल दलित साहित्यिक स्वतला दलित म्हणवून घेत नाहीत. दुसरीकडे या साहित्यिकांना एका चौकटीत बसवण्याचे, त्यांची अवहेलना करण्याचे काम समाजाकडुन केले जाते. शेखर गायकवाड म्हणाले, प्रशासकीय काम करताना ग्रामीण जीवनाचे अनेक पदर अनुभवायला मिळतात. वास्तव,भाषा, संस्कृती झपाट्याने बदलत आहे. या बदलाचे प्रतिबिंब साहित्यावर पडायला हवे.कोरे म्हणाले, ‘‘ समाजरचना बदलण्याचे काम सहकार चळवळीने केले. मात्र, या चळवळीवर सकारात्मक पद्धथीने झालेले लिखाण अपवादात्मक रितीनेच पहायला मिळेल. बदलती सामाजिक, राजकीय व्यवस्था लक्षात घेता भविष्यात साहित्यिकांना मोठे योगदान द्यावे लागणार आहे.भगत यांनी समाजातील बदलावर नेमके भाष्य केले. ते म्हणाले, समाज बदलत आहे. माणुस नव्याने विचार करु लागला आहे. आता यापुढे जाउन जातीभेद नष्ट करण्याची, त्यासाठी साहित्यातुन जाग्रुती करण्याची गरज आहे. वैज्ञानिक आव्हाने पेलण्याचे बौध्दिक सामर्थ्य समाजात निर्माण करण्याची गरज आहे. पुरुषोत्तम काळे यांनी सूत्रसंचालन केले.