शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

जैविक कीड नियंत्रक प्रयोगशाळेत प्रथमच द्रव खत निर्मिती

By admin | Updated: September 23, 2016 17:12 IST

रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात येत आहे.त्यामुळे जमिनीचा नैसर्गिक पोत कायम ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर बुलडाणा येथील कृषी विभागाच्या

- नीलेश शहाकार/ ऑनलाइन लोकमत
 
बुलडाणा, दि. 23 -   रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात येत आहे.त्यामुळे जमिनीचा नैसर्गिक पोत कायम ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर बुलडाणा येथील कृषी विभागाच्या जैविक कीड नियंत्रक प्रयोगशाळेत यावर्षी प्रथमच जैविक द्रवरुप खत निर्मिती होत आहे. रब्बीपुर्व बुलडाणा जिल्ह्याने ५ हजार लिटरचे जैविक खत निर्मितीचे उद्दीष्ट ठेवले आहे.   
या किड नियंत्रक प्रयोगशाळेत रायझोबियम, अझोटोबॅक्टर व पि.एस.बी ही जैविक खते किंवा जिवाणू संवर्धने खरीपासाठी तयार करण्याचे निश्चित झाले. तर यंदा रब्बीसाठी यात केएनबी व एनपीके (नत्र, स्फु रद, पलाश) वाढविणारे दोन संवर्धने तयार करण्याचे ठरविण्यात आले. सद्या जिल्हा कृषी विभाग जिल्ह्यातील रब्बी हंगामाच्या तयारीत असून प्रयोगशाळेत तयार होणारी ही औषध शेतक-यांना फायदेशिर ठरणार आहे.
किड व पिकांनामर रोगामुळे गत चार वर्षात शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान होवून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर जैविक खताचा वापर प्रभावी उपाय असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने जैविक खत निर्मिती करण्यासाठी लक्ष केंद्रीत केले. राज्यातील कृषी विभागाच्या अख्यारित्या असलेल्या जैविक किड नियंत्रक प्रयोगशाळेत जैविक खत निर्मितीचे ठरविण्यात आले.
 
जिल्ह्यातील २० हजार शेतक-यांना लाभ
जैविक खत निर्मिती प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कृषी विभागाने आवाहन केले होते. रायझोबियम हे जिवाणू संवर्धन सोयाबिन, उडीद, मूग, तूर, चवळी, अझोटोबॅक्ट हे जिवाणू संवर्धन कापूस, ज्वारी, मका, बाजारी व पि.एस.बी हे सर्व पिकांसाठी उपयुक्त असून उत्पन्नात १५ टक्के वाढ करण्यास सक्षम आहे.यामुळे जिल्ह्यातील २० हजार शेतक-यांनी जैविक खताचा लाभ घेतला आहे.