शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

इतिवृत्त बनविण्याची कार्यवाही थांबली!

By admin | Updated: July 19, 2016 02:14 IST

मानोरा नगर पंचायतमध्ये कर्मचा-यांची वानवा, जिल्हाधिका-यांकडे नगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाढा.

वाशिम : मानोरा नगर पंचायतला कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने आणि कर्मचार्‍यांची वानवा असल्याने सभेचे इतवृत्त बनविण्याची कार्यवाही थांबली आहे. यासंदर्भात नगराध्यक्षांसह पदाधिकार्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन देत नगर पंचायतच्या समस्यांचा पाढा वाचला.१७ जुलै २0१५ रोजी मानोरा ग्रामपंचायत विसजिर्त करून नगर पंचायतला मान्यता देण्यात आली. १७ जुलै २0१६ रोजी मानोरा नगर पंचायतला एक वर्षे पूर्ण झाले. मात्र, विकास कामे ठप्प आहेत. मानोरा शहरात विविध विकासात्मक कामे, नियमित स्वच्छता, पाणीपुरवठा आदी कामे सुरळीत होण्यासाठी नगर पंचायतला आवश्यक ते मनुष्यबळ आणि कायमस्वरूपी मुख्याधिकारी अद्यापही मिळाले नाही. प्रभारी मुख्याधिकारी मानोरा येथे येत नसल्याने विकासात्मक कामांना बाधा निर्माण झाली. नगर पंचायत सभेचे कामकाज करण्याकरिता सचिव म्हणून कोणीही नसल्यामुळे सभा कशा पद्धतीने घ्याव्या? असा प्रश्न नगर पंचायत अध्यक्षांसह पदाधिकार्‍यांसमोर निर्माण झाला. सभेचे इतवृत्त लिहिण्यास कोणीही नाही. बजेटची सभा झाली. परंतु आजपर्यंतही इतवृत्त बनविले नाही. शहराचा विकास करण्याकरिता ह्यडीपीआरह्ण तयार करुन त्याची मंजुरी जिल्हाधिकार्‍यांकडून घेणे आवश्यक आहे. सदर कामदेखील अद्यापपर्यंत झाले नाही. अधिकारी व कर्मचारी कायमस्वरुपी नसल्याने आणि प्रभारी कर्मचारी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने सभेचे इतवृत्त बनविण्याची कार्यवाही थांबली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी पदाधिकार्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली.