शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

प्रियंका राऊतनं संघर्षग्रस्त परिस्थितीत मिळवले 77 टक्के

By admin | Updated: May 25, 2016 19:34 IST

विद्यार्थिनी प्रियंका संतोष राऊत हिच्या संघर्षग्रस्त प्रवासातील एका टप्प्यावर बुधवारी यशाची मोहोर उमटली.

राकेश घानोडे

नागपूर, दि. 25 -  पालकांची शिकविण्याची क्षमता नसतानाही जीवन फुलविण्याच्या मार्गावर चालत सुटलेली आर. एस. मुंडले धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका संतोष राऊत हिच्या संघर्षग्रस्त प्रवासातील एका टप्प्यावर बुधवारी यशाची मोहोर उमटली. प्रियंकाने इयत्ता बारावीची परीक्षा ७० टक्के गुणांसह उत्तीर्ण केली. यापुढे ती बी.ए. पदवीला प्रवेश घेणार असून त्यानंतर स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचे तिचे लक्ष्य आहे. प्रियंका कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेत आहे हे पाहिल्यास, तिला सलाम करण्यासाठी हात आपोआपच वर उठतात.प्रियंकाचे वडील मोटरसायकल दुरुस्तीचे, तर आई घरकाम करते. त्यांना प्रियंकासह एकूण सहा मुली आहेत. प्रियंका दुसऱ्या क्रमांकाचे अपत्य. आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे तिच्या मोठ्या बहिणीचे शिक्षण दहावीपूर्वीच सुटले. दोन बहिणी शिक्षणासाठी मामाकडे राहात आहेत. प्रियंकाचे वडील मूळचे गोंदिया जिल्ह्यातील. उदरनिर्वाहासाठी नागपुरात आल्यानंतर काही दिवसांनी ते मूळ गावात परत गेले. त्यावेळी प्रियंका दहावीला होती. तिला कोणत्याही परिस्थितीत शिक्षण सुरूच ठेवायचे होते. परिचितांनी मदत केल्यामुळे ती बाजारगावातील आश्रमशाळेत राहिली. तेथून तिने दहावीची परीक्षा ७२ टक्के गुणांसह उत्तीर्ण केली. आश्रमशाळेत ती ह्यटॉपरह्ण होती. यानंतर पुढील शिक्षणासाठी तिला भावणा जैन यांनी सहकार्य केले. इयत्ता अकरावी पूर्ण होतपर्यंत ती जैन यांच्याकडे राहिली. तिचा इयत्ता बारावीच्या शिक्षणाचा खर्च जॉली थॉमस यांनी उचलला. थॉमस यांच्याकडे राहून तिने इयत्ता बरावीचा महत्त्वपूर्ण शैक्षणिक टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला. प्रियंकासोबत बोलल्यानंतर तिची जिद्द किती बळकट आहे हे जाणवते. परिस्थिती अत्यंत कठीण असतानाही तिने प्रयत्नांचा हात कधीच सोडला नाही. प्रयत्न तेथे परमेश्वर असल्याचे ती म्हणते. विविध अडचणींवर मात करून मिळणाऱ्या वेळात ती केवळ अभ्यासच करीत होती. अभ्यासास शांत वातावरण मिळण्यासाठी ती मध्यरात्रीनंतर उठायची. तिचा हा ध्यास पुढेही कायम राहील हे नक्की. प्रियंका आता एक खासगी जॉब करीत आहे. तिने राहण्यासाठी भाड्याची खोली घेऊन स्वतंत्र होण्याच्या दिशेने हिंमतीने पुढे पाऊल टाकले आहे. ती खोलीचे भाडे देत असली तरी भोजनाचा खर्च मात्र तिची अम्मा म्हणजे जॉली थॉमस याच करीत आहे. तिने बारावीच्या यशाचे श्रेय अम्मासह सर्व शिक्षकांना दिले.