शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

सिंचन प्रकल्पांना खासगी क्षेत्रातून निधी

By admin | Updated: June 21, 2015 01:21 IST

राज्य सरकारने सिंचनाला सर्वोच्च प्राधान्य दिले असून खासगी क्षेत्रातील संस्था त्यासाठी निधी देण्यास तयार आहेत. मात्र त्यांना नियोजनपूर्वक काम होईल,

जळगाव : राज्य सरकारने सिंचनाला सर्वोच्च प्राधान्य दिले असून खासगी क्षेत्रातील संस्था त्यासाठी निधी देण्यास तयार आहेत. मात्र त्यांना नियोजनपूर्वक काम होईल, असा विश्वास देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.जलसंपदा विभागातील अभियंत्यांची कार्यशाळा येथील जैन उद्योग समुहाच्या गांधी रिसर्च फाउंडेशन सभागृहात शनिवारी झाली. नियोजनातील त्रुटींचा सिंचन योजनांना मोठा फटका बसतो. त्यामुळे चांगले नियोजन करा, कामकाजात पारदर्शकता ठेवा. निधीची कमतरता भासणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.जलसंपदा विभागाच्या कामाचा गौरव करताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने पथदर्शी प्रकल्प तयार केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. केवळ जलसंपदा विभागातील अभियंत्यांच्या प्रचंड क्षमतेमुळेच हे शक्य झाले आहे. एका संक्रमण अवस्थेतून हा विभाग जातो आहे. गेल्या कालखंडात या विभागाची बरीच बदनामी झाली, असा चिमटाही त्यांनी मारली. या स्थितीतून पुढे जाण्याचा प्रयत्न आपण करु. गतिमान व पारदर्शी निर्णय घेतले तर कामांना गती येईल, त्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे. चुका होतील पण त्याचे मूल्यमापन झाले पाहिजे.सिंचन योजनांवर आपण हजारो कोटी रुपये खर्च करतो पण पुनर्वसन, भूसंपादनासारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. जमीन देणाऱ्यास जीवनमान उंचावेल, अशी मदत केल्यास तो प्रकल्पास विरोध करणार नाही. जागतिक बँक, खासगी क्षेत्राकडून सिंचन योजनांना निधी मिळू शकतो. मात्र त्यासाठी धोरण पारदर्शक ठेवावे लागेल असे त्यांनी सांगितले. महसूल मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष भवरलाल जैन आदींनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)