शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

लाचखोरीत खासगी व्यक्ती अव्वल, अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून खांद्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 21:59 IST

जानेवारी ते २३ आॅगस्टदरम्यान राज्यात एसीबीने ५४८ सापळे यशस्वी केले.

अमरावती : जानेवारी ते २३ आॅगस्टदरम्यान राज्यात एसीबीने ५४८ सापळे यशस्वी केले. त्यात लाचखोरी वर्ग १ व वर्ग २ च्या तुलनेत खासगी व्यक्ती अव्वल राहिले. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी लाचेसाठी खासगी व्यक्तींच्या खांद्याचा वापर तर करत नाहीत ना, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.आपण एसीबी सापळ्यात अडकू नये आणि अडकलोच तर खासगी व्यक्तींवर ते बालंट ढकलू द्यायचे, या मानसिकतेतून स्वत: सहीसलामत राहण्यासाठी खासगी व्यक्तींचा वापर अत्याधिक होऊ लागल्याचे निरीक्षण एसीबीने नोंदविले आहे. एसीबीने जानेवारी ते २३ आॅगस्ट २०१८ दरम्यान राज्यात एकूण ५४८ प्रकरणे उघड केलीत. त्यात वर्ग १ चे ४८, वर्ग २ चे ०४, वर्ग ३ चे ४५५, वर्ग ४ चे २८ व तब्बल ८७ खासगी व्यक्ती अडकली. वर्ग १ व वर्ग २ च्या लाचखोर अधिका-यांपेक्षा खासगी व्यक्तींचा आकडा अधिक आहे. या ५४८ प्रकरणांमध्ये एकूण ९७.६५ लाख रुपये जप्त करण्यात आले. यात नेहमीप्रमाणे महसूल, पोलीस व महावितरणचे अधिकारी-कर्मचारी लाचखोर निघाले. मात्र, त्याचवेळी या तीन विभागांत अनुक्रमे १८, १६ व १० खासगी व्यक्ती एसीबीच्या सापळ्यात अडकल्या. त्यामुळे अनेक अधिकारी-कर्मचारी लाच घेण्यासाठी खासगी व्यक्तींचा वापर अर्थात त्यांच्या खांद्याचा वापर करू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.२०१७ मध्ये १३७ खासगी व्यक्ती लाचखोरसन २०१८ च्या आॅगस्टपर्यंत ८७ खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्या, तर २०१७ मध्ये राज्यात हा आकडा १३७ होता. त्यापूर्वी २०१६ मध्ये १२० खासगी व्यक्तींना अटक करण्यात आली. २०१५ मध्ये २१९, २०१४ मध्ये २०५ तर सन २०१३ मध्ये ८७ खासगी व्यक्तींवर एसीबीने सापळा टाकला.