शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

युती शासनावर पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल!

By admin | Updated: April 2, 2015 00:47 IST

विधानसभा अधिवेशन : धाडसी अर्थसंकल्प मांडण्याची संधी गमावल्याचा आरोप

कऱ्हाड : ‘युती सरकारला अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर कायम राहण्यासाठी ठोस उपाययोजना करावयाची संधी होती. ती युती शासनाने हुकवली आहे. महाराष्ट्रापुढील प्रमुख आव्हानांना तोंड देण्याकरिता ठोस उपाययोजना केलेली दिसून आली नाही,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री व कऱ्हाड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली.अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत भाग घेताना ते म्हणाले, ‘वित्तमंत्र्यांचे परिश्रम पाहून आमच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. राज्याच्या सर्वांगीण व समतोल विकासाकरिता जे आवश्यक आहे, त्याचा समावेश असेल, असे वाटले होते; परंतु आमचा हिरमोड झाला आहे. त्यांनी राज्यातील सिंचन प्रकल्प, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचा प्रश्न, विदर्भातील सिचंन व उद्योग व्यवसायातील बॅकलॉग याबाबत अर्थसंकल्पात काय तरतूद केली आहे,’ असा खडा सवालही त्यांनी यावेळी केला. विदर्भासाठी जादा तरतूद करून बॅकलॉग भरण्याबाबत कोणाचेही दुमत नाही. याचा अर्थ पूर्वीच्या सरकारने अन्याय केला, असे म्हणणे चुकीचे आहे. विदर्भातील सिचंन व उद्योगाचा बॅकलॉग दूर झाला पाहिजे. विदर्भात दरडोईच्या बाबतीत जे जिल्हे खाली आहेत. त्यांना वर आणणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पॅकेज देण्याची घोषणा केली होती. पण अंदाजपत्रकात याबाबतची काहीही तरतूद नाही. याची खंतही त्यांनी व्यक्त केली.गारपीटग्रस्तांसाठी जाहीर केलेला निधी गेला कुठे? जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजेत, विश्वास उडेल असे काहीही करता कामा नये, ‘जलयुक्त शिवार’ योजना अतिशय चांगली असून, आमच्या शासनाने याचे उद्घाटन केले होते. आमच्या काळात या योजनेचे नाव ‘जलयुक्त ग्राम’ असे होते. नवीन सरकारने केवळ नावात बदल करून राबविली आहे. यावर्षी राज्याचा विकासदर दोन टक्क्यांनी खाली घसरलेला आहे. तो दोन अंकी नेण्याचे आश्वासन वित्तमंत्र्यांनी दिलेले आहे. परंतु ठोस पावले उचललेली दिसून येत नाहीत. सिंचनावर दहा हजार कोटींपेक्षाही जास्त तरतूद असायला हवी होती. अर्थसंकल्पात सात हजार दोनशे कोटींची तरतूद केलेली आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होणार नाही. ब्रिटनचे पंतप्रधान जेव्हा मुंबईला आले होते, त्यांची आणि माझी बैठक झाली होती. आम्ही दोघांनी मिळून मुंबई-बेंगलोर कॉरिडोअरसाठी ब्रिटन सरकारकडून मदत घ्यावी, म्हणून आम्ही प्रस्ताव मांडला. त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली. त्याबद्दल अर्थसंकल्पात कोठेही वाच्यता नाही. मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र, मिहान प्रकल्प, उद्योग धंंद्यांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा, सेझ प्रकल्प, टोल माफी, स्मार्टसिटी, मेट्रो रेल , स्वच्छ भारत अभियान, एल.बी.टी. आदी विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण मत मांडले. (प्रतिनिधी)