शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

युती शासनावर पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल!

By admin | Updated: April 2, 2015 00:47 IST

विधानसभा अधिवेशन : धाडसी अर्थसंकल्प मांडण्याची संधी गमावल्याचा आरोप

कऱ्हाड : ‘युती सरकारला अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर कायम राहण्यासाठी ठोस उपाययोजना करावयाची संधी होती. ती युती शासनाने हुकवली आहे. महाराष्ट्रापुढील प्रमुख आव्हानांना तोंड देण्याकरिता ठोस उपाययोजना केलेली दिसून आली नाही,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री व कऱ्हाड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली.अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत भाग घेताना ते म्हणाले, ‘वित्तमंत्र्यांचे परिश्रम पाहून आमच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. राज्याच्या सर्वांगीण व समतोल विकासाकरिता जे आवश्यक आहे, त्याचा समावेश असेल, असे वाटले होते; परंतु आमचा हिरमोड झाला आहे. त्यांनी राज्यातील सिंचन प्रकल्प, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचा प्रश्न, विदर्भातील सिचंन व उद्योग व्यवसायातील बॅकलॉग याबाबत अर्थसंकल्पात काय तरतूद केली आहे,’ असा खडा सवालही त्यांनी यावेळी केला. विदर्भासाठी जादा तरतूद करून बॅकलॉग भरण्याबाबत कोणाचेही दुमत नाही. याचा अर्थ पूर्वीच्या सरकारने अन्याय केला, असे म्हणणे चुकीचे आहे. विदर्भातील सिचंन व उद्योगाचा बॅकलॉग दूर झाला पाहिजे. विदर्भात दरडोईच्या बाबतीत जे जिल्हे खाली आहेत. त्यांना वर आणणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पॅकेज देण्याची घोषणा केली होती. पण अंदाजपत्रकात याबाबतची काहीही तरतूद नाही. याची खंतही त्यांनी व्यक्त केली.गारपीटग्रस्तांसाठी जाहीर केलेला निधी गेला कुठे? जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजेत, विश्वास उडेल असे काहीही करता कामा नये, ‘जलयुक्त शिवार’ योजना अतिशय चांगली असून, आमच्या शासनाने याचे उद्घाटन केले होते. आमच्या काळात या योजनेचे नाव ‘जलयुक्त ग्राम’ असे होते. नवीन सरकारने केवळ नावात बदल करून राबविली आहे. यावर्षी राज्याचा विकासदर दोन टक्क्यांनी खाली घसरलेला आहे. तो दोन अंकी नेण्याचे आश्वासन वित्तमंत्र्यांनी दिलेले आहे. परंतु ठोस पावले उचललेली दिसून येत नाहीत. सिंचनावर दहा हजार कोटींपेक्षाही जास्त तरतूद असायला हवी होती. अर्थसंकल्पात सात हजार दोनशे कोटींची तरतूद केलेली आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होणार नाही. ब्रिटनचे पंतप्रधान जेव्हा मुंबईला आले होते, त्यांची आणि माझी बैठक झाली होती. आम्ही दोघांनी मिळून मुंबई-बेंगलोर कॉरिडोअरसाठी ब्रिटन सरकारकडून मदत घ्यावी, म्हणून आम्ही प्रस्ताव मांडला. त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली. त्याबद्दल अर्थसंकल्पात कोठेही वाच्यता नाही. मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र, मिहान प्रकल्प, उद्योग धंंद्यांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा, सेझ प्रकल्प, टोल माफी, स्मार्टसिटी, मेट्रो रेल , स्वच्छ भारत अभियान, एल.बी.टी. आदी विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण मत मांडले. (प्रतिनिधी)