शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास प्राधान्य

By admin | Updated: May 2, 2015 10:24 IST

दुष्काळ, गारपिटीने ग्रस्त असलेल्या हवालदिल शेतकऱ्यांना मदत करीत त्यांचे अश्रू पुसण्याला राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे,

मुंबई : दुष्काळ, गारपिटीने ग्रस्त असलेल्या हवालदिल शेतकऱ्यांना मदत करीत त्यांचे अश्रू पुसण्याला राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आज येथे केले. राज्याच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे शासनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ झाला. त्या वेळी राज्यपाल बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर स्नेहल आंबेकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, की शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र व राज्य सरकारने निधी दिला आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवून भरघोस पिके घेण्यावर भर दिला जाईल. जलयुक्त शिवार योजनेतून जलक्रांतीच होईल. या जलक्रांतीच्या यशस्वितेसाठी कॉर्पोरेट क्षेत्राने सामाजिक जबाबदारी म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात ३० थीम बेस्ड स्मार्ट शहरे उभारण्यात येतील़ दिवंगत प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना राबविली जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलच्या जागेवरील स्मारकासाठी जागा मिळाल्याने स्मारकाचा मार्ग मोकळा झाल्याचे राज्यपाल म्हणाले. सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा त्यांनी उल्लेख केला. (विशेष प्रतिनिधी)