शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

भरती प्रक्रियेत बडतर्फ कर्मचा-यांना प्राधान्य!

By admin | Updated: October 17, 2014 00:37 IST

डॉ. पंदेकृविच्या कुलगुरूंनी घेतली कुलपतींची भेट.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ८३ कर्मचार्‍यांच्या बडतर्फ कर्मचार्‍यांना नव्याने भरती प्रक्रीया राबवून गुणवत्तेनुसार सेवेत समाविष्ट करण्यास कृषी विद्यापीठ अनुकूल आहे; परंतु याकरिता महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भरती मंडळाची प्रक्रिया सुरू होण्याची गरज असल्याने, कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी कृषी विद्यापीठांचे कुलपती तथा राज्याच्या राज्यपालांची मंगळवारी भेट घेतली. नोकर भरतीत अनियमितता झाल्याच्या पृष्ठभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कृषी विद्यापीठाच्या ८३ कर्मचार्‍यांच्या बडतर्फीवर ८ ऑक्टोबर रोजी शिक्कामोर्तब केले. त्यानुसार कृषी विद्या पीठ प्रशासनाने वरिष्ठ संशोधन आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यक पदावरील या कर्मचार्‍यांच्या बडतर्फीचे आदेश बजावल्याने या कर्मचार्‍यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कर्मचार्‍यांच्या बडतर्फीवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांनी न्यायासाठी सवरेच न्यायालयात धाव घेतली होती. ४ एप्रिल २0१४ रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. कृषी विद्यापीठाने नव्याने भरती प्रक्रिया राबवून सर्व वरिष्ठ व कनिष्ठ संशोधन सहाय्यकांना गुणवत्तेनुसार सामावून घ्यावे, असे आदेश सवरेच न्यायालयाने त्यावेळी सुनावणीदरम्यान दिले होते; परंतु कृषी विद्यापीठाने भरती प्रक्रियाच पूर्ण केली नाही. त्यामुळे बडतर्फीची कारवाई झालेल्या कर्मचार्‍यांनी १४ ऑक्टोबर रोजी कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयात ठिय्या दिला होता. या प्रकरणी कुलगुरू डॉ. दाणी तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील, असे आश्‍वासन प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एम. भाले यांनी दिल्याने कर्मचार्‍यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. दरम्यान, डॉ. दाणी यांनी कुलपतींची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणी पुन्हा कुलपतींशी चर्चा केली जाणार आहे. कुलपतींशी चर्चा झाल्यानंतर कुलगुरू आणि या कर्मचार्‍यांमध्ये बुधवारी चर्चा झाली असून, या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेण्याचे आश्‍वासन डॉ. दाणी यांनी कर्मचार्‍यांना दिले आहे.*भरती मंडळाचा घोळ भोवला राज्यात महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भरती निवड मंडळाची स्थापना झाली आहे. या स्थापनेला एक वर्ष उलटले असून, अद्याप या मंडळाचे काम सुरू झाले नसल्याने राज्यातील कृषी विद्यापीठांच्या संशोधकांची भरती प्रक्रिया ठप्प पडली आहे. त्याचा फटका या ८३ कर्मचार्‍यांनाही बसला आहे.