शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

भरती प्रक्रियेत बडतर्फ कर्मचा-यांना प्राधान्य!

By admin | Updated: October 17, 2014 00:37 IST

डॉ. पंदेकृविच्या कुलगुरूंनी घेतली कुलपतींची भेट.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ८३ कर्मचार्‍यांच्या बडतर्फ कर्मचार्‍यांना नव्याने भरती प्रक्रीया राबवून गुणवत्तेनुसार सेवेत समाविष्ट करण्यास कृषी विद्यापीठ अनुकूल आहे; परंतु याकरिता महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भरती मंडळाची प्रक्रिया सुरू होण्याची गरज असल्याने, कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी कृषी विद्यापीठांचे कुलपती तथा राज्याच्या राज्यपालांची मंगळवारी भेट घेतली. नोकर भरतीत अनियमितता झाल्याच्या पृष्ठभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कृषी विद्यापीठाच्या ८३ कर्मचार्‍यांच्या बडतर्फीवर ८ ऑक्टोबर रोजी शिक्कामोर्तब केले. त्यानुसार कृषी विद्या पीठ प्रशासनाने वरिष्ठ संशोधन आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यक पदावरील या कर्मचार्‍यांच्या बडतर्फीचे आदेश बजावल्याने या कर्मचार्‍यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कर्मचार्‍यांच्या बडतर्फीवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांनी न्यायासाठी सवरेच न्यायालयात धाव घेतली होती. ४ एप्रिल २0१४ रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. कृषी विद्यापीठाने नव्याने भरती प्रक्रिया राबवून सर्व वरिष्ठ व कनिष्ठ संशोधन सहाय्यकांना गुणवत्तेनुसार सामावून घ्यावे, असे आदेश सवरेच न्यायालयाने त्यावेळी सुनावणीदरम्यान दिले होते; परंतु कृषी विद्यापीठाने भरती प्रक्रियाच पूर्ण केली नाही. त्यामुळे बडतर्फीची कारवाई झालेल्या कर्मचार्‍यांनी १४ ऑक्टोबर रोजी कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयात ठिय्या दिला होता. या प्रकरणी कुलगुरू डॉ. दाणी तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील, असे आश्‍वासन प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एम. भाले यांनी दिल्याने कर्मचार्‍यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. दरम्यान, डॉ. दाणी यांनी कुलपतींची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणी पुन्हा कुलपतींशी चर्चा केली जाणार आहे. कुलपतींशी चर्चा झाल्यानंतर कुलगुरू आणि या कर्मचार्‍यांमध्ये बुधवारी चर्चा झाली असून, या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेण्याचे आश्‍वासन डॉ. दाणी यांनी कर्मचार्‍यांना दिले आहे.*भरती मंडळाचा घोळ भोवला राज्यात महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भरती निवड मंडळाची स्थापना झाली आहे. या स्थापनेला एक वर्ष उलटले असून, अद्याप या मंडळाचे काम सुरू झाले नसल्याने राज्यातील कृषी विद्यापीठांच्या संशोधकांची भरती प्रक्रिया ठप्प पडली आहे. त्याचा फटका या ८३ कर्मचार्‍यांनाही बसला आहे.