शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

मेळघाटात आदिवासींसाठी रोजगाराचे जाळे, पोल्ट्री फार्म युनिट उभारणीला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 20:11 IST

मेळघाटात ज्या गावांमध्ये व्हिलेज इको टुरिझम कमिटी अस्तित्वात आहे, त्या गावांत आदिवासींना रोजगाराचे दालन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासोबत करार अंतिम टप्प्यात आहे. करार होताच गावागावांत पोल्ट्री फार्म युनिटचे जाळे उभारले जाईल, अशी माहिती राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

अमरावती, दि. 10 - मेळघाटात ज्या गावांमध्ये व्हिलेज इको टुरिझम कमिटी अस्तित्वात आहे, त्या गावांत आदिवासींना रोजगाराचे दालन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासोबत करार अंतिम टप्प्यात आहे. करार होताच गावागावांत पोल्ट्री फार्म युनिटचे जाळे उभारले जाईल, अशी माहिती राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.मेळघाटात व्याघ्र संवर्धन काळाची गरज असून सोबतच आदिवासींच्या उपजीविकेसाठी रोजगार हेदेखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे शासनाने जनविकास योजनेंतर्गत आतापर्यंत पाचशे आदिवासी युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. आदिवासींसाठी राबविल्या जाणा-या योजना ह्या कागदावरच राहायला नको, याची काळजी घेतली जात आहे. मेळघाटात लवकरच पोल्ट्री फार्म युनिटची संकल्पना पूर्णत्वास येणार आहे. यापूर्वी हॉटेल मॅनेजमेंट, इलेक्ट्रिशियन, वातानुकूलित यंत्र दुरुस्ती, शिवणकाम, वेल्डिंग प्रशिक्षण तर आॅटोमोबाईल प्रशिक्षणातून आदिवासी युवक-युवतींना रोजगार मिळवून देण्यात आला आहे.व्हिलेज इको टुरिझम अंतर्गत १८ ते ३४ वर्षे वयोगटातील आदिवासी युवक-युवतींसाठी ह्यप्रथमह्ण नामक संस्थेच्या माध्यमातून निवासी प्रशिक्षण देण्यात आले आहे. एका उमेदवाराच्या प्रशिक्षणासाठी व्याघ्र प्रकल्प १६ हजार रुपये खर्च करीत आहे. प्रशिक्षणाअंती रोजगारासाठी पाठविलेल्या आदिवासी युवक, युवतींबाबतची माहिती घेण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाने स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.आदिवासी महिला तयार करताहेत लाखेच्या बांगड्यामध्य प्रदेशातील बालाघाट येथील सी.के.लाख युनिटसोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार आदिवासी महिलांना लाखेच्या बांगड्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. बांगड्या बनविण्यासाठी लागणारे साहित्य एजन्सी पुरवीत असून बांगड्या खरेदी करण्याची जबाबदारीदेखील याच एजन्सीकडे आहे. आतापर्यंत २२९ आदिवासी महिलांनी प्रशिक्षण घेतले असून, त्या घरबसल्या लाखेच्या बांगड्या तयार करून रोजगार मिळवीत आहेत.