शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

मागील वर्षी कमी दिलेले पैसे सभासदांना अगोदर द्या

By admin | Updated: January 16, 2017 01:20 IST

माळेगाव सहकारी साखर कारखान्याने राज्यात सर्वाधिक ऊसदर दिला आहे.

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने राज्यात सर्वाधिक ऊसदर दिला आहे. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्यांनी मागील वर्षी कमी दिलेला दर अगोदर द्यावा, मगच ‘माळेगाव’ची तुलना अन्य कारखान्यांशी अजित पवार यांनी करावी. माळेगावने विक्रमी दर दिल्यानंतर ‘सोमेश्वर’च्या दरात वाढ करण्यात आली. तरीदेखील माळेगावचा दर जास्त आहे, असा दावा कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी केला. माळेगाव (ता. बारामती) येथे तावरे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमात तावरे यांनी अजित पवार यांच्यावर कडाडून टीका केली. या वेळी कारखान्याचे ज्येष्ठ सहकारतज्ज्ञ चंद्रराव तावरे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, ज्येष्ठ नगरसेवक अशोक देशमुख, नगरसेवक सुनील सस्ते, नगरसेवक बबलू देशमुख, नगरसेवक विष्णूपंत चौधर, भाजपचे समन्वयक प्रशांत सातव, माजी सभापती अविनाश गोफणे आदी उपस्थित होते. माळेगाव कारखाना सभासदांना २७५० रुपये प्रतिटन देणार आहे. खोडकीचे १०० रुपये व अनुदानाचे १५० रुपये असे ३ हजार रुपये कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना मिळणार आहे. त्यामुळे अजित पवार यांनी ‘सोमेश्वर’ने खोडव्याला २८५० रुपये सर्वाधिक दिले आहेत, असा दावा केला होता. अजित पवार यांचे गणित चुकत आहे, असा टोला तावरे यांनी मारला. गतवर्षी तुमच्या ताब्यातील कारखान्यांनी उसाला प्रतिटन २२०० ते २२५० रुपये अंतिम दर दिला आहे. माळेगावच्या तुलनेत ५५० ते ६०० रुपये कमी दर शेजारच्या कारखान्यांच्या सभासदांना मिळाला. हे कमी दिलेले पैसे अगोदर द्या, अशी मागणीही त्यांनी केली. (वार्ताहर) >शरद पवारांच्या कार्यपद्धतीवर चंद्रराव तावरेंची टीका...ज्येष्ठ सहकारतज्ज्ञ चंद्रराव तावरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. १९६७ पासून अनेक चढउतारांमध्ये त्यांच्याबरोबर राहिलो. पूर्वी राजकारण, समाजकारण करताना पवार तालुक्यातील जाणकारांचे मत विचारात घेत. अलीकडे मात्र राजकारण आणि समाजकारणात फारकत घेतली. जनतेच्या हिताला बाधा येऊ लागली. मागील ५० वर्षे त्यांनी फक्त आपापसात झुलवण्यात घालविली. इथेनॉलला चालना मिळण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी ते केंद्रात मंत्री असताना केली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले. हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडविला. तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.