शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

मुद्रित माध्यमे सत्ता उलटवू शकतात

By admin | Updated: January 7, 2017 02:57 IST

दृकश्राव्य माध्यमांपेक्षा मुद्रित माध्यमांमध्ये सत्ता उलटून टाकण्याची क्षमता आहे

अलिबाग : ‘दृकश्राव्य माध्यमांपेक्षा मुद्रित माध्यमांमध्ये सत्ता उलटून टाकण्याची क्षमता आहे. चुकीच्या बातमीने एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्थ होणार नाही. याची काळजी पत्रकारांनी घेतली पाहिजे,’ असे प्रतिपादन दूरदर्शनचे सहायक संचालक जयू भाटकर यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाने पत्रकारितेत उल्लेखनीय काम केलेल्यांच्या सत्कारांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.जग वेगाने बदलत आहे, त्यानुसार माध्यमांमध्येही बदल होत आहेत. सोशल मीडिया प्रगल्भ झाला आहे. वृत्तपत्रांची विश्वासाहर्ता आजही कायम असल्याने वृत्तपत्रांची किंमत कधीच करता येणार नाही. प्रवाहाच्या विरोधात काम करताना पत्रकारांनी समाजाचा आरसा बनले पाहिजे, असेही भाटकर यांनी सांगितले.जिल्ह्यातील बुजुर्ग व्यक्तींकडे प्रंचड अनुभव आहे. त्यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करून, ती ध्वनिमुद्रित करावी आणि सोशल मीडियावर टाकावी, अशी सूचनाही त्यांनी केली. कॅशलेस व्यवहार करण्यास भाजपा सरकार जोर देत आहे; परंतु दुसरीकडे सरकारी बँका त्यांचे ई-वॉलेट बंद करीत आहे. कॅशलेस व्यवहार करणाऱ्या पेटीएम या खासगी संस्थेमध्ये भाजपाची ५१ टक्क्यांची भागीदारी असल्याचा गौप्यस्फोट अलिबाग येथील शेकापचे आमदार सुभाष पाटील यांनी केला.कोकणाला निधी देण्यामध्ये सरकारचे हात कचरतात. कोकणच्या पर्यटन विकासासही त्यांनी भरीव निधी दिला पाहिजे; परंतु कोकणच्या लोकप्रतिनिधींमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे त्यांचे फावते, अशी कबुलीही त्यांनी दिली.सरकार विदर्भ, मराठवाडा, पुरंदर येथे विमानतळ बांधण्यासाठी झटत आहे; परंतु कोकणातील सिंधुदुर्गमध्ये का करीत नाहीत? असा सवालही पाटील यांनी केला. जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना प्रदूषणाचा विळखा पडला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट करून पत्रकारांनी याप्रश्नी आवाज उठविला पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले.‘लोकमत’चे कोकण समन्वयक जयंत धुळप यांना रोहा प्रेस क्लबचा राजाभाऊ देसाई शोध पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांनाही सन्मानित केले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार नारायण मेकडे, रायगड जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी राजू पाटोदकर, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, शशी सावंत यांच्यासह अन्य मान्यवर, पत्रकार उपस्थित होते. ।पुरस्कार प्राप्त पत्रकारसाहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. माधव पोतदार यांना राजा राजवाडे पुरस्कार, म.ना.पाटील स्मृती पुरस्कार ‘लोकमत’चे महाड वार्ताहर सिंकदर अनावारे, ज्येष्ठ छायाचित्रकार वामन पाटील, तर उत्कृष्ट छायाचित्रकाराचा पुरस्कार राजेश डांगळे यांना. तर रायगडभूषण पुरस्काराने नुकतेच ‘लोकमत’चे पत्रकार आविष्कार देसाई, पत्रकार संतोष पेरणे यांना गौरविण्यात आले होते. त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.