शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
2
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
3
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
4
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
5
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
7
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
8
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
9
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 
10
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
11
६० का लगता नही कहीं से! अक्षय कुमारच्या शाहरुखला हटके शुभेच्छा; म्हणाला, "शकल से ४०..."
12
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
13
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
14
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
15
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
16
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
17
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
18
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
19
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
20
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव

कोयनेचे पाणी मुंबईला आणण्यास तत्त्वत: मान्यता

By admin | Updated: August 4, 2016 04:41 IST

कोयना धरणातून वशिष्ठी नदीद्वारे समुद्राकडे वाहून जाणारे ६७ टीएमसी पाणी मुंबईला आणण्यासाठीच्या राष्ट्रीय प्रकल्पाला केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता

मुंबई : कोयना धरणातून वशिष्ठी नदीद्वारे समुद्राकडे वाहून जाणारे ६७ टीएमसी पाणी मुंबईला आणण्यासाठीच्या राष्ट्रीय प्रकल्पाला केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असल्याची माहिती जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. पूर्वीच्या आराखड्यानुसार करण्यात आलेला २,२६८ कोटींचा हा प्रकल्प व्यवहार्य असल्याचा अहवालही प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.लक्षवेधी सूचनेद्वारे आशिष शेलार यांनी यासंबंधीचा विषय उपस्थित करून सभागृहात चर्चा घडवून आणली. कोयना प्रकल्पातील वाया जाणारे पाणी मुंबई महानगरपालिका व टंचाईग्रस्त भागास पुरविण्यासाठी कायमस्वरूपी योजना राबविण्याची मागणी शेलार यांनी केली. कोयना धरणातील ६७.५० टीएमसी पाणी समुद्रात वाहून जाते. त्यामुळे हे पाणी मुंबई परिसराकडे नेण्यासाठी कधी डीपीआर करणार, अशी विचारणा शेलार यांनी केली. या प्रकल्पास नदीजोड प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी राज्याने केंद्र सरकारला केली होती. त्यासाठी काही निकष शिथिल करण्याची विनंतीही केली होती. केंद्र सरकारने त्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे, असे मंत्री शिवतारे यांनी सांगितले. कृष्णा खोऱ्यातील पाणी अन्यत्र वळवू नये, अशी मागणी कर्नाटक व आंध्र प्रदेश सरकारने राष्ट्रीय लवादाकडे केली आहे का, अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यावर अशी कोणतीही मागणी करण्यात आलेली नसल्याचा खुलासा शिवतारे यांनी केला.