शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

कोयनेचे पाणी मुंबईला आणण्यास तत्त्वत: मान्यता

By admin | Updated: August 4, 2016 04:41 IST

कोयना धरणातून वशिष्ठी नदीद्वारे समुद्राकडे वाहून जाणारे ६७ टीएमसी पाणी मुंबईला आणण्यासाठीच्या राष्ट्रीय प्रकल्पाला केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता

मुंबई : कोयना धरणातून वशिष्ठी नदीद्वारे समुद्राकडे वाहून जाणारे ६७ टीएमसी पाणी मुंबईला आणण्यासाठीच्या राष्ट्रीय प्रकल्पाला केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असल्याची माहिती जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. पूर्वीच्या आराखड्यानुसार करण्यात आलेला २,२६८ कोटींचा हा प्रकल्प व्यवहार्य असल्याचा अहवालही प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.लक्षवेधी सूचनेद्वारे आशिष शेलार यांनी यासंबंधीचा विषय उपस्थित करून सभागृहात चर्चा घडवून आणली. कोयना प्रकल्पातील वाया जाणारे पाणी मुंबई महानगरपालिका व टंचाईग्रस्त भागास पुरविण्यासाठी कायमस्वरूपी योजना राबविण्याची मागणी शेलार यांनी केली. कोयना धरणातील ६७.५० टीएमसी पाणी समुद्रात वाहून जाते. त्यामुळे हे पाणी मुंबई परिसराकडे नेण्यासाठी कधी डीपीआर करणार, अशी विचारणा शेलार यांनी केली. या प्रकल्पास नदीजोड प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी राज्याने केंद्र सरकारला केली होती. त्यासाठी काही निकष शिथिल करण्याची विनंतीही केली होती. केंद्र सरकारने त्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे, असे मंत्री शिवतारे यांनी सांगितले. कृष्णा खोऱ्यातील पाणी अन्यत्र वळवू नये, अशी मागणी कर्नाटक व आंध्र प्रदेश सरकारने राष्ट्रीय लवादाकडे केली आहे का, अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यावर अशी कोणतीही मागणी करण्यात आलेली नसल्याचा खुलासा शिवतारे यांनी केला.