शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान जन-धन योजनेमुळे आर्थिक विषमता दूर होईल

By admin | Updated: August 29, 2014 01:01 IST

पंतप्रधान जन-धन योजना देशातील गरिबी दूर करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल व यातून समाजातील आर्थिक विषमता दूर होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

नितीन गडकरी : नागपूर जिल्ह्यात योजनेचा शुभारंभनागपूर : पंतप्रधान जन-धन योजना देशातील गरिबी दूर करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल व यातून समाजातील आर्थिक विषमता दूर होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.बँक आॅफ इंडिया व महाराष्ट्र बँक यांच्या संयुक्त विद्यमाने येथील साई सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक संचालक ज्योतिका जीवनी, बँक आॅफ इंडियाचे कार्यकारी संचालक अरुण श्रीवास्तव, बँक आॅफ इंडियाचे सरव्यवस्थापक नंदकुमार पुजारी आणि आयडीबीआय बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक बी.के. बत्रा यांच्यासह महापौर व आमदार अनिल सोले, सुधाकर देशमुख, नागो गाणार आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गोतमारे उपस्थित होते.गडकरी म्हणाले की, समाजातील गोरगरीब जनतेसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. गावात, झोपडपट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांचे बँकेत खाते उघडून देण्यात येणार आहेत. सहा महिने सुरळीत व्यवहार केल्यावर खातेधारकाला पाच हजार रुपयांपर्यंत ‘ओव्हरड्राफ्ट’ मिळण्याची सुविधा यात आहे. तसेच एक लाखाचे विमा संरक्षण मिळणार आहे. यातून गोरगरिबांना आर्थिक मदत तर होईलच शिवाय केंद्र व राज्याच्या विविध योजनांचाही त्याला लाभ मिळेल. त्याला सावकाराकडे जाण्याची गरज भासणार नाही. गरिबी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने उचललेले हे एक महत्त्वाकांक्षी पाऊल असून, यातून समाजाचे आर्थिक व सामाजित चित्र बदलेल. समाजातील आर्थिक विषमता दूर होईल.बँका सद्यस्थितीत ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच कर्ज देते, गरीब जनता वंचित राहते. या योजनेतून त्यांना अर्थपुरवठा होणार आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची वृत्ती गरिबांची असते. त्यामुळे परतफेडीनंतर अधिक कर्जही त्यांना मिळू शकेल. योजनेची अंमलबजावणी करताना बँकेच्या अधिकाऱ्यांनीही मानवी दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले. महिला बचत गटांनाही या योजनेचा लाभ मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी नागपूर विभागातील विविध खातेदारांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बँकेच्या पासबुकचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक अरुण श्रीवास्तव यांनी केले तर उपस्थितांचे आभार बँक आॅफ इंडियाचे महेंद्र वाही यांनी मानले. देशपातळीवर या योजनेचा शुभारंभ दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमातील मोदींच्या भाषणाचे प्रक्षेपण कार्यक्रमस्थळी करण्यात आले होते. कार्यक्रमाला पालकमंत्री नितीन राऊत व अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख अनुपस्थित होते.कार्यक्रमाला माजी आमदार गिरीश गांधी, बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी रमण मूर्ती, नाबार्डचे पी.एल. कुळकर्णी यांच्यासह राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिल्ह्यात १२००० खातीपंतप्रधान जनधन योजनेत नागपूर जिल्ह्यात १२००० खाती उघडण्यात आल्याचे गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विभागातील सहा जिल्ह्यांचा विचार करता ही संख्या दोन लाखांपेक्षा अधिक असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. २६ जानेवारीपर्यंत खाते उघडण्याची मोहीम सुरूच राहणार असून या काळात जास्तीत जास्त खाती उघडण्यात येईल, असा विश्वास यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.गडकरींची नागपूरला प्राथमिकतापंतप्रधान जनधन योजनेच्या मुंबई येथील कार्यक्रमास उपस्थित राहण्याची सूचना गडकरी यांना करण्यात आली होती. पण त्यांनी नागपूरच्या कार्यक्रमाला प्राथमिकता दिली. खुद्द गडकरी यांनीच ही माहिती त्यांच्या भाषणादरम्यान दिली.