शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

प्राथमिक शिक्षकांना दिलासा

By admin | Updated: June 11, 2016 03:33 IST

उच्च न्यायालयाचे अंतिम आदेश येईपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करू नये ही शिक्षक परिषदेने केलेली मागणी अखेर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मान्य केली

अलिबाग : पदवीपात्र शिक्षकांच्या समायोजनासंदर्भातील, उच्च न्यायालयाचे अंतिम आदेश येईपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करू नये ही शिक्षक परिषदेने केलेली मागणी अखेर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मान्य केली आहे. तसे आदेश रायगड जिल्हा परिषदेला देण्यात आल्याने रायगड जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असल्याची माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी दिली.रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने १५ तालुक्यात १ हजार ४३ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शासन निर्देशाप्रमाणे ५ जून २०१६ पर्यंत करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने तालुका पंचायत समित्यांना दिले होते. यामुळे जिल्ह्यातील १ हजार ४३ शिक्षकांच्या अन्यायकारक बदल्या होणार होत्या. या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व प्रशासकीय व विनंती बदल्या पदवीधर विषय शिक्षक नेमणुकीनंतर करण्यात याव्यात अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकारी यांच्याकडे रायगड जिल्हा शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे अध्यक्ष संजय निजापकर, राज्य प्रतिनिधी राजेश सुर्वे, कार्याध्यक्ष भगवान घरत आदींनी लेखी निवेदन देऊन केली होती. शिक्षक परिषदेच्या या मागणीला जिल्ह्यातील सर्व आमदार, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, शिक्षण सभापती मनोहर पाशिलकर यांनी पाठिंबा देवून सहकार्य करण्याची भूमिका घेतली. पदवीधर विषय शिक्षकांच्या नेमणुका रायगड जिल्हा परिषदेने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केल्या होत्या. याविरोधात काही शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार विषय शिक्षक नेमणुकीस स्थगिती दिली आहे. विषय शिक्षक नेमणुकीपूर्वी ३० सप्टेंबर २०१५ च्या पटावर अतिरिक्त शिक्षक व तालुका अंतर्गत शिक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांचा घाट घालून जिल्ह्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांनी ६ जून २०१६ अखेर बदल्या केल्या. त्यामुळे महाडमधील ७२ , माणगाव २९ , रोहा २१ , कर्जत १०० व इतर तालुक्यातील मिळून जिल्हाभरातील ७०० ते ८०० अतिरिक्त शिक्षकांना जिल्ह्याबाहेर किंवा इतर आस्थापनांवर पदस्थापना देण्यात येणार होती. यासंदर्भातील निर्णय आता २० जून रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशांवर अवलंबून असेल. (विशेष प्रतिनिधी)>समायोजन बदल्यारायगड जिल्हा शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे , शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच विविध विभागांच्या सचिवांची भेट घेवून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व या बदल्या कशा अन्यायकारक आहेत हे पटवून दिले. त्यानंतर परिस्थितीत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व बदल्या करण्यास राज्याच्या ग्रामविकास विभागाने स्थगिती दिली आहे.