शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

प्राथमिक शिक्षकांना दिलासा

By admin | Updated: June 11, 2016 03:33 IST

उच्च न्यायालयाचे अंतिम आदेश येईपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करू नये ही शिक्षक परिषदेने केलेली मागणी अखेर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मान्य केली

अलिबाग : पदवीपात्र शिक्षकांच्या समायोजनासंदर्भातील, उच्च न्यायालयाचे अंतिम आदेश येईपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करू नये ही शिक्षक परिषदेने केलेली मागणी अखेर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मान्य केली आहे. तसे आदेश रायगड जिल्हा परिषदेला देण्यात आल्याने रायगड जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असल्याची माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी दिली.रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने १५ तालुक्यात १ हजार ४३ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शासन निर्देशाप्रमाणे ५ जून २०१६ पर्यंत करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने तालुका पंचायत समित्यांना दिले होते. यामुळे जिल्ह्यातील १ हजार ४३ शिक्षकांच्या अन्यायकारक बदल्या होणार होत्या. या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व प्रशासकीय व विनंती बदल्या पदवीधर विषय शिक्षक नेमणुकीनंतर करण्यात याव्यात अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकारी यांच्याकडे रायगड जिल्हा शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे अध्यक्ष संजय निजापकर, राज्य प्रतिनिधी राजेश सुर्वे, कार्याध्यक्ष भगवान घरत आदींनी लेखी निवेदन देऊन केली होती. शिक्षक परिषदेच्या या मागणीला जिल्ह्यातील सर्व आमदार, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, शिक्षण सभापती मनोहर पाशिलकर यांनी पाठिंबा देवून सहकार्य करण्याची भूमिका घेतली. पदवीधर विषय शिक्षकांच्या नेमणुका रायगड जिल्हा परिषदेने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केल्या होत्या. याविरोधात काही शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार विषय शिक्षक नेमणुकीस स्थगिती दिली आहे. विषय शिक्षक नेमणुकीपूर्वी ३० सप्टेंबर २०१५ च्या पटावर अतिरिक्त शिक्षक व तालुका अंतर्गत शिक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांचा घाट घालून जिल्ह्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांनी ६ जून २०१६ अखेर बदल्या केल्या. त्यामुळे महाडमधील ७२ , माणगाव २९ , रोहा २१ , कर्जत १०० व इतर तालुक्यातील मिळून जिल्हाभरातील ७०० ते ८०० अतिरिक्त शिक्षकांना जिल्ह्याबाहेर किंवा इतर आस्थापनांवर पदस्थापना देण्यात येणार होती. यासंदर्भातील निर्णय आता २० जून रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशांवर अवलंबून असेल. (विशेष प्रतिनिधी)>समायोजन बदल्यारायगड जिल्हा शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे , शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच विविध विभागांच्या सचिवांची भेट घेवून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व या बदल्या कशा अन्यायकारक आहेत हे पटवून दिले. त्यानंतर परिस्थितीत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व बदल्या करण्यास राज्याच्या ग्रामविकास विभागाने स्थगिती दिली आहे.