शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

प्राथमिक गुणवत्ता यादी आज जाहीर होणार

By admin | Updated: June 21, 2016 00:43 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, मंगळवारी (दि. २१) सकाळी ११ वाजता प्राथमिक गुणवत्ता

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, मंगळवारी (दि. २१) सकाळी ११ वाजता प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या हरकती व सूचना येत्या २१ व २२ जूनपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. तसेच अद्याप आॅनलाइन प्रवेशअर्ज न भरणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या दोन दिवसांत अर्ज भरता येणार आहे, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले. आॅनलाइन प्रवेशासाठी ७१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी मंगळवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जात दुरुस्ती असतील, त्यांना येत्या २१ व २२ जून रोजी हरकती व सूचना देता येतील. येत्या २३ जून रोजी अकरावीच्या मुख्य ९ केंद्रांवर आणि या केंद्रांच्या अंतर्गत येणाऱ्या मार्गदर्शन केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्त्या करता येतील. दुरुस्तीसाठी येणा-या विद्यार्थ्यांना पहिल्या व दुसऱ्या भागातील सर्व माहिती पुन्हा नव्याने भरावी लागेल.टेमकर म्हणाले, ‘‘अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना केवळ पहिलाच भाग भरता आला, काही कारणास्तव प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरता आला नाही. तसेच ज्यांना दोन्हीही भाग भरता आले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना २१ व २२ जून रोजी आॅनलाइन अर्ज भरता येईल़कॉलेजमधील प्रवेश २७ जूनला समजणारआॅनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत २१ जून रोजी विद्यार्थ्यांची प्राथमिक यादी जाहीर केली जाणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना एकूण विद्यार्थ्यांमध्ये आपला क्रमांक कुठे आहे हे समजू शकेल. आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, ही माहिती २७ जून रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम गुणवत्ता यादीतूनच समजू शकणार आहे.विद्यार्थ्यांना पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयच्या संकेतस्थळावर स्वत:च्या आॅनलाइन प्रवेश अर्जाचा क्रमांक टाकून आपली माहिती तपासता येईल. त्यात वैयक्तिक माहिती, दहावीत मिळालेले गुण आदी गोष्टी तपासता येतील. तसेच अर्ज भरलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी आपला क्रमांक कितवा आहे, हेसुद्धा विद्यार्थ्यांना समजू शकेल. अर्जात काही दुरुस्ती असल्यास विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्रांना भेट द्यावी, असे शिक्षण सहायक संचालक मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.