शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

निवले आंदोलन; पेटले फड!--पुण्यात उद्रेक, कऱ्हाडात शांतता

By admin | Updated: January 14, 2015 23:51 IST

मनात आग... उसात जाळ !

प्रमोद सुकरे -कऱ्हाडऊसदराचा प्रश्न निकालात निघाला नसतानाही यावर्षी मोळ्या गव्हाणीत पडल्या. गेल्या काही वर्षांत प्रथमच असे झाले. गाळप सुरू झाल्यानंतर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या साखर भवनात राडा केल्यामुळे ऊसदराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. पुण्यासह सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन सुरू असताना गतवर्षी आंदोलनाचे केंद्र बनलेल्या कऱ्हाडात मात्र शांतता दिसते आहे. एकही कार्यकर्ता ऊसदराबाबत आंदोलन करायला किंवा बोलायलाही तयार नाही.गतवर्षी ‘स्वाभिमानी’ने कऱ्हाडला आंदोलनाचे केंद्र बनविले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे ‘होमटाऊन’ असल्याने सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्तेही कऱ्हाडात दाखल झाले होते. काही दिवस पाचवड येथे धरणे आंदोलन केल्यानंतर आंदोलनकांनी संयम सोडला. रस्त्यावर उतरून जाळपोळ, दगडफेक करीत महामार्ग रोखला. हळूहळू आंदोलनाचे लोण इतर जिल्ह्यांत पोहोचले. आंदोलनकांनी महामार्गासह राज्यमार्ग व गावागावातील अंतर्गत रस्त्यांवर जाळपोळ केली. झाडे पाडून रस्ते रोखले. सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान त्यावेळी झाले होते. मात्र, काही दिवसांतच पोलीस कारवाईचा भुंगा आंदोलनकांच्या मागे लागला. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर अनेक कलमे लावली. त्यामुळे ‘मांडवाखालून’ जाताना प्रत्येक कार्यकर्त्याला त्रास झाला.यावर्षीही ऊसदराचा प्रश्न मिटत नाही, तोपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा संघटनांनी घेतला होता. मात्र, त्यात एकवाक्यता नसल्याने कारखाने सुरू झाले. दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी दराचा प्रश्न मिटलेला नाही. अशातच दोन दिवसांपूर्वी ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या साखर भवनात तोडफोड केली. त्यामुळे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या आंदोलनाचे लोण सातारा जिल्ह्यात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, अद्याप कोठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते अद्याप शांतच आहेत. श्रेष्ठींशी बोलतो!स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता ‘येत्या दोन दिवसांत पुण्याला जाऊन पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही गेलो होतो; मात्र त्यांच्याकडून कोणताही आदेश आम्हाला मिळाला नव्हता. आता पुन्हा आम्ही जाणार असून त्यावेळी जो आदेश मिळेल त्यानुसार आंदोलनाची दिशा ठरवू,’ असे त्यांनी सांगितले.मनात आग... उसात जाळ !संजय कदम - वाठार स्टेशन ‘दुष्काळात तेरावा’ अशी यंदाच्या ऊसगाळप हंगामाची गत झाली आहे. ७० ते ७५ दिवस झाले तरी अद्याप ऊसदराला मुहूर्त मिळालेला नाही. दोन महिन्यांनी जाग आलेल्या संघटनांनी आंदोलनाची ठिणगी टाकल्याने यावर्षी तोडणीविना उसाचे क्षेत्र शिल्लक राहण्याची धास्ती शेतकऱ्यांना लागली आहे. अशातच एप्रिल-मे महिन्यात पेटणारे उसाचे फड जानेवारीत कडाक्याच्या थंडीत का पेटत आहेत? यामागे नक्की कोणती परिस्थिती आहे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.गतवर्षीच्या हंगामाएवढेच क्षेत्र या हंगामात कारखानदारांपुढे आहे. हे क्षेत्र वेळेत संपविण्याची त्यांना घाई आहे, तर वर्षभर पोटच्या मुलाप्रमाणे जपलेला ऊस वेळेत तुटून जावा, यासाठी शेतकऱ्यांची घाई असल्याने ऊस घालवण्यासाठी दराचा किंचितही विचार न करता मिळेल त्या कारखान्याच्या मर्जीप्रमाणे ऊस घातला जात आहे. जिल्ह्याची सद्य:स्थिती पाहता ‘रयत’ वगळता सर्वच कारखान्यांनी हंगामाचा प्रारंभ केला आहे. आजअखेर जवळपास २३ लाख ७७ हजार ९७० टन उसाचे गाळप पूर्ण केले असून, जवळपास ४० ते ४५ लाख टन उसाचे गाळप शिल्लक आहे. ही परिस्थिती पाहता मे किंवा १५ जूनपर्यंत हे संपूर्ण गाळप पूर्ण होईल, अशी परिस्थिती आहे. यंदा ऊसतोड मजुरांची संख्या मुबलक आहे. गाळपक्षमतेप्रमाणे सर्वच कारखान्यांचे गाळप सुरू आहे. त्यामुळे ऊस शिल्लक राहणार नाही, असा विश्वास कारखानदार व्यक्त करीत आहेत. मग तरीही उसाच्या फडात आग का दिसत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ऊसतोड लवकर व्हावी यासाठी सामान्यत: एप्रिल-मे महिन्यात ऊस पेटविण्याचे प्रमाण वाढल्याचे अलीकडच्या काही वर्षांत दिसून आले आहे. तोडकऱ्यांचा वेग त्यावेळी कमी झालेला असतो. परंतु सध्या ऐन थंडीत ऊस पेटण्यामागे नैसर्गिक कारण आहे की अन्य काही, असा प्रश्न आहे. ऊस पेटल्यानंतर कारखाना त्वरित तोड देतो, ही शेतकऱ्यांची मानसिकता आहे. परंतु तोडणी कार्यक्रमापेक्षा तीन महिने अगोदर ऊस पेटला तर दरात प्रतिटन किमान ३०० रुपये आणि दोन महिने अगोदर पेटला तर प्रतिटन २०० रुपये कपात कारखाने करतातच. त्यामुळे इतक्या लवकर शेतकरी ऊस पेटवू शकत नाही.परंतु बऱ्याच वेळा उसाच्या फडातून गेलेल्या विजेच्या तारांमधून ठिणग्या पडून तसेच शेजारच्या तुटलेल्या फडाची पाचट पेटविल्यानंतर निष्काळजीपणामुळे आगी लागतात. यावर्षी भारनियमनामुळे कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना उसाला पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे फडाशेजारीच शेकोट्या पेटविल्या जात आहेत.दुसरीकडे, हंगामाच्या मध्यावरच ऊसदरासाठी आंदोलनाची ठिणगी पडल्याने अगोदरच १५ ते २० दिवस लांबणीवर गेलेला हंगाम आणखी लांबणीवर पडण्याची धास्ती घेतल्याने शिल्लक उसाच्या फडात आग भडकत असल्याचीही चर्चा जोर धरत आहे.यंदाच्या हंगामात कोणत्याच कारखान्याची तोडणी यंत्रणा कमी नाही. त्यामुळे क्षमतेप्रमाणे गाळप होत आहे. ऊस लागवडीच्या पद्धतीत भविष्यात बदल होऊन कारखान्यांच्या कार्यक्रमानुसार लागवड केल्यास ऊस वेळेत तोडता येईल.- विजय वाबळे, कार्यकारी संचालक, किसन वीर साखर कारखानाजिल्ह्यात यावर्षी ६५ ते ७० लाख टन उसाचे गाळप अपेक्षित आहे. यापैकी २३ लाखांचे गाळप पूर्ण झाले असून, उर्वरित गाळप मेअखेर पूर्ण होईल. उसाचा अजून तरी पीक विम्यात समावेश नाही. परंतु भविष्यात तो होण्याची गरज आहे.- पांडुरंग साठे, सहसंचालक, साखर संकुल पुणे