शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अध्यक्षीय भाषण रचेल इतिहास!

By admin | Updated: January 10, 2016 01:00 IST

गेल्या ८८ वर्षांमध्ये संमेलनाध्यक्षांच्या भाषणांमध्ये ज्या मुद्द्यांना साधा स्पर्शही झाला नाही, अशा विषयावरील अध्यक्षीय भाषण यंदा श्रोत्यांना ऐकायला मिळेल. समाजातील तळागाळातील

पुणे : गेल्या ८८ वर्षांमध्ये संमेलनाध्यक्षांच्या भाषणांमध्ये ज्या मुद्द्यांना साधा स्पर्शही झाला नाही, अशा विषयावरील अध्यक्षीय भाषण यंदा श्रोत्यांना ऐकायला मिळेल. समाजातील तळागाळातील प्रवाहाचा साहित्यातील सहभाग, सर्व चळवळींचा ऊहापोह भाषणात असेल, असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.ते म्हणाले, अध्यक्षीय भाषण संमेलनाचा कणा असतो. त्यात केवळ साहित्यच नव्हे, तर सामाजिक, राजकीय बाबींची नोंदही व्हायला हवी. कारण, साहित्याचा प्रवाह सर्वदूर पोहोचलेला असतो. त्यामुळेच मी अत्यंत विचार आणि अभ्यास करून ११० पानांचे अध्यक्षीय मनोगत तयार केले आहे. त्यामध्ये साहित्याच्या प्रत्येक प्रवाहातील, स्तरांतील घटकांची दखल घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपापल्या भाषेमध्ये उत्तम वैचारिक लेखन करणारे तरुण खेड्यापाड्यात पाहायला मिळतात. परंतु ते प्रकाशझोतात येत नाहीत. आजवर कोणत्याही भाषणांमध्ये या प्रवाहांचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. साहित्याच्या व्यापकतेला न्याय देणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे अध्यक्षीय भाषण इतिहास रचणार आहे. ते पुढील ५० वर्षे लोकांच्या स्मृतिपटलावर कोरले जाईल. विरोधाचे शस्त्र आता प्रत्येक जण उठून हाती घेत आहे; पण, हा विरोध माझे विचार बदलू शकणार नाही. मी सत्यवादी असल्याने समाजातील आणि साहित्यातील सत्य परखडपणे मांडण्याचा माझा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अध्यक्षाला बोलण्यासाठी केवळ १५ मिनिटे देणे, योग्य नाही. त्यामुळे मी माझी नाराजी साहित्य महामंडळाकडे नोंदवली आहे. मुलाखतीतील काही वेळ भाषणासाठी देण्यासंदर्भातही मी मागणी केली आहे.- श्रीपाल सबनीस, नियोजित अध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य संमेलन‘मॉर्निंग वॉक’चे दोन अर्थसनातन संस्थेचे संजीव पुनावळेकर यांनी सबनीस यांना ‘मॉर्निंग वॉक’चा सल्ला दिला. त्यावर पवार म्हणाले, त्याचे दोन्ही बाजूने अर्थ निघतात. धमकीपण होऊ शकते आणि सल्लाही होऊ शकतो. परंतु असा सल्ला देऊन कोणीही राज्यातील वातावरण गढूळ करूनये.वाद थांबवावा - अजित पवारलोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. विचारांची लढाई विचारानेच लढायला हवी. पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे संमेलनाच्या अध्यक्षांच्या वक्तव्यांचा वाद जास्त ताणू नका, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे व्यक्त केले. महापालिका शिक्षण मंडळातर्फे आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण त्यांच्या हस्ते झाले.