शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपद वाद हायकोर्टात

By admin | Updated: October 20, 2015 02:58 IST

ल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे (एफटीआयआय) अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीचा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. नियुक्तीच्या विरोधात

मुंबई : फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे (एफटीआयआय) अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीचा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. नियुक्तीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेला संप संपवावा आणि भविष्यात या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्तीसाठी पारदर्शक धोरण आखण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालय, गृह मंत्रालय, राज्य सरकार आणि एफटीआयआयच्या विद्यार्थी प्रतिनिधीला सोमवारी उच्च न्यायालयाने नोटीस बजावली.सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत धांडा यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्या. व्ही.एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. याचिकेत असलेल्या सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावत खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर ठेवली आहे. केंद्र सरकारला या संपावर तोडगा काढण्याचे आदेश द्यावेत. जे विद्यार्थी लेक्चरला बसू इच्छितात त्यांना पोलीस संरक्षण द्यावे; तसेच अशा प्रकारच्या संस्थांवर अध्यक्षांची नेमणूक करण्यासाठी केंद्र सरकारला पारदर्शक धोरण आखण्याचे आदेश द्यावेत अशा मागण्या जनहित याचिकेद्वारे करण्यात आल्या आहेत. १८ विद्यार्थी लेक्चरला बसण्यास तयार आहेत. त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. मुलांचे हित लक्षात घेता खंडपीठाने तसे निर्देश द्यावेत, अशी मागणीही धांडा यांनी केली.सर्व प्रतिवाद्यांना याचिका पाठवण्यात आल्यानंतर आणि त्यांची बाजू ऐकल्यानंतरच निर्देश देण्यात येतील, असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांनंतर ठेवली. चौहान यांची नियुक्ती केल्याने विद्यार्थ्यांनी १२ जूनपासून संप पुकारला. एफटीआयआयचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे चौहान यांनी नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या संपामुळे सर्व कॅम्पस उपक्रम बंद पडले आहेत. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांची मागणी काय आहे?एफटीआयआयच्या अध्यक्षपदी टी.व्ही. अ‍ॅक्टर गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली. विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी चौहान यांच्यापेक्षा अधिक अनुभवी व हुशार अभिनेत्याची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे, असे धांडा यांचे वकील जयप्रकाश धांडा यांनी खंडपीठाला सांगितले.