शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

अध्यक्षपद वाद हायकोर्टात

By admin | Updated: October 20, 2015 02:58 IST

ल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे (एफटीआयआय) अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीचा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. नियुक्तीच्या विरोधात

मुंबई : फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे (एफटीआयआय) अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीचा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. नियुक्तीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेला संप संपवावा आणि भविष्यात या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्तीसाठी पारदर्शक धोरण आखण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालय, गृह मंत्रालय, राज्य सरकार आणि एफटीआयआयच्या विद्यार्थी प्रतिनिधीला सोमवारी उच्च न्यायालयाने नोटीस बजावली.सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत धांडा यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्या. व्ही.एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. याचिकेत असलेल्या सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावत खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर ठेवली आहे. केंद्र सरकारला या संपावर तोडगा काढण्याचे आदेश द्यावेत. जे विद्यार्थी लेक्चरला बसू इच्छितात त्यांना पोलीस संरक्षण द्यावे; तसेच अशा प्रकारच्या संस्थांवर अध्यक्षांची नेमणूक करण्यासाठी केंद्र सरकारला पारदर्शक धोरण आखण्याचे आदेश द्यावेत अशा मागण्या जनहित याचिकेद्वारे करण्यात आल्या आहेत. १८ विद्यार्थी लेक्चरला बसण्यास तयार आहेत. त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. मुलांचे हित लक्षात घेता खंडपीठाने तसे निर्देश द्यावेत, अशी मागणीही धांडा यांनी केली.सर्व प्रतिवाद्यांना याचिका पाठवण्यात आल्यानंतर आणि त्यांची बाजू ऐकल्यानंतरच निर्देश देण्यात येतील, असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांनंतर ठेवली. चौहान यांची नियुक्ती केल्याने विद्यार्थ्यांनी १२ जूनपासून संप पुकारला. एफटीआयआयचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे चौहान यांनी नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या संपामुळे सर्व कॅम्पस उपक्रम बंद पडले आहेत. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांची मागणी काय आहे?एफटीआयआयच्या अध्यक्षपदी टी.व्ही. अ‍ॅक्टर गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली. विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी चौहान यांच्यापेक्षा अधिक अनुभवी व हुशार अभिनेत्याची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे, असे धांडा यांचे वकील जयप्रकाश धांडा यांनी खंडपीठाला सांगितले.