अहमदनगर : महात्मा फुले, शाहू, आंबेडकर यांची नावे घेऊन महाराष्ट्रात सध्या ‘लक्ष्मीदर्शन’ हा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. पाटबंधारे खात्यात हे अधिक प्रमाणात पाहायला मिळाले. जनतेचा पैसा विकासासाठी वापरला पाहिजे, रोजगारनिर्मिती केली पाहिजे, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्षपणो राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे कल्याण-विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गाच्या मजबुतीकरणाचे त्यांनी भूमिपूजन केले. यावेळी झालेल्या पाणी परिषदेमध्ये ते बोलत होते.
पारनेर परिसरातील दुष्काळी भागासाठी स्वतंत्र पॅकेज तयार करण्यात येईल. त्यासाठी मागाल तेवढा पैसा देऊ, असे आश्वासन गडकरी यांनी दिले. सरकार आणि परमेश्वराच्या भरवशावर न राहता शेतक:यांनी पावसाचे पाणी अडविण्याचे काम सुरू करावे. त्यासाठी मागाल तेवढा निधी देण्याची तयारी आहे, असे ते म्हणाले.
गडकरी यांच्या सिमेंटच्या कंपन्या असल्यामुळेच राज्यात सिमेंटचे रस्ते करण्यात येत आहेत, अशी टीका
होत आहे. कोणाला काय लिहायचे ते लिहू द्या, मात्र सिमेंट कंपन्या डांबरापेक्षाही कमी दरात सिमेंट द्यायला तयार आहेत. त्यामुळे रस्ते चांगलेच होतील याची खात्री असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कल्याण-विशाखापट्टणम् हा संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग 2,9क्क् कोटी रुपये खर्चाचा आहे. राज्यातील त्याचा टप्पा 2क्16 च्या अखेरीस पूर्ण होईल. दरम्यान ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखी मार्गाचेही सिमेंट क्राँक्रिटीकरण होणार आहे, अशी माहितीही गडकरी यांनी दिली. (प्रतिनिधी)
पुण्यात विद्वान चांगले
विकासकामांत ज्यांना 1क् लोकांचा पाठिंबा नाही त्यांची बातमी तुम्ही 2क् कॉलम छापता, अशी वृत्तपत्रंवर टीका करीत गडकरी यांनी विकासकामात अडथळा आणणा:यांना लक्ष्य केल़े ते म्हणाले, मुंबई -पुणो महामार्गाच्या कामावर 125 जणांनी रिट पिटीशन दाखल केले. आता आपण निर्णय घेतला आह़े झाडे तोडायची नाही तर त्याचे पुनर्वसन करायच़े विद्वानांचे शहर असल्याचा जसा फायदा आहे, तसेच तोटेही अनेक आहेत़ सुदैवाने पुण्यातील विद्वान चांगले आहेत़