शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

रंकाळ्याच्या सव्वाशे कोटीच्या ‘डीपीआर’चे सादरीकरण

By admin | Updated: July 15, 2015 00:41 IST

दुसरा टप्पा : कामासाठी केंद्राकडे निधी मागणार

कोल्हापूर : राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून रंकाळा प्रदूषणमुक्तीसाठी पहिल्या टप्प्यात ८.६६ कोटींचा निधी आला. त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली. दुसऱ्या टप्प्यातील १२५ कोटींच्या निधीचे वेध महापालिकेला लागले आहेत. खासगी कंपनीने केलेल्या सविस्तर विकास आराखड्याचे मंगळवारी आयुक्त पी. शिवशंकर यांच्यापुढे सादरीकरण झाले. केंद्राकडे लवकरच या निधीची मागणी केली जाणार आहे.संवर्धन योजनेतून पहिल्या टप्प्यात रंकाळ्यासाठी आलेल्या निधीतून साडेचार कोटी रुपयांची तांबट कमान ते रंकाळा टॉवरपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम चार वर्षांनंतर पूर्ण झाले. अद्याप निसर्गकेंद्र प्राथमिक अवस्थेत आहेत. गाळाचे परीक्षण पूर्ण झाले असले तरी तो काढण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबविली गेली नाही. रंकाळ्यात शाम सोसायटी, देशमुख कॉलनी, सरनाईक कॉलनी, आदी नाल्यांतून सांडपाणी अजूनही थेट रंकाळ्यात मिसळते. रंकाळा जलशुद्धिकरण, निर्माल्य कुंडाचे बांधकाम, ओव्हर फ्लो कमान, आदी कामे वगळता एकही भरीव काम पहिल्या टप्प्यात झाले नाही. साडेआठ कोटी खर्च करूनही रंकाळ्याच्या दुखण्यात कसूभरही फरक पडलेला नसल्याचे चित्र असताना आता प्रशासनास सव्वाशे कोटी रुपयांच्या निधीचे वेध लागले आहेत.दुसऱ्या टप्प्यातील ड्रेनेजलाईन टाकणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, संरक्षण कठड्यांची उंची वाढविणे, गाळ काढणे किंवा स्थूल ठेवण्यासाठी उपाययोजना, निर्गत पाण्याच्या व्हॉल्वची दुरुस्ती, पदपथ, सांडपाणी रोखणे, रंकाळ्याचे मजबुतीकरण करणे, आदींसाठी तब्बल राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून तब्बल १२५ कोटींचा निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या दुसऱ्या टप्प्यातील कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याच्या सादरीकरणावेळी उपायुक्त विजय खोराटे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, इस्टेट आॅफिसर संजय भोसले, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, उपअभियंता एस. बी. कुलकर्णी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) रंकाळ्याचे संपूर्ण संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे.  दर तीन महिन्याला रंकाळ्याच्या पाण्यात जंतुसंसर्ग, पाण्याचा रंग बदलणे, दुर्गंधी, आदी व्याधी जडतात. मूळ दुखणे सोडून डागडुजी करण्याकडेच प्रशासनाचा कल आहे.राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून पाहिजे तितका निधी रंकाळ्यासाठी उपलब्ध होऊ शकतो.

मागील पहिल्या टप्प्यातील कामाचा हिशेब केंद्र शासनास सादर केल्यानंतरच येत्या सहा महिन्यांत हा निधी पालिकेला मिळण्याची शक्यता आहे.तांबट कमान ते टॉवरपर्यत पाईपलाईन टाकण्याचे चार वर्षांनीकाम पूर्णसाडेआठ कोटी खर्च करुनही रंकाळ्याच्या दुखण्यात कसूभरही फरक पडलेला नाही. दुसऱ्या टप्प्यातील कामाचा आराखडा तयार केला आहे.