शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
3
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
4
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
5
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
6
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
7
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
8
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
9
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा नावं
10
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
11
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
12
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...
13
समंथाशी घटस्फोटानंतर कशी झाली शोभिताची एन्ट्री? नागा चैतन्यने अख्खी लव्हस्टोरी सांगितली
14
Gold Silver Price: ₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
15
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
16
आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!
17
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
18
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
19
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
20
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट

अमरावतीत १५ लाख मराठयांची उपस्थिती

By admin | Updated: September 22, 2016 19:24 IST

कोपर्डी प्रकरणाचा निषेध, अ‍ॅट्रॉसिटीमधील बदल आणि मराठा समाजाला आरक्षण, या प्रमुख मागण्यांसाठी गुरूवारी निघालेल्या मराठा मूक क्रांती मोर्चाला अमरावतीत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

ऑनलाइन  लोकमतअमरावती, दि. २२ : कोपर्डी प्रकरणाचा निषेध, अ‍ॅट्रॉसिटीमधील बदल आणि मराठा समाजाला आरक्षण, या प्रमुख मागण्यांसाठी गुरूवारी निघालेल्या मराठा मूक क्रांती मोर्चाला अमरावतीत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अकोल्याचे आकडे ब्रेक करणाऱ्या या मोर्चात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून लाखो मराठे अंबानगरीत दाखल झाले होते. महिला, तरूणी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग भुवया उंचावणारा होता. मोर्चात १५ लाखांपेक्षा अधिक लोक सहभागी झाल्याचे आकडे आहेत. या मोर्चातून मराठ्यांनी अमरावतीत आदर्श इतिहास घडविला.

नेहरू मैदानातून सकाळी ११ वाजताच्या सुमारास मराठ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली. जयस्तंभ, मालवीय, इर्विन चौकमार्गे हा मोर्चा दुपारी दीडच्या सुमारास गर्ल्स हायस्कूल चौकात पोहोचला. निषेधाचे प्रतीक असलेल्या काळ्या वेशातील पाच मराठा मुलींनी तेथे प्रातिनिधिक स्वरूपात भावना व्यक्त केल्यात. नंतर कोपर्डी येथील पीडितेसह उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना मूक श्रद्धाजंली वाहण्यात आली. त्यानंतर चार मुलींनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिले.

अमरावती शहराचा रंगच जणू सकाळपासून भगवा झाला होता. शिवछत्रपतींच्या सुराज्याची, स्वराज्याची आठवण करून देणारे भगवे झेंडे सर्वत्र लहरत होते. शहरात न मावणाऱ्या मराठ्यांच्या सहभागानंतरही जराही बेशिस्त या मोर्चादरम्यान आढळली नाही. जणू सर्वजण सैनिक दलातील प्रशिक्षित व्यक्ती असावेत या पद्धतीने अतिशय शिस्तबध्दरीत्या मोर्चा मर्गक्रमण करीत होता. मोर्च्यात सहभागी झालेल्या मराठ्यांनी डोक्यावर पांढरी टोपी, दंडाला काळी फित तर काहींनी काळा पेहराव केला. अमरावतीच्या इतिहासात हा मोर्चा 'रेकॉर्डब्रेक' ठरला.

सकाळी आठ वाजतापासूनच शहराच्या चारही बाजूंनी मराठ्यांच्या झुंडीच्या झुंडी शहरात दाखल होत होत्या. गर्ल्स हायस्कूल चौकामध्ये ज्यावेळी मराठा महिला एकत्र आल्यात, त्याचवेळी शहरातील राजकमल चौक, पंचवटी चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यानेही लाखो मराठ्यांची गर्दी उसळली होती. या गर्दीला मराठा हा एकमेव चेहरा होता. शहरातील सर्वच व्यापारी प्रतिष्ठानांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून मराठा मोर्चात अनौपचारिक सहभाग नोंदवला. १५ लाख मराठ्यांची गर्दी रस्त्यावर असूनही पोलिसांची जराही तारांबळ उडाली नाही.

पूर्व उपयायोजना म्हणूून शहरातील शैक्षणिक संस्थांनी गुरूवारी विद्यार्थ्यांना सुटी जाहीर केली होती. महापालिकेच्या सर्व शाळा पहिल्या सत्रात बंद ठेवण्यात आल्यात. महापालिकेची शहर बस सेवा बंद होती. दळवळणाची अन्य यंत्रणाही बंद ठेवण्यात आली होती. शिस्त, आदर्श नियोजन, महिला-तरूणींना प्राधान्य, मोर्चेकऱ्यांची काळजी, पाणी, प्रथोमचाराची व्यवस्था, मोर्च्यानंतरची स्वच्छता हे सर्व बघितल्यावर आपण भारतातच आहोत की कुण्या अतिप्रगत देशात, असा प्रश्न उपस्थिततांच्या मनाला स्पर्शून जायचा.नियोजन फत्तेचार सप्टेंबरपासून मोर्चाच्या यशस्वीतेसंदर्भात नियोजन बैठकी सुरू होत्या. ते नियोजन गुरूवारी फत्ते झाले. मोर्चाची वेळ सकाळी ११ वाजताची असली तरी सकाळी आठपासूनच स्वयंमस्फूर्तीने जथ्ये नेहरू मैदान आणि राजकमल चौकाकडे झेपावले गेलेत. काहीवेळाच वातावरण मराठामय झाले. नेहरू मैदानातून निघालेला हा मोर्चा गर्ल्स हायस्कूल चौकात विसावला. सर्वात पुढे मुली आणि महिला लाखोंच्या संख्येत होत्या. त्यानंतर वकील, डॉक्टर, विद्यार्थी तरूण, सर्वसामान्य नागरिक आणि शेवटी राजकीय पुढारी, अशी मोर्चाची रचना होती. लाखांवर भगवे झेंडे घेऊन तरूण सहभागी झाले होते. 'एक मराठा, लाख मराठा', उल्लेखाच्या टोप्यांनी जान फुंकली होती.घालून दिला आदर्शअमरावतीच्या मूक मोर्चाने एक आदर्श उदारण घालून दिले. कोणतीही घोषणाबाजी, हुल्लडबाजी दिसून आली नाही. लोकांना त्रास होईल, असे कोणतेच कृत्य मोर्चात पहावयास मिळाले नाही. सर्वजण शांततेत मोर्चात सहभागी होत होते. मात्र लोकांच्या चेहऱ्यावर मूक आक्रोश व्यवस्थेविरूद्धची चीड आणि उद्रेक स्पष्ट दिसत होता.