शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

आगामी निवडणुकीसाठी मनसेची तयारी? थेट मेलद्वारे संपर्क करण्याचे राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:49 IST

आपसातील गट - तट खपवून घेणार नाही. कोणत्याही पदाधिका-याची अथवा कोणाचीही तक्रार किंवा कोणतीही समस्या असल्यास आपल्याला थेट वैयक्तिक मेल आयडीवर संपर्क करुन सूचना करु शकता

ठाणे: आपसातील गट - तट खपवून घेणार नाही. कोणत्याही पदाधिका-याची अथवा कोणाचीही तक्रार किंवा कोणतीही समस्या असल्यास आपल्याला थेट वैयक्तिक मेल आयडीवर संपर्क करुन सूचना करु शकता, असे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. ठाण्यासह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये मनसेला पराभवाची झळ बसल्यानंतर संघटनेत काही बदल करण्याच्या दृष्टीने त्यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले.

ठाणे महापालिका निवडणूकीत मनसेला भोपळाही फोडता आला नाही. अगदी नाशिकमध्येही पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबई आणि कल्याण डोंबिवलीत तर अगदी मोजक्या जागांवर मनसेला विजय मिळविता आला. या सर्वच पराभवांच्या पार्श्वभूमीवर संघटनेत शहर, जिल्हा आणि राज्य पातळीवर बदल करण्याचे संकेत राज ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईतही काही महत्वपूर्ण बदल केल्यानंतर त्यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. विशेष म्हणजे यावेळी प्रथमच त्यांनी शहर आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकाºयांच्या तक्रारी तळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून जाणून घेतल्या. रविवारी सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास त्यांनी प्रथम ठाणे शहर संपर्क अध्यक्ष अभिजित पानसे, शहराध्यक्ष अविनाश जाधव, प्रदेश सचिव प्रमोद पाटील, पक्ष प्रवक्ता संदीप देशपांडे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदीप पाचंगे आदी २० ते २५ पदाधिकाºयांशी चर्चा केली. त्यानंतर पाचपाखाडी येथील एका खासगी सभागृहात त्यांनी सर्व प्रमुख पदाधिका-यांना बाहेर थांबण्याचे फर्मान दिले. कोणत्याही कार्यकर्त्यांची पदाधिका-याविरुद्ध तक्रार असेल तर तो मोकळेपणाने बोलू शकेल, यासाठी त्यांनी पदाधिकाºयांना बाहेर थांबण्याचे हे आदेश दिले. साधारण दोन ते अडीच तास चाललेल्या या मेळाव्यात राज यांनी थेट शाखा अध्यक्ष, उप शाखाअध्यक्ष, गट अध्यक्ष अशा अगदी शेवटच्या पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनेत काय बदल अपेक्षित आहेत, याबाबतच्या सूचना जाणून घेतल्या. यावेळी काही विधानसभा अध्यक्ष तसेच पदाधिकाºयांविरुद्धही कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपण आता पक्षात राज्यभर बदल करणार आहे. प्रत्येकाशी संवाद साधणे शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही आयोजिलेले कार्यक्रम किंवा कोणत्या पदाधिका-याविरुद्धची वास्तववादी तक्रार असल्यास थेट आपल्याकडे ( connectrajthackeray@gmail.com) या मेल आयडी वर संपर्क करु शकता, असे आवाहन त्यांनी केले. ठाकरे यांच्या या आवाहनामुळे कार्यकर्त्यांमध्येही एक प्रकारे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आपण आता थेट राज ठाकरे साहेबांच्या संपर्कात राहणार, या कल्पनेनेच अनेकांनी या संकल्पनेचे समाधान व्यक्त करीत स्वागतही केले. अर्थात, यातून नेमेके कोणते बदल होतील आणि कोणत्या पदाधिकाºयाची गच्छंती होईल किंवा कोणाच्या पथ्यावर पडेल, हे आगामी काळातच स्पष्ट होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी मात्र कोणतेही भाष्य न करता राज यांनी मुंबईकडे प्रयाण केले. 

टॅग्स :Maharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाRaj Thackerayराज ठाकरे