शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

आगामी निवडणुकीसाठी मनसेची तयारी? थेट मेलद्वारे संपर्क करण्याचे राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:49 IST

आपसातील गट - तट खपवून घेणार नाही. कोणत्याही पदाधिका-याची अथवा कोणाचीही तक्रार किंवा कोणतीही समस्या असल्यास आपल्याला थेट वैयक्तिक मेल आयडीवर संपर्क करुन सूचना करु शकता

ठाणे: आपसातील गट - तट खपवून घेणार नाही. कोणत्याही पदाधिका-याची अथवा कोणाचीही तक्रार किंवा कोणतीही समस्या असल्यास आपल्याला थेट वैयक्तिक मेल आयडीवर संपर्क करुन सूचना करु शकता, असे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. ठाण्यासह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये मनसेला पराभवाची झळ बसल्यानंतर संघटनेत काही बदल करण्याच्या दृष्टीने त्यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले.

ठाणे महापालिका निवडणूकीत मनसेला भोपळाही फोडता आला नाही. अगदी नाशिकमध्येही पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबई आणि कल्याण डोंबिवलीत तर अगदी मोजक्या जागांवर मनसेला विजय मिळविता आला. या सर्वच पराभवांच्या पार्श्वभूमीवर संघटनेत शहर, जिल्हा आणि राज्य पातळीवर बदल करण्याचे संकेत राज ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईतही काही महत्वपूर्ण बदल केल्यानंतर त्यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. विशेष म्हणजे यावेळी प्रथमच त्यांनी शहर आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकाºयांच्या तक्रारी तळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून जाणून घेतल्या. रविवारी सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास त्यांनी प्रथम ठाणे शहर संपर्क अध्यक्ष अभिजित पानसे, शहराध्यक्ष अविनाश जाधव, प्रदेश सचिव प्रमोद पाटील, पक्ष प्रवक्ता संदीप देशपांडे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदीप पाचंगे आदी २० ते २५ पदाधिकाºयांशी चर्चा केली. त्यानंतर पाचपाखाडी येथील एका खासगी सभागृहात त्यांनी सर्व प्रमुख पदाधिका-यांना बाहेर थांबण्याचे फर्मान दिले. कोणत्याही कार्यकर्त्यांची पदाधिका-याविरुद्ध तक्रार असेल तर तो मोकळेपणाने बोलू शकेल, यासाठी त्यांनी पदाधिकाºयांना बाहेर थांबण्याचे हे आदेश दिले. साधारण दोन ते अडीच तास चाललेल्या या मेळाव्यात राज यांनी थेट शाखा अध्यक्ष, उप शाखाअध्यक्ष, गट अध्यक्ष अशा अगदी शेवटच्या पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनेत काय बदल अपेक्षित आहेत, याबाबतच्या सूचना जाणून घेतल्या. यावेळी काही विधानसभा अध्यक्ष तसेच पदाधिकाºयांविरुद्धही कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपण आता पक्षात राज्यभर बदल करणार आहे. प्रत्येकाशी संवाद साधणे शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही आयोजिलेले कार्यक्रम किंवा कोणत्या पदाधिका-याविरुद्धची वास्तववादी तक्रार असल्यास थेट आपल्याकडे ( connectrajthackeray@gmail.com) या मेल आयडी वर संपर्क करु शकता, असे आवाहन त्यांनी केले. ठाकरे यांच्या या आवाहनामुळे कार्यकर्त्यांमध्येही एक प्रकारे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आपण आता थेट राज ठाकरे साहेबांच्या संपर्कात राहणार, या कल्पनेनेच अनेकांनी या संकल्पनेचे समाधान व्यक्त करीत स्वागतही केले. अर्थात, यातून नेमेके कोणते बदल होतील आणि कोणत्या पदाधिकाºयाची गच्छंती होईल किंवा कोणाच्या पथ्यावर पडेल, हे आगामी काळातच स्पष्ट होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी मात्र कोणतेही भाष्य न करता राज यांनी मुंबईकडे प्रयाण केले. 

टॅग्स :Maharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाRaj Thackerayराज ठाकरे