शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

बुलडाणा लोकसभा मतदारसंघातही ‘नमो’ मंत्राचा ‘प्रताप’!

By admin | Updated: May 16, 2014 22:23 IST

प्रतापराव जाधव यांना ‘नमो’ मंत्र पावला असून, बुलडाण्यातील शिवसेनेचा झेंडा सलग तिसर्‍या निवडणुकीत डौलाने फडकत ठेवला आहे.

बुलडाणा : संपूर्ण देशात ह्यनमोह्ण मंत्राचा जयघोष सुरू असताना यामध्ये बुलडाणा लोकसभा मतदारसंघानेही आपला सूर मिसळवला आहे. राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची अटीतटीची लढाई होईल, अशी सर्वांची गणिते होती; मात्र ही गणिते सपशेल अपयशी ठरली, गेल्या लोकसभा निवडणुकीत २८ हजाराने विजयी झालेल्या प्रतापराव जाधव यांना ह्यनमोह्ण मंत्र पावला असून, यावेळी ते लाखाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. राष्ट्रवादीेचे कृष्णराव इंगळे यांचा त्यांनी १ लाख ५९ हजार ५७९ मतांनी पराभव केला असून, बुलडाण्यातील शिवसेनेचा झेंडा सलग तिसर्‍या निवडणुकीत डौलाने फडकत ठेवला आहे. आज सकाळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये सुरू झालेल्या मतमोजणीत टपाली मतदानापासून प्रतापरावांनी घेतलेले मताधिक्य हे ह्यइव्हीएमह्णमधुन सुद्धा तसेच बाहेर पडले. पहिल्या फेरीपासून प्रतापरावांनी मतांची घेतलेली आघाडी प्रत्येक फेरीत वाढत गेली. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कृष्णराव इंगळे हे त्यांचा लिड अखेरपर्यंत तोडू शकले नाही. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीसाठी सकाळपासून कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पहिल्या दोन फेरीतच निवडणुकीचा कौल स्पष्ट झाल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला तर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र सोडून दिले. विजयाचे आकडे पाहता मोदींची लाट अतिशय प्रभावीपणे चालली, हे स्पष्ट होते. शिवसेनेच्या मेहनतीला मोदी लाटेने यश मिळवून दिले. बुलडाण्याच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही निवडणुकीत कुणालाही इतक्या प्रमाणात मते मिळाली नाहीत. एकूण मतदानाच्या ५२ टक्के मते घेत प्रतापरावांनी केलेला हा ह्यप्रतापह्ण नव्या इतिहासाची नोंद ठरला असून, त्यामागे नमो मंत्र असल्याचे सर्वच मान्य करतात.

**या कारणांमुळे मिळाला विजय

*अँन्टी इन्कम्बन्सीमुळे असलेल्या नाराजीचा सामना प्रतापरावांनाही करावा लागला होता; मात्र मोदींची लाट या नाराजीपुढे वरचढ ठरली. प्रतापरावांनी घेतलेल्या मेहनतीला मोदींसाठी लोकांनी भरभरून मतांचे दान दिले.

*मराठाबहुल असलेल्या बुलडाण्यात प्रतापराव जाधव यांच्यासाठी जातीय समीकरण फायद्याचे ठरले. मराठा विरूद्ध मराठेत्तर अशी लढाई होणार नाही, याची दक्षता त्यांनी प्रचारात घेतली, ती यशस्वी ठरली.

*राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये असलेल्या समन्वयाचा अभाव, राष्ट्रवादीत असलेली नाराजी प्रतापरावांच्या पथ्यावर पडली. तर दुसरीकडे महायुतीमध्ये असलेल्या लहान-मोठय़ा कुरबुरी मोडून काढत महायुती एकसंघ ठेवण्यात प्रतापराव जाधव यशस्वी झालेत.