शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर यांची 'स्ट्रॅटेजी' आदित्य ठाकरेंनाही बनवणार मुख्यमंत्री ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 17:56 IST

प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसाठी रणनिती आखली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना लढवत असलेल्या मतदार संघांवर लक्ष केंद्रीत करून विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा उभी केली. तिच यंत्रणा आता प्रत्यक्षात शिवसेनेसाठी काम करत आहे.

मुंबई - २०१४ लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यानंतर राजकीय रणनितीकार म्हणून प्रशांत किशोर प्रसिद्धीच्या झोतात आले. मात्र अमित शाह यांच्या उदयानंतर किशोर यांना भाजपपासून वेगळं व्हावं लागलं. परंतु, भाजप सोडल्यानंतर प्रशांत किशोर यांचा राजकीय रणनितीकार म्हणून उदय झाला. त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार आणि आंध्रप्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघेही आपापल्या राज्याचे मुख्यमंत्री असून किशोर आता शिवसेनेचे राजकीय रणनितीकार आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. पूर्वीच्या आणि आताच्या शिवसेना पक्षात अनेक बदल दिसून येत आहेत. हा बदल प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीमुळेच झाल्याची टीका विरोधक करतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळीच पक्षाची स्ट्रॅटेजी ठरविण्यासाठी राजकीय विशेषज्ञ म्हणून प्रशांत किशोर यांना नियुक्त केले होते. त्यानुसारच आता शिवसेनेचे काम सुरू असल्याचे समजते.

प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसाठी रणनिती आखली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना लढवत असलेल्या मतदार संघांवर लक्ष केंद्रीत करून विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा उभी केली. तिच यंत्रणा आता प्रत्यक्षात शिवसेनेसाठी काम करत आहे.

दरम्यान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी आणि युवकांशी संवाद साधला आहे. याच यात्रेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे स्पष्ट केले. आदित्य यांची जन आशीर्वाद यात्रा किशोर यांच्या सांगण्यावरून असल्याचे समजते.

याआधी प्रशांत किशोर यांची स्ट्रॅटेजी २०१४ मध्ये नरेंद्र मोदींना त्यानंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांना आणि आंध्रप्रदेशात जगमोहन रेड्डी यांना फायदेशीर ठरली. नितीश आणि जगमोहन हे दोघेही आपापल्या राज्याचे मुख्यमंत्री आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता टिकविण्यासाठी किशोर काम करणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच किशोर यांचा करिष्मा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनविण्यासाठी फायदेशीर ठरणार का, हे येणारा काळच सांगेल.