शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

प्रशांत किशोर यांची 'स्ट्रॅटेजी' आदित्य ठाकरेंनाही बनवणार मुख्यमंत्री ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 17:56 IST

प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसाठी रणनिती आखली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना लढवत असलेल्या मतदार संघांवर लक्ष केंद्रीत करून विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा उभी केली. तिच यंत्रणा आता प्रत्यक्षात शिवसेनेसाठी काम करत आहे.

मुंबई - २०१४ लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यानंतर राजकीय रणनितीकार म्हणून प्रशांत किशोर प्रसिद्धीच्या झोतात आले. मात्र अमित शाह यांच्या उदयानंतर किशोर यांना भाजपपासून वेगळं व्हावं लागलं. परंतु, भाजप सोडल्यानंतर प्रशांत किशोर यांचा राजकीय रणनितीकार म्हणून उदय झाला. त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार आणि आंध्रप्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघेही आपापल्या राज्याचे मुख्यमंत्री असून किशोर आता शिवसेनेचे राजकीय रणनितीकार आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. पूर्वीच्या आणि आताच्या शिवसेना पक्षात अनेक बदल दिसून येत आहेत. हा बदल प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीमुळेच झाल्याची टीका विरोधक करतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळीच पक्षाची स्ट्रॅटेजी ठरविण्यासाठी राजकीय विशेषज्ञ म्हणून प्रशांत किशोर यांना नियुक्त केले होते. त्यानुसारच आता शिवसेनेचे काम सुरू असल्याचे समजते.

प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसाठी रणनिती आखली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना लढवत असलेल्या मतदार संघांवर लक्ष केंद्रीत करून विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा उभी केली. तिच यंत्रणा आता प्रत्यक्षात शिवसेनेसाठी काम करत आहे.

दरम्यान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी आणि युवकांशी संवाद साधला आहे. याच यात्रेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे स्पष्ट केले. आदित्य यांची जन आशीर्वाद यात्रा किशोर यांच्या सांगण्यावरून असल्याचे समजते.

याआधी प्रशांत किशोर यांची स्ट्रॅटेजी २०१४ मध्ये नरेंद्र मोदींना त्यानंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांना आणि आंध्रप्रदेशात जगमोहन रेड्डी यांना फायदेशीर ठरली. नितीश आणि जगमोहन हे दोघेही आपापल्या राज्याचे मुख्यमंत्री आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता टिकविण्यासाठी किशोर काम करणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच किशोर यांचा करिष्मा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनविण्यासाठी फायदेशीर ठरणार का, हे येणारा काळच सांगेल.