शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

प्रशांत किशोर यांची 'स्ट्रॅटेजी' आदित्य ठाकरेंनाही बनवणार मुख्यमंत्री ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 17:56 IST

प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसाठी रणनिती आखली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना लढवत असलेल्या मतदार संघांवर लक्ष केंद्रीत करून विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा उभी केली. तिच यंत्रणा आता प्रत्यक्षात शिवसेनेसाठी काम करत आहे.

मुंबई - २०१४ लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यानंतर राजकीय रणनितीकार म्हणून प्रशांत किशोर प्रसिद्धीच्या झोतात आले. मात्र अमित शाह यांच्या उदयानंतर किशोर यांना भाजपपासून वेगळं व्हावं लागलं. परंतु, भाजप सोडल्यानंतर प्रशांत किशोर यांचा राजकीय रणनितीकार म्हणून उदय झाला. त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार आणि आंध्रप्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघेही आपापल्या राज्याचे मुख्यमंत्री असून किशोर आता शिवसेनेचे राजकीय रणनितीकार आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. पूर्वीच्या आणि आताच्या शिवसेना पक्षात अनेक बदल दिसून येत आहेत. हा बदल प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीमुळेच झाल्याची टीका विरोधक करतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळीच पक्षाची स्ट्रॅटेजी ठरविण्यासाठी राजकीय विशेषज्ञ म्हणून प्रशांत किशोर यांना नियुक्त केले होते. त्यानुसारच आता शिवसेनेचे काम सुरू असल्याचे समजते.

प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसाठी रणनिती आखली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना लढवत असलेल्या मतदार संघांवर लक्ष केंद्रीत करून विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा उभी केली. तिच यंत्रणा आता प्रत्यक्षात शिवसेनेसाठी काम करत आहे.

दरम्यान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी आणि युवकांशी संवाद साधला आहे. याच यात्रेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे स्पष्ट केले. आदित्य यांची जन आशीर्वाद यात्रा किशोर यांच्या सांगण्यावरून असल्याचे समजते.

याआधी प्रशांत किशोर यांची स्ट्रॅटेजी २०१४ मध्ये नरेंद्र मोदींना त्यानंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांना आणि आंध्रप्रदेशात जगमोहन रेड्डी यांना फायदेशीर ठरली. नितीश आणि जगमोहन हे दोघेही आपापल्या राज्याचे मुख्यमंत्री आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता टिकविण्यासाठी किशोर काम करणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच किशोर यांचा करिष्मा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनविण्यासाठी फायदेशीर ठरणार का, हे येणारा काळच सांगेल.