शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

प्रसादला व्हायचंय आयएएस!; पहिल्याच प्रयत्नात उपजिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 03:12 IST

पहिल्याच प्रयत्नात ५८८ गुण मिळवून संपूर्ण राज्यात पहिला येण्याचा बहुमान मिळविल्याने सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

सातारा : केंद्रीय सेवा परीक्षेतून (यूपीएससी) आयएएस होण्याची इच्छा उपजिल्हाधिकारी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या कºहाडच्या प्रसाद चौगुले याने व्यक्त केली आहे.पहिल्याच प्रयत्नात ५८८ गुण मिळवून संपूर्ण राज्यात पहिला येण्याचा बहुमान मिळविल्याने त्याच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साताऱ्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शिकत असताना अनेक प्रशासकीय अधिकारी शाळेत येऊन मार्गदर्शन करायचे. या विद्यालयातच स्पर्धा परीक्षेचा पाया मजबूत झाला. आपणही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जावे, ही तेव्हापासूनच इच्छा होती. ती आज पूर्ण झाल्याचे समाधान वाटते, असेही त्याने सांगितले.प्रसाद चौगुले याचे प्राथमिक शिक्षण खावली (ता. सातारा) येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. कºहाड येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमधून त्याने अकरावी व बारावी पूर्ण केली. बारावीच्या परीक्षेत त्याला ८८ टक्के गुण मिळाले होते. या गुणांच्या बळावर प्रसादला कºहाडमधीलच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला. अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू असतानाच प्रसादची फियाट कंपनीमध्ये अभियंता म्हणून निवड झाली. २०१७ मध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली. पुण्यामध्ये फियाट कंपनीमध्ये नोकरी करतच प्रसादने स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास सुरू केला.पुण्यातील ज्ञानदीप करिअर अ‍ॅकॅडमीचे चांगले मार्गदर्शन लाभल्याचे त्याने सांगितले. तो विद्यानगर (कºहाड) येथे राहण्यास असून वडील महावितरणमध्ये आॅपरेटर आहेत. तर आई गृहिणी आहे. प्रसादच्या दोन बहिणींनी देखील अभियांत्रिकीची पदवी मिळविलेली आहे.‘आई-वडिलांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दोन बहिणी आणि मला उच्च शिक्षण दिले. त्यांचे स्वप्न पूर्ण केल्याचा अभिमान वाटत आहे,’ अशी भावना प्रसादने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.बारामतीच्या आरती पवारचेही यशबारामती : येथील २५ वर्षीय आरती पवार यांनी एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत एनटीबी प्रवर्गात मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्या सध्या बारामती नगरपरिषदेत करनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे सर्व शिक्षण शहरातील एमईएस हायस्कूल व विद्या प्रतिष्ठान येथे झाले. दोन वर्षांपासून रोज १० ते १२ तास कसून अभ्यास केल्याने यश मिळाले. अजून मेहनत करून आयएएस होण्याचे स्वप्न असल्याचेही तिने सांगितले. तिचे वडील राजेंद्र पवार हे झारगडवाडी येथे प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. तर आई गृहिणी आहेत.मोठी झेप घ्यायचीयवैद्यकीय सेवेपेक्षाही या क्षेत्रातील सेवेचे परीघ मोठे आहे, हे लक्षात आल्यानंतर आपण स्पर्धा परिक्षेकडे वळलो़ यश मिळाले तरी आणखी मोठी झेप घ्यायची आहे, अशी प्रतिक्रिया मागास प्रवर्गातून प्रथम आलेले उस्मानाबादमधील बोर्डा (कळंब) येथील डॉ. रवींद्र शेळके यांनी दिली.खडतर परिस्थितीवर मातनांदेड जिल्ह्यातील जोशी सांगवी येथील वसीमा शेख ही खुल्या वर्गातून राज्यात तिसरी आली आहे. आई मजुरीचे काम करते तर दोन भाऊ रिक्षा चालवतात. खडतर परिस्थितीतून मार्ग काढत तिने हे यश मिळवले आहे. सध्या ती नागपुरात राज्य कर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. वृत्तपत्रांमधून येणाºया कर्तबगार शासकीय अधिकाऱ्यांच्या बातम्यांनी मला अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाल्याचेही तिने आवर्जून सांगितले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा