शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

५१ शहरांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना

By admin | Updated: December 2, 2015 02:15 IST

केंद्राची प्रधानमंत्री आवास योजना राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे तसेच या योजनेत समावेश न होऊ शकलेली सर्व जिल्हा मुख्यालये अशा एकूण ५१ शहरांमध्ये

मुंबई : केंद्राची प्रधानमंत्री आवास योजना राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे तसेच या योजनेत समावेश न होऊ शकलेली सर्व जिल्हा मुख्यालये अशा एकूण ५१ शहरांमध्ये लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठी राज्य सरकारही आर्थिक सहाय्य करणार आहे. (सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस ऐवजी सावंतवाडी हा अपवाद करण्यात आला आहे.) या योजनेतील चार भागांपैकी व्याजाची सवलत देण्याच्या भागात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती व अन्य घटकांसाठी आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील व्यक्ती पात्र ठरतील. याबाबतच्या आर्थिक उत्पन्नाच्या मर्यादा केंद्र शासनाच्या धोरणानुसार सुधारित करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून सध्या अल्प उत्पन्न गटासाठी एक लाख ८० हजार इतकी मर्यादा होती. आता ही मर्यादा केंद्राप्रमाणेच सुधारित करण्यात आली असून ती तीन लाख इतकी झाली आहे. अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारची वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लाख ते सहा लाख इतकी आहे. या गटासाठी राज्य सरकारची मर्यादा एक लाख ८० हजार ते चार लाख ८० हजार इतकी होती. मात्र, सुधारित मर्यादा केंद्राप्रमाणेच तीन लाख ते सहा लाख इतकी करण्यात आली आहे.या योजनेची अंमलबजावणी म्हाडा, सिडको, एमएमआरडीए, एनआयटी, एसपीपीएल सारख्या निमशासकीय संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत करण्यात येणार आहे. या संस्थांमार्फत तयार केलेले प्रकल्प राज्यस्तरीय सुकाणू अभिकरणामार्फत राज्यस्तरीय अभियान संचालकांना व अंतिमत: मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय मंजुरी व सनियंत्रण समितीसमोर मान्यतेसाठी सादर करण्यात येतील. संचालक पदावर वरीष्ठ भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल.चार भागांत अशी राबवणार योजनाजमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करुन त्यावरील झोपडपट्टयांचा ‘आहे तेथेच’ या तत्त्वावर पुर्नविकास करणे अपेक्षित. यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी एक लाख रुपये प्रतिघरकुल अनुदान देणार. झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) राबविण्यात येत असलेल्या शहरात ही योजना नाही. (मुंबईत ही योजना होणार नाही)कर्ज आधारित व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी परवडणारी घरे बँकांच्या माध्यमातून उभारणार. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांसाठी तीन लाख रुपये व अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी सहा लाखापर्यंतच्या कर्जावर साडेसहा टक्के व्याज अनुदान म्हणून १५ वर्षांसाठी देणार.खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यासाठी ३० चौरस मीटर चटई क्षेत्रापर्यंतची घरकुले बांधता येतील. प्रकल्पामध्ये किमान २५० घरकुले असणे आवश्यक. त्यातील किमान ३५ टक्के घरे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असल्यास असे प्रकल्प परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प म्हणून गृहीत धरणार. यासाठी केंद्राचे अनुदान प्रति घरकुल दीड लाख रुपये व राज्य शासनाकडून एक लाख रुपये प्रति घरकुल अनुदान. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान देणार. मात्र, एखादे स्वतंत्र घर या योजनेमध्ये येणार नाही. असे घर बांधण्यात येणारे क्षेत्र हे ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेचा भाग असणे आवश्यक असेल. लाभार्थ्यांना केंद्राचे अनुदान प्रति घरकुल दीड लाख रुपये तर राज्य शासनाचे अनुदान एक लाख रुपये इतके मिळेल.