शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आतेभावाने केला घात

By admin | Updated: May 14, 2016 02:54 IST

स्वराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रमुख राज कंधारी यांच्या आत्महत्येमागे व्यावसायिक कारण असल्याचे उघड झाले आहे. कंधारी यांच्या आतेभाऊ विपीन थापरने व्यवसायात दगाफटका केल्यामुळे

नवी मुंबई : स्वराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रमुख राज कंधारी यांच्या आत्महत्येमागे व्यावसायिक कारण असल्याचे उघड झाले आहे. कंधारी यांच्या आतेभाऊ विपीन थापरने व्यवसायात दगाफटका केल्यामुळे होणाऱ्या हानीला तोच जबाबदार असल्याचे कंधारी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलेले आहे. गुरुवारी कार्यालयाच्या झडतीदरम्यान ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली.कंधारींच्या निधनानंतर त्यांच्या आत्महत्येच्या मूळ कारणांचा शोध घेण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. घरात सापडलेल्या डायरीमध्ये जीवनात येणाऱ्या चढउताराबाबत त्यांनी खंत व्यक्त केली होती. यावरून आर्थिक चणचणीमुळे कंधारी यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. याचवेळी त्यांना व्यवसायात तोटा होण्यामागे सिडकोचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप इतर बांधकाम व्यावसायिकांनी केला होता. त्यामुळे पोलिसांपुढे तपासाचा गुंता अधिकच वाढला होता. कंधारी यांच्याविरोधात देखील आयुक्तालयासह इतर ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे कंधारींना आत्महत्येस भाग पाडणारे नेमके कारण कोणते यासंबंधीचा अधिक तपास सानपाडा पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक करीत होते. अखेर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यात सानपाडा पोलिसांना यश आले आहे. नवनियुक्त परिमंडळ एकचे उपायुक्त प्रशांत खैरे, साहाय्यक आयुक्त धनराज दायमा यांच्या पथकाने कंधारींच्या वाशी कार्यालयाची झडती घेतली. त्यामध्ये कार्यालयातील ड्रॉवरमधली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. या चिठ्ठीमध्ये कंधारी यांनी त्यांच्या कौटुंबिक हानीला विपीन थापर यांना जबाबदार धरले असल्याचे उपायुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. थापरने व्यवसायात दगाफटका दिल्यामुळे आपल्यावर आर्थिक संकट कोसळल्याचा उल्लेख या पत्रात केलेला आहे. (प्रतिनिधी)