शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वीज सेन्सर सेंटरमुळे आपत्तीचा सामना करणे सोपे

By admin | Updated: June 8, 2017 03:04 IST

वीज पडण्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन राज्यातील १६ ठिकाणी बसविण्यात आलेल्या वीज सेन्सर सेंटरचे काम चोखपणे होत आहे.

आविष्कार देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : वीज पडण्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन राज्यातील १६ ठिकाणी बसविण्यात आलेल्या वीज सेन्सर सेंटरचे काम चोखपणे होत आहे. मात्र, विविध जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला वीज पडण्याआधी दोन तास सूचना मिळूनही त्यांच्याकडून पुढील काम धीम्या गतीने होते. त्यामध्ये सुधारणा झाल्यास आपत्तीचा मुकाबला करणे अधिक सोपे होणार असल्याचे मत आयआयटीएमचे (भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान विज्ञान संस्था) प्रकल्प संचालक डॉ.एस.डी.पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.पुण्याच्या आयआयटीएम संस्थेने पुणे, रत्नागिरी, अकोला, यवतमाळ, सोलापूर, वेंगुर्ला, लातूर, औरंगाबाद, जळगाव, चंद्रपूर, नागपूर, परभणी, नाशिक, बीड, कोल्हापूर आणि हरिहरेश्वर (रायगड) या ठिकाणी हे वीज सेन्सर सेंटर दोन वर्षांपासून उभारले आहेत. यासाठी सुमारे आठ कोटी रु पयांचा खर्च आला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाबरोबरच वीज कोसळण्याचेही प्रमाण अधिक आहे. गेल्या तीन वर्षांत वीज पडून २०० जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. ही आकडेवारी फक्त २५ जिल्ह्यातीलच आहे. जीवितहानीसह कोट्यवधी रु पयांची वित्तहानीही या आपत्तीमुळे झाली आहे.आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे ठिकठिकाणी ३० वीज अटकाव यंत्रे बसवण्यात आली आहेत. मात्र वीज कुठे पडू शकते, वीज पडण्याचे प्रमाण का वाढले याचा अभ्यास करण्यासाठी तंत्रज्ञान बसवण्यात आले नव्हते. भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान विज्ञान संस्थेने राज्यात १६ ठिकाणी वीज सेन्सर सेंटर बसविले आहेत. वीज पडण्यापूर्वीच काही तास अगोदर वीज पडण्याचे नेमके ठिकाण एसएमएसद्वारे प्रत्येक जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला कळविण्यात येते. त्यानंतर संबंधित आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांच्या विभागात तो संदेश तातडीने पसरविणे आवश्यक आहे, तो मात्र त्यांच्यामार्फत वेळेत दिला जात नसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे, असे डॉ. पवार यांनी सांगितले. वीज पडण्याची अर्धा ते दोन तास आधी माहिती मिळते. तीच माहिती तातडीने संबंधित विभागात दिल्यास प्रशासनाला दुर्घटना टाळणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मध्यंतरी राज्य स्तरावर कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यामध्ये सर्व माहिती देण्यात आली होती. कोकणातून मात्र कोणीच आले नसल्याचेही डॉ.पवार यांनी सांगितले.वीज सेन्सर बसविलेल्या ठिकाणी नेटवर्क नसणे, लाइट जाणे अशा समस्या उद्भवतात. एका वेळी किमान १० सेन्सर सेंटर सुरू असणे महत्त्वाचे आहे, तसे झाल्यास अन्य कोणत्या ठिकाणी वीज पडणार हेही समजू शकते, असेही डॉ.पवार यांनी सांगितले.>एसएमएसद्वारे देणार माहितीभारतीय हवामान विभाग आणि भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था पुणे (विज्ञान मंत्रालय) यांच्या वतीने हे तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. अमेरिकेच्या वेदरबक या संस्थेने लायटनिंग लोकेशन नेटवर्क तंत्रज्ञान विकसित केले आहे, तर पोल्युशन कंट्रोल लिमिटेड या संस्थेने यंत्रणा बसवण्याचे काम हाती घेतले आहे. राज्यातील १६ ठिकाणी यंत्रणा बसवल्यानंतर पुण्यातील आयआयटीएम संस्था त्या त्या ठिकाणच्या वातावरणाचा अभ्यास करून तेथील हवामान शास्त्रज्ञ, सहायक शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांना एमएमएसद्वारे पूर्वसूचना देण्याचे काम करतात.अशी आहे यंत्रणायंत्रणेला एक अँटेना आणि युजर जोडण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान २०० ते २५० कि.मी. अंतरावरील हवामानाची स्थिती, वीज किती क्षमतेने आणि कोणत्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे याची माहिती कळवणार आहे. पुणे येथील आयआयटीएम विभागाकडून हवामानाचा अभ्यास करून वीज पडण्याच्या अर्धा ते दोन तास पूर्वी पूर्वानुमान कळवण्यात येतो.हरिहरेश्वर येथे वीज सेन्सर सेंटर रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे वीज सेन्सर सेंटर उभारण्यात आले आहे. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग अनभिज्ञ आहे. असे कोणते सेंटर उभारले आहे, याची माहिती अथवा पत्र आले नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.