शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

वीज सेन्सर सेंटरमुळे आपत्तीचा सामना करणे सोपे

By admin | Updated: June 8, 2017 03:04 IST

वीज पडण्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन राज्यातील १६ ठिकाणी बसविण्यात आलेल्या वीज सेन्सर सेंटरचे काम चोखपणे होत आहे.

आविष्कार देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : वीज पडण्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन राज्यातील १६ ठिकाणी बसविण्यात आलेल्या वीज सेन्सर सेंटरचे काम चोखपणे होत आहे. मात्र, विविध जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला वीज पडण्याआधी दोन तास सूचना मिळूनही त्यांच्याकडून पुढील काम धीम्या गतीने होते. त्यामध्ये सुधारणा झाल्यास आपत्तीचा मुकाबला करणे अधिक सोपे होणार असल्याचे मत आयआयटीएमचे (भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान विज्ञान संस्था) प्रकल्प संचालक डॉ.एस.डी.पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.पुण्याच्या आयआयटीएम संस्थेने पुणे, रत्नागिरी, अकोला, यवतमाळ, सोलापूर, वेंगुर्ला, लातूर, औरंगाबाद, जळगाव, चंद्रपूर, नागपूर, परभणी, नाशिक, बीड, कोल्हापूर आणि हरिहरेश्वर (रायगड) या ठिकाणी हे वीज सेन्सर सेंटर दोन वर्षांपासून उभारले आहेत. यासाठी सुमारे आठ कोटी रु पयांचा खर्च आला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाबरोबरच वीज कोसळण्याचेही प्रमाण अधिक आहे. गेल्या तीन वर्षांत वीज पडून २०० जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. ही आकडेवारी फक्त २५ जिल्ह्यातीलच आहे. जीवितहानीसह कोट्यवधी रु पयांची वित्तहानीही या आपत्तीमुळे झाली आहे.आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे ठिकठिकाणी ३० वीज अटकाव यंत्रे बसवण्यात आली आहेत. मात्र वीज कुठे पडू शकते, वीज पडण्याचे प्रमाण का वाढले याचा अभ्यास करण्यासाठी तंत्रज्ञान बसवण्यात आले नव्हते. भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान विज्ञान संस्थेने राज्यात १६ ठिकाणी वीज सेन्सर सेंटर बसविले आहेत. वीज पडण्यापूर्वीच काही तास अगोदर वीज पडण्याचे नेमके ठिकाण एसएमएसद्वारे प्रत्येक जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला कळविण्यात येते. त्यानंतर संबंधित आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांच्या विभागात तो संदेश तातडीने पसरविणे आवश्यक आहे, तो मात्र त्यांच्यामार्फत वेळेत दिला जात नसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे, असे डॉ. पवार यांनी सांगितले. वीज पडण्याची अर्धा ते दोन तास आधी माहिती मिळते. तीच माहिती तातडीने संबंधित विभागात दिल्यास प्रशासनाला दुर्घटना टाळणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मध्यंतरी राज्य स्तरावर कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यामध्ये सर्व माहिती देण्यात आली होती. कोकणातून मात्र कोणीच आले नसल्याचेही डॉ.पवार यांनी सांगितले.वीज सेन्सर बसविलेल्या ठिकाणी नेटवर्क नसणे, लाइट जाणे अशा समस्या उद्भवतात. एका वेळी किमान १० सेन्सर सेंटर सुरू असणे महत्त्वाचे आहे, तसे झाल्यास अन्य कोणत्या ठिकाणी वीज पडणार हेही समजू शकते, असेही डॉ.पवार यांनी सांगितले.>एसएमएसद्वारे देणार माहितीभारतीय हवामान विभाग आणि भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था पुणे (विज्ञान मंत्रालय) यांच्या वतीने हे तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. अमेरिकेच्या वेदरबक या संस्थेने लायटनिंग लोकेशन नेटवर्क तंत्रज्ञान विकसित केले आहे, तर पोल्युशन कंट्रोल लिमिटेड या संस्थेने यंत्रणा बसवण्याचे काम हाती घेतले आहे. राज्यातील १६ ठिकाणी यंत्रणा बसवल्यानंतर पुण्यातील आयआयटीएम संस्था त्या त्या ठिकाणच्या वातावरणाचा अभ्यास करून तेथील हवामान शास्त्रज्ञ, सहायक शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांना एमएमएसद्वारे पूर्वसूचना देण्याचे काम करतात.अशी आहे यंत्रणायंत्रणेला एक अँटेना आणि युजर जोडण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान २०० ते २५० कि.मी. अंतरावरील हवामानाची स्थिती, वीज किती क्षमतेने आणि कोणत्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे याची माहिती कळवणार आहे. पुणे येथील आयआयटीएम विभागाकडून हवामानाचा अभ्यास करून वीज पडण्याच्या अर्धा ते दोन तास पूर्वी पूर्वानुमान कळवण्यात येतो.हरिहरेश्वर येथे वीज सेन्सर सेंटर रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे वीज सेन्सर सेंटर उभारण्यात आले आहे. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग अनभिज्ञ आहे. असे कोणते सेंटर उभारले आहे, याची माहिती अथवा पत्र आले नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.