शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता हे साध्य नसून जनसेवेचे साधन : शिंदे , ‘डीसीएम’ म्हणजे ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 07:54 IST

शपथविधी सोहळ्यानंतर मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक आटोपून शिंदे यांनी पक्षाचे कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनला भेट दिली. तिथे पत्रकार परिषद घेत त्यांनी मागील अडीच वर्षांत सरकार चालवण्यासाठी सहकार्य केलेल्यांचे आभार मानले.

मुंबई : सत्ता हे साध्य नसून ते आमच्यासाठी जनसेवेचे साधन आहे. मागील अडीच वर्षांत आम्ही अशाचप्रकारे काम केले. मला काय मिळाले, यापेक्षा राज्यातील जनतेला काय मिळाले आणि पुढे काय मिळणार, ही भावना मनात ठेवून आम्ही काम केले आणि आता सरकारही त्याच उद्देशाने स्थापन केल्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शपथविधी सोहळ्यानंतर मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक आटोपून शिंदे यांनी पक्षाचे कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनला भेट दिली. तिथे पत्रकार परिषद घेत त्यांनी मागील अडीच वर्षांत सरकार चालवण्यासाठी सहकार्य केलेल्यांचे आभार मानले.

मी मुख्यमंत्री म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजायचो. पदापेक्षा मी कामाला महत्त्व दिले. आता मी उपमुख्यमंत्री आहे. आता माझी जबाबदारी मुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याची आहे. आता ‘डीसीएम’ म्हणजे ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ असे मी समजतो. मला मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात फडणवीस आणि अजित पवारांनी सहकार्य केले, तसे आता उपमुख्यमंत्री म्हणून मी फडणवीसांना संपूर्ण सहकार्य आणि पाठिंबा देणार असून, राज्याला पुढे नेण्यासाठी जी मेहनत करायची आहे त्यात आम्ही कमी पडणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून वाटचाल यशस्वी ठरो, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा वेगवान विकास होईल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

आम्ही अडीच वर्षांत सर्वसामान्यांना समृद्धी देण्याचा प्रयत्न केला

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे हिंदुत्वाचे सरकार आणि सर्वांना न्याय देणारे सरकार अडीच वर्षांचे ठरले. आम्ही अडीच वर्षात सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, समृद्धी देण्याचा प्रयत्न केला.

राज्याचे अडीच वर्ष नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याला बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो.

गेल्या अडीच वर्षात राज्यात आणि देशात एकाच विचारांचे सरकार असल्याने केंद्रानेही भरभरून सहकार्य केले. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना धन्यवाद देतो, असेही ते यावेळी म्हणाले.

‘न भूतो न भविष्यती’

गेल्या अडीच वर्षात ’न भूतो न भविष्यती’ काम केले, त्याची इतिहासात नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे विकास प्रकल्प, दुसरीकडे कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली.

प्रत्येक घटक पाठीशी

राज्यातील लाडक्या बहिणी, भाऊ, ज्येष्ठ असे प्रत्येक घटक या निवडणुकीत आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे आम्हाला अद्भूत असे बहुमत मिळाले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.