शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

देशात सत्तेचा गैरवापर केला जातोय, विरोधकांना बोलूच दिले जात नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 12:33 IST

न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारचा दृष्टिकोन चुकीचा असल्याचे दिसून आले आहे. केंद्राचे १ फेब्रुवारीला बजेट सादर होणार आहे.

बारामती : देशात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित होती. परंतु विरोधकांना बोलूच द्यायचे नाही, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. आजपर्यंत असे चित्र कधी पाहिले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली.बारामतीत येथे शनिवारी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, लोकप्रतिनिधींना हतबल करण्यासाठी सरकार काम करत आहे.

न्यायालयाने अनिल देशमुख, संजय राऊत यांना जामीन दिला. त्यातून राज्यातील सत्ताधाऱ्यांनी काही शिकलं पाहिजे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. काही सदस्य आत आहेत. त्यांनाही न्याय मिळेल. जामीन मिळणे हा हक्क आहे. ज्या कारणाने या लोकांना आत टाकले होते, त्यात फारसे काही दिसत नाही, हा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचे काम केले जात आहे.

न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारचा दृष्टिकोन चुकीचा असल्याचे दिसून आले आहे. केंद्राचे १ फेब्रुवारीला बजेट सादर होणार आहे. त्यात सरकारची नीती काय, हे दिसून येईल. देशाचा विचार करून संसदेची प्रतिष्ठा लक्षात घेऊन सरकारने पावले टाकावीत, असेही पवार म्हणाले.

अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी प्रयत्न आवश्यकशेतकरी ज्या दिवशी यशस्वी होईल, त्या दिवशी व्यापार आणि उद्योग क्षेत्राला चांगले दिवस येतील. सत्ता कुणाची असली तरी देशाची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे आणि भारत हा एक उत्तम निर्यातदार देश म्हणून पुढे यायला पाहिजे. राजकीय मतभेद बाजूला सारून अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी राजकीय हेवे दावे बाजूला ठेवून अर्थव्यवस्थवर काम करण्याची गरज आहे, मात्र तसे होताना दिसत नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार