शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

देशात सत्तेचा गैरवापर केला जातोय, विरोधकांना बोलूच दिले जात नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 12:33 IST

न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारचा दृष्टिकोन चुकीचा असल्याचे दिसून आले आहे. केंद्राचे १ फेब्रुवारीला बजेट सादर होणार आहे.

बारामती : देशात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित होती. परंतु विरोधकांना बोलूच द्यायचे नाही, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. आजपर्यंत असे चित्र कधी पाहिले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली.बारामतीत येथे शनिवारी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, लोकप्रतिनिधींना हतबल करण्यासाठी सरकार काम करत आहे.

न्यायालयाने अनिल देशमुख, संजय राऊत यांना जामीन दिला. त्यातून राज्यातील सत्ताधाऱ्यांनी काही शिकलं पाहिजे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. काही सदस्य आत आहेत. त्यांनाही न्याय मिळेल. जामीन मिळणे हा हक्क आहे. ज्या कारणाने या लोकांना आत टाकले होते, त्यात फारसे काही दिसत नाही, हा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचे काम केले जात आहे.

न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारचा दृष्टिकोन चुकीचा असल्याचे दिसून आले आहे. केंद्राचे १ फेब्रुवारीला बजेट सादर होणार आहे. त्यात सरकारची नीती काय, हे दिसून येईल. देशाचा विचार करून संसदेची प्रतिष्ठा लक्षात घेऊन सरकारने पावले टाकावीत, असेही पवार म्हणाले.

अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी प्रयत्न आवश्यकशेतकरी ज्या दिवशी यशस्वी होईल, त्या दिवशी व्यापार आणि उद्योग क्षेत्राला चांगले दिवस येतील. सत्ता कुणाची असली तरी देशाची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे आणि भारत हा एक उत्तम निर्यातदार देश म्हणून पुढे यायला पाहिजे. राजकीय मतभेद बाजूला सारून अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी राजकीय हेवे दावे बाजूला ठेवून अर्थव्यवस्थवर काम करण्याची गरज आहे, मात्र तसे होताना दिसत नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार