शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

चाळीस गावांतील वीज गुल

By admin | Updated: June 5, 2017 03:04 IST

समुद्रकिनारपट्टीवरील चिंचणी, वरोर, वानगाव, साखरे या फिडरअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० गावात गेला आठवडाभर वीज गुल आहे

शौकत शेख। लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : येथील समुद्रकिनारपट्टीवरील चिंचणी, वरोर, वानगाव, साखरे या फिडरअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० गावात गेला आठवडाभर वीज गुल आहे. खेडोपाडयात वीज महावितरण विभागाचा भोंगळ व गलथान कारभारामुळे येथील वीज पुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने येथील हजारो ग्रामस्थांबरोरच वीजेवर अवलंबून असलेले लहान मोठे व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांवर उपासमारीची वेळ आली आहे. झपाट्याने लोकसंख्या वाढत असलेल्या बंदरपट्टी भागांतील गावातल्या वीज वितरण यंत्रणेच्या देखभाल दुरूस्तीकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने गेल्या तीन महिन्यांपासून हलक्या वाऱ्याने जिर्ण व जुनाट झालेल्या वीजेच्या तारा तुटण्याचा प्रकारात वाढ झाल्याने रस्त्यातून ये-जा करणाऱ्या तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.डहाणूच्या पश्चिम किनारपट्टी वरील गावांत गेल्या पन्नास वर्षापूर्वी वीज पुरवठा सुरू झाला. तेव्हा पासून आजतागायत विजेच्या तारा, लोखंडी खांब, ट्रान्सफार्मर तसेच इतर साहित्य बदलण्यात न आल्याने येथील वीज पुरवठ्याची अवस्था दयनीय झाली आहे. दिवसभर विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री, बेरात्री वीज पुरवठा खंडीत झाल्यावर येथील तरूण मंडळी एकत्र येऊन जीव धोक्यात घालून फ्यूज, डिओ टाकून वीजपुरवठा सुरळीत करीत असतात. विशेष म्हणजे विशेष म्हणजे त्यासाठी लागणारे पैसे ग्रामस्थच वर्गणी करून गोळा करतात. दुकानातून तांब्याची तार विकत घेऊन ठेवत असतात. अशी दयनीय अवस्था असतांनाही महावितरण कंपनी संबधित कार्यालयाला अपुरा साहित्य पुरवठा करीत असल्याने अव्वाच्या सव्वा बिले भरणाऱ्या ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहेत. डहाणूच्या बंदरपट्टी भागात मोठया प्रमाणात डायमेकिंगचा व्यवसाय असून सुमारे पंचवीस ते तीस हजार कुशल अकुशल कारागीर रात्रंदिवस काम करून उदरनिर्वाह करीत असतात. परंतु दिवसातून दहा पंधरा वेळा वीजपुरवठा खंडीत होत असल्याने या कारागीरांना हतावर हात ठेऊन बसावे लागते. >सामग्रीची कमतरता३० मे रोजी बोईसर येथे बिघाड झाल्याने बारा तास वीज पुरवठा खंडीत झाल्याने भर उन्हाळयात नागरिकांचे हाल झाले. तर चिंचणी, वरोर, वाणगांव, वाढवण, डहाणूखाडी इ. भागांत दररोज वीजेच्या तारा तुटून पडत असल्याने दोन, तीन तास नागरिकांना अंधारात काढावे लागले. पावसाळा सुरू झाला असला तरी पुरेशा प्रमाणात विजेच्या तारा, फ्यूज, झंपर, डिओ इत्यादी बदलण्यात न आल्याने या भागत काळोख पसरतो आहे. वसई येथील महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांनी या भागाची पाहणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पं.स.सदस्य वसीदास अंभिरे यांनी दिला आहे.