शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

चाळीस गावांतील वीज गुल

By admin | Updated: June 5, 2017 03:04 IST

समुद्रकिनारपट्टीवरील चिंचणी, वरोर, वानगाव, साखरे या फिडरअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० गावात गेला आठवडाभर वीज गुल आहे

शौकत शेख। लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : येथील समुद्रकिनारपट्टीवरील चिंचणी, वरोर, वानगाव, साखरे या फिडरअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० गावात गेला आठवडाभर वीज गुल आहे. खेडोपाडयात वीज महावितरण विभागाचा भोंगळ व गलथान कारभारामुळे येथील वीज पुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने येथील हजारो ग्रामस्थांबरोरच वीजेवर अवलंबून असलेले लहान मोठे व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांवर उपासमारीची वेळ आली आहे. झपाट्याने लोकसंख्या वाढत असलेल्या बंदरपट्टी भागांतील गावातल्या वीज वितरण यंत्रणेच्या देखभाल दुरूस्तीकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने गेल्या तीन महिन्यांपासून हलक्या वाऱ्याने जिर्ण व जुनाट झालेल्या वीजेच्या तारा तुटण्याचा प्रकारात वाढ झाल्याने रस्त्यातून ये-जा करणाऱ्या तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.डहाणूच्या पश्चिम किनारपट्टी वरील गावांत गेल्या पन्नास वर्षापूर्वी वीज पुरवठा सुरू झाला. तेव्हा पासून आजतागायत विजेच्या तारा, लोखंडी खांब, ट्रान्सफार्मर तसेच इतर साहित्य बदलण्यात न आल्याने येथील वीज पुरवठ्याची अवस्था दयनीय झाली आहे. दिवसभर विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री, बेरात्री वीज पुरवठा खंडीत झाल्यावर येथील तरूण मंडळी एकत्र येऊन जीव धोक्यात घालून फ्यूज, डिओ टाकून वीजपुरवठा सुरळीत करीत असतात. विशेष म्हणजे विशेष म्हणजे त्यासाठी लागणारे पैसे ग्रामस्थच वर्गणी करून गोळा करतात. दुकानातून तांब्याची तार विकत घेऊन ठेवत असतात. अशी दयनीय अवस्था असतांनाही महावितरण कंपनी संबधित कार्यालयाला अपुरा साहित्य पुरवठा करीत असल्याने अव्वाच्या सव्वा बिले भरणाऱ्या ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहेत. डहाणूच्या बंदरपट्टी भागात मोठया प्रमाणात डायमेकिंगचा व्यवसाय असून सुमारे पंचवीस ते तीस हजार कुशल अकुशल कारागीर रात्रंदिवस काम करून उदरनिर्वाह करीत असतात. परंतु दिवसातून दहा पंधरा वेळा वीजपुरवठा खंडीत होत असल्याने या कारागीरांना हतावर हात ठेऊन बसावे लागते. >सामग्रीची कमतरता३० मे रोजी बोईसर येथे बिघाड झाल्याने बारा तास वीज पुरवठा खंडीत झाल्याने भर उन्हाळयात नागरिकांचे हाल झाले. तर चिंचणी, वरोर, वाणगांव, वाढवण, डहाणूखाडी इ. भागांत दररोज वीजेच्या तारा तुटून पडत असल्याने दोन, तीन तास नागरिकांना अंधारात काढावे लागले. पावसाळा सुरू झाला असला तरी पुरेशा प्रमाणात विजेच्या तारा, फ्यूज, झंपर, डिओ इत्यादी बदलण्यात न आल्याने या भागत काळोख पसरतो आहे. वसई येथील महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांनी या भागाची पाहणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पं.स.सदस्य वसीदास अंभिरे यांनी दिला आहे.