शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

दोन्ही काँगे्रसच्या हातातच सत्ता ?

By admin | Updated: February 22, 2017 01:06 IST

जिल्हा परिषदेचे रणांगण : शिवसेना मुसंडी मारण्याच्या तयारीत; ‘स्वाभिमानी’च्या घसरणीचा अंदाज

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केल्याने चुरस पाहावयास मिळाली. मंगळवारी रात्री नऊपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहिली, हे पाहता एका-एका मतासाठी किती झटापट सुरू होती, हे स्पष्ट होते. त्यामुळे मिनी मंत्रालयावर कोणाचा झेंडा फडकणार, याचा फैसला उद्या, गुरुवारी होणार असला तरी जिल्ह्यात याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. मतदानानंतर ‘लोकमत’ने कौल कोणाच्या बाजूने जाईल, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर : दोन्ही कॉँग्रेसमध्ये फोडाफोडी करून जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याचा भाजपने प्रयत्न केला असला तरी सत्तेच्या स्पर्धेत ते बरेच मागे राहण्याची शक्यता आहे. एकूण बलाबलात कॉँग्रेस पक्ष ‘नंबर वन’ राहू शकतो. दोन्ही कॉँग्रेस व काही स्थानिक आघाड्या एकत्रित येऊन सत्तेच्या चाव्या ताब्यात घेऊ शकतील, असाच अंंदाज मतदानानंतर व्यक्त होत आहे. नगरपालिका निवडणुकीतील रणनीती वापरत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने दिग्गजांना पक्षात घेऊन बेरजेचे राजकारण केले. कॉँग्रेसने जिल्हा परिषदेच्या ६७ पैकी ४६ जागा लढविल्या होत्या. भाजपने ३७, राष्ट्रवादी कॉँग्रेसने ३२, तर शिवसेनेने ४० जागांवर उमेदवार होते. प्रचारात सर्वच पक्षांनी राळ उडवून दिली. भाजपने ज्या पद्धतीने निवडणुकीदरम्यान हवा तयार केली, ती पाहता सत्तेच्या बेरजेत भाजप फार पुढे असेल, असेच वाटत होते; पण मतदानानंतर अंदाज घेतला असता भाजपला अपेक्षित यश मिळेल, असे चित्र दिसत नाही; पण भाजप दहा जागांवरच थांबण्याची शक्यता आहे. कॉँग्रेस १८, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसला ११ जागांवर यश मिळू शकते. शिवसेना मुसंडी मारत १४ जागा पदरात पाडून घेत सत्तेच्या गोळाबेरजेत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. याशिवाय ‘जनसुराज्य’ गतवेळचे संख्याबळ कायम ठेवील, असा अंदाज आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मात्र घसरण दिसत असून, त्यांच्या बालेकिल्ल्यात शिरोळमध्येही नाकीदम येण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक आघाड्यांना सहा ते आठ ठिकाणी यश मिळू शकते. सत्तेची जोडणी अशीकाँग्रेसचे मावळत्या सभागृहात चिन्हांवर निवडून आलेले ३० सदस्य होते. त्या पक्षाने किमान २२ जागा मिळतील असा दावा केला आहे; परंतु मतदानानंतरचे चित्र पाहता काँग्रेस १९ पर्यंत जाऊ शकते. आवाडे गट राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता करायची झाल्यास काँग्रेसला दोनच जागा कमी पडतात. त्यांना आमदार प्रकाश आबिटकर यांची आघाडी मदत करू शकते. स्वाभिमानीही काँग्रेससोबत जाण्याचा पर्याय आहे, परंतु त्यांना राष्ट्रवादी चालणार का? हा प्रश्न आहे. शिरोळमध्ये भाजपने स्वाभिमानीला बराच त्रास दिला असल्याने दगडापेक्षा वीट मऊ म्हणून स्वाभिमानी काँग्रेससोबत जाऊ शकते....तर भाजपला संधी...भाजप, जनसुराज्य व ताराराणीची मिळून जास्तीत जास्त सदस्यसंख्या १५ पर्यंत जाऊ शकते. अशा स्थितीत त्यांना शिवसेनेने मदत केल्यास महापालिकेप्रमाणेच ते देखील सत्तेच्या अगदी जवळ पोहोचू शकतात. मात्र, यातला महत्त्वाचा तिढा हाच आहे की शिवसेना त्यांच्या सोबत जाणार का..? माजी आमदार महादेवराव महाडिक व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे काहीही करून सत्तेची मोट बांधण्याचा कसोशीने प्रयत्न करतील. मुंबई महापालिकेत काय राजकारण आकार घेते, यावर या घडामोडी अवलंबून असतील.कॉँग्रेसचा ‘मनपा’ पॅटर्न!इतर राजकीय पक्षांप्रमाणे भपकेबाजपणा व फारसे आरोप-प्रत्यारोप न करता कॉँग्रेसने प्रचार यंत्रणा राबविली. महापालिका निवडणुकीतही त्यांनी अशीच यंत्रणा राबविली होती. त्यामुळे कॉँग्रेसला ‘मनपा’सारखे अनपेक्षितपणे यश मिळण्याची शक्यता आहे. मतदान चांगल्या टक्केवारीने आणि शांततेत झाले. कोणतीही दडपशाही दिसून आली नाही. भाजप-मित्रपक्षांच्या मदतीने ३६ चा जादूई आकडा गाठून जिल्हा परिषदेवर झेंडा फडकावल्या शिवाय राहणार नाही. - चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्रीकॉँग्रेसची लाट यावी अशी परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यात या निवडणुकीच्या निमित्ताने पाहावयास मिळाली. गेल्या वेळेप्रमाणेच कॉँग्रेस जिल्हा परिषदेच्या सत्तेत येणार आहे. त्यासाठी समविचारी पक्षाची गरज भासल्यास सहकार्य घेतले जाईल. - पी. एन. पाटील, राष्ट्रीय कॉँग्रेसकोणत्याही परिस्थितीत कॉँग्रेस २२ जागांच्या खाली येणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि स्थानिक आघाड्यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेवर कॉँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकावू. - सतेज पाटील, आमदारयंदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरली होती. सेनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच सर्वाधिक जागा पटकावत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणामध्ये शिवसेना ंिकंगमेकर ठरेल. - विजय देवणे, शिवसेना जिल्हाप्रमुखमहापालिकेप्रमाणेच याही निवडणुकीत भाजपचा फुगा फुटणार आहे. राष्ट्रवादी या निवडणुकीत चांगली कामगिरी करून दाखविणार असून, यावेळी सत्तेत राष्ट्रवादीचा सहभाग असेल.- हसन मुश्रीफ, आमदार एक दावा असाही...भाजप आणि मित्रपक्षांकडून मात्र कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर ‘भाजता’ची सत्ता येणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्या गणिताप्रमाणे भाजप- १५, जनसुराज्य- ८, ताराराणी आघाडी- ४, आमदार कुपेकर गट- १ आणि धैर्यशील माने गट- १ अशा एकूण २९ जागा निवडून येतील. अशा स्थितीत शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना काय करते यावर सत्तेचा लंबक अवलंबून असेल. या आघाडीच्या मतानुसार कॉँग्रेसला १५ व राष्ट्रवादीला ८ जागा मिळतील. त्यामुळे दोन्ही कॉँग्रेस मिळून २३ च्या पुढे जाऊ शकत नाहीत, असे ठामपणे सांगितले जात आहे.