शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

पंतप्रधान मुद्रा योजनेचा बोजवारा

By admin | Updated: October 12, 2015 01:46 IST

बँकांकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने अनेक बेरोजगार अनभिज्ञ; मोठय़ा व्यापा-यांना होत आहे कर्ज वाटप.

बुलडाणा: छोट्या उद्योजकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली पंतप्रधान मुद्रा योजना पहिल्या टप्प्यातच बारगळली आहे. बँकांकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने अनेक बेरोजगार या चांगल्या योजनेपासून अनभिज्ञ आहेत. जिल्ह्यातील अनेक बँकांमध्ये या योजनेचे अर्जच उपलब्ध करण्यात आलेले नाहीत. काही बँका कागदपत्रांसाठी अडवणूक करीत असल्याची नागरिकांची ओरड आहे. तर अनेक बँकांनी टार्गेट पूर्ण करण्यासाठी जुन्याच खातेदारांच्या नावे कर्ज प्रकरणे करून मोकळे झाले आहेत. ५0 हजार ते १0 लाख अशा तीन टप्प्यांत ही कर्ज योजना आहे. शिशू, मध्यम व मोठे असे वर्गीकरण या योजनेमध्ये करण्यात आले आहे; मात्र विशिष्ट बँकेत विशिष्ट परिसरातील व्यक्तींनाच कर्ज दिले जाईल, अशी अटही बँकांनी घातल्याने नागरिकांना इतर राष्ट्रीयीकृत बँकांचे उंबरठे झिजविण्याशिवाय पर्याय नाही. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात सर्व बँक प्रमुखांची बैठक घेऊन योग्य ते दिशानिर्देश द्यावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात लिड बँकेचे व्यवस्थापक पी. एम.शेंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेले टार्गेट पूर्ण करण्याबरोबरच नियमानुसार कर्जवाटप करण्याची जबाबदारी संबंधित बँकांची आहे. नागरिकांच्या तक्रारी असल्यास संबंधित बँक अधिकार्‍यांना समज दिल्या जाईल, असे सांगीतले.

*काय आहे मुद्रा कर्ज योजनेमध्ये?

         मुद्रा कर्ज योजनेंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण अशा तीन टप्प्यांत कर्जाचे वितरण होणार आहे. शिशू योजनेंतर्गत ५0 हजार, किशोर योजनेंतर्गत ५ लाख व तरुण योजनेंतर्गत १0 लाख रुपयांचे कर्ज देण्यात येते. शासकीय जाहिरातीत शिशू, किशोर आणि तरुण मुद्रा लोन योजना वाटप प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात ये ते; मात्र बहुतांश बँकांमध्ये केवळ ५0 हजारांचे कर्जवाटप सुरू आहे. त्यातही कर्जदाराला योग्य मार्गदर्शन न करता चुकीची माहिती देऊन बँका दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे या योजनेला जिल्ह्यात फारसा प्रतिसादही मिळत नसल्याचे दिसत आहे.

*बँकांनी असाही वापरला फंडा

       छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी, त्यांचा व्यवसाय चांगला चालावा यासाठी मुद्रा कर्ज योजनेंतर्गत पतपुरवठा केल्या जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक बँकांना टार्गेट देण्यात आले आहे; मात्र काही बँकांच्या अधिकार्‍यांनी नवीन कर्ज प्रकरणे करून पुन्हा वसुलीचा डोक्याला ताप नको म्हणून त्यांच्याकडे असलेल्या व्यापारी खातेदारांना फोन करून त्यांचे अर्ज भरून घेतले व त्यांना आवश्यकता नसताना कर्ज वाटप केल्याची बाब उघड होत आहे. बँक अधिकार्‍यांच्या या धोरणामुळे शासनाच्या एका चांगल्या योजने पासून सामान्य नागरिक वंचित राहत आहेत.

*अधिका-याच्या तोंडावर भिरकावले कागद

येथील विदर्भ कोंकण बँकेत हॉटेल व्यावसायिक आंबादास वाणी यांनी ५0 हजार रुपयांचे कर्ज प्रकरण केले होते. बँकेने त्यांना १00 रुपयांचा स्टँप मागितला. स्टँप दिल्यानंतर त्यांना बँकांचे नाहरकत प्रमाणपत्र आणण्याचे सांगितले. त्यातही तुम्हाला केवळ २0 हजार रुपयेच देऊ, असे बँकेचे अधिकारी पठाण यांनी सांगितले. ५0 हजार रुपयांची तरतूद असताना २0 हजार रुपयेच का मंजूर करता, यावर बँक अधिकारी व वाणी यांच्यात वाद झाला. शेवटी व्यावसायिक वाणी यांनी अधिकार्‍याच्या अंगावर कागद भिरकावून निघून आले.