शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

मुंबईतील टोलमाफी लांबणीवर

By admin | Updated: July 29, 2015 02:17 IST

मुंबईतील प्रवेशाकरिता पाच टोलनाक्यांवर आकारण्यात येणारा टोल १ आॅगस्टपासून बंद करण्याच्या राज्यातील सरकारच्या घोषणेची अंमलबजावणी तीन महिने पुढे गेली आहे.

मुंबई : मुंबईतील प्रवेशाकरिता पाच टोलनाक्यांवर आकारण्यात येणारा टोल १ आॅगस्टपासून बंद करण्याच्या राज्यातील सरकारच्या घोषणेची अंमलबजावणी तीन महिने पुढे गेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबतचा सखोल अभ्यास करण्यात अपयश आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी मुंबईतील प्रवेशद्वारांवरील टोल रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री पाटील यांना सोमवारी रात्री सादरीकरण केले. त्यानंतर १ आॅगस्टची डेडलाइन आणखी तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. पाटील म्हणाले की, मुंबईच्या प्रवेशद्वारावरील या टोलनाक्यांवर ७० टक्के रक्कम छोट्या वाहनांकडून गोळा होते. त्यामुळे अन्य टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना दिली तशी टोलमाफी येथे द्यायची झाली तर मोठ्या वाहनांवरील टोल आकारणीचा कालावधी आणखी किती काळ वाढवावा लागेल त्याबाबतचा अचूक अंदाज काढण्यात अधिकाऱ्यांना अद्याप यश आलेले नाही. मुंबईतील केवळ पाच टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी द्यायची तर दरमहा सुमारे २०० कोटी रुपये द्यावे लागतील. कोल्हापूरमधील नऊ टोलनाक्यांवरील टोलमाफीबाबत चर्चा सुरू आहे. टोलविरोधी कृती समितीने नाव सुचवलेल्या आर्किटेक्ट असोसिएशनकडून आयआरबीला भरपाई द्यायच्या भूखंडाचे पुनर्मूल्यांकन करून घेण्यात आले. त्यानुसार ही रक्कम २६९ कोटी रुपये झाली. आता ही रक्कम टोल कंत्राटदार कंपनी आयआरबीला मान्य होणे आवश्यक आहे. त्यांना ही रक्कम मान्य नाही. मात्र हा तिढा सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गावरील १८ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी मिळावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. (विशेष प्रतिनिधी)टोल कंपन्यांना भरपाई द्यावी लागेलसध्या या टोल आकारणीचा कालावधी २०२९पर्यंत आहे. मुंबईतील पाचही टोल नाके एकरकमी पैसे देऊन बंद करायचे झाले तर २ हजार कोटी रुपये कंत्राटदाराला द्यावे लागतील. राज्य सरकारने दरमहा ४०० कोटी रुपये देऊन ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी दिली. मुंबईतील केवळ पाच टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी द्यायची तर दरमहा सुमारे २०० कोटी रुपये द्यावे लागतील. मुंबई-गोवा महामार्गावरील पात्रादेवी ते झाराप या टप्प्याचा खर्च ६ हजार कोटी रुपये आहे. हा खर्च केंद्र सरकार करील, असा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचा मानस असल्याचे पाटील यांनी सांगितले.