शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील टोलमाफी लांबणीवर

By admin | Updated: July 29, 2015 02:17 IST

मुंबईतील प्रवेशाकरिता पाच टोलनाक्यांवर आकारण्यात येणारा टोल १ आॅगस्टपासून बंद करण्याच्या राज्यातील सरकारच्या घोषणेची अंमलबजावणी तीन महिने पुढे गेली आहे.

मुंबई : मुंबईतील प्रवेशाकरिता पाच टोलनाक्यांवर आकारण्यात येणारा टोल १ आॅगस्टपासून बंद करण्याच्या राज्यातील सरकारच्या घोषणेची अंमलबजावणी तीन महिने पुढे गेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबतचा सखोल अभ्यास करण्यात अपयश आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी मुंबईतील प्रवेशद्वारांवरील टोल रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री पाटील यांना सोमवारी रात्री सादरीकरण केले. त्यानंतर १ आॅगस्टची डेडलाइन आणखी तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. पाटील म्हणाले की, मुंबईच्या प्रवेशद्वारावरील या टोलनाक्यांवर ७० टक्के रक्कम छोट्या वाहनांकडून गोळा होते. त्यामुळे अन्य टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना दिली तशी टोलमाफी येथे द्यायची झाली तर मोठ्या वाहनांवरील टोल आकारणीचा कालावधी आणखी किती काळ वाढवावा लागेल त्याबाबतचा अचूक अंदाज काढण्यात अधिकाऱ्यांना अद्याप यश आलेले नाही. मुंबईतील केवळ पाच टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी द्यायची तर दरमहा सुमारे २०० कोटी रुपये द्यावे लागतील. कोल्हापूरमधील नऊ टोलनाक्यांवरील टोलमाफीबाबत चर्चा सुरू आहे. टोलविरोधी कृती समितीने नाव सुचवलेल्या आर्किटेक्ट असोसिएशनकडून आयआरबीला भरपाई द्यायच्या भूखंडाचे पुनर्मूल्यांकन करून घेण्यात आले. त्यानुसार ही रक्कम २६९ कोटी रुपये झाली. आता ही रक्कम टोल कंत्राटदार कंपनी आयआरबीला मान्य होणे आवश्यक आहे. त्यांना ही रक्कम मान्य नाही. मात्र हा तिढा सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गावरील १८ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी मिळावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. (विशेष प्रतिनिधी)टोल कंपन्यांना भरपाई द्यावी लागेलसध्या या टोल आकारणीचा कालावधी २०२९पर्यंत आहे. मुंबईतील पाचही टोल नाके एकरकमी पैसे देऊन बंद करायचे झाले तर २ हजार कोटी रुपये कंत्राटदाराला द्यावे लागतील. राज्य सरकारने दरमहा ४०० कोटी रुपये देऊन ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी दिली. मुंबईतील केवळ पाच टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी द्यायची तर दरमहा सुमारे २०० कोटी रुपये द्यावे लागतील. मुंबई-गोवा महामार्गावरील पात्रादेवी ते झाराप या टप्प्याचा खर्च ६ हजार कोटी रुपये आहे. हा खर्च केंद्र सरकार करील, असा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचा मानस असल्याचे पाटील यांनी सांगितले.