शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

एफटीआयआयमधील वाद मिटण्याची शक्यता

By admin | Updated: August 22, 2015 00:52 IST

सुमारे दोन महिने सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची सकारात्मक दखल प्रथमच केंद्रीय पातळीवर घेतली गेल्याने फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या

पुणे : सुमारे दोन महिने सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची सकारात्मक दखल प्रथमच केंद्रीय पातळीवर घेतली गेल्याने फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) चिघळलेला वाद मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्प मूल्यांकन प्रक्रियेसह अन्य विषयांवर विस्तृत चर्चा केल्याने या वादात तोडगा निघेल, अशी आशा संचालक, विद्यार्थी यांच्यासह प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना वाटू लागली आहे. त्रिदस्यिय समिती आपला अहवाल सोमवारपर्यंत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे सादर करणार आहे. एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आली त्या दिवसांपासूनच विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले. संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे यांना घेराव घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मंगळवारी पाच आंदोलक विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. तरीही विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला.या पार्श्वभूमीवर आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने एस. एम. खान, अंशू सिन्हा आणि सी. राजनाथ यांची समिती शुक्रवारी संस्थेत आली. या समितीने केवळ स्टूडंट असोसिएशनशीच नव्हे तर टिचर्स आणि कर्मचारी वर्गाशीही चर्चा केली.