शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव उपमहापौरांच्या अटकेची शक्यता

By admin | Updated: June 21, 2016 02:45 IST

मारहाण तसेच मानसिक छळ केल्याप्रकरणी जळगावचे मनसे उपमहापौर ललित कोल्हे विरोधात जुहू पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला.

मुंबई : मारहाण तसेच मानसिक छळ केल्याप्रकरणी जळगावचे मनसे उपमहापौर ललित कोल्हे विरोधात जुहू पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणात त्याला लवकरच अटक होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र आपल्या विरोधात रचलेले हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा कोल्हेनी ‘लोकमत’शी बोलताना केला. जुहू परिसरात तक्रारदार पत्नी भक्ती कोल्हे राहण्यास आहे. एका कार्यक्रमादरम्यान २००३ मध्ये भक्ती आणि ललित यांची भेट झाली होती. या भेटीनंतर त्यांची ओळख वाढली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी २७ जानेवारी २००४ रोजी लग्न केले. भक्तीने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या काही दिवसांनंतर कोल्हेचे आधीच लग्न झाल्याची माहिती मिळाली. हा वाद महिला दक्षता आयोगापर्यंत पोहोचला. आयोगाने दोघांमध्ये सामोपचार घडवला. मात्र दोघांमध्ये धुसफूस सुरुच होती. अशात आपण त्याची पाचवी पत्नी असल्याचे भक्तीचे म्हणणे आहे. भक्ती आणि ललित तीन वर्ष एकत्र राहिले, मात्र वाद विकोपाला गेल्यानंतर भक्ती मुंबईला परत आली. तर आई आजारी असल्यामुळे ललित जळगावातच राहिला. इकडे मुंबईत भक्तीने ललितविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर, ललितनेही घटस्फोटासाठी अर्ज केला. याप्रकरणी जानेवारी महिन्यात जुहू पोलीस ठाण्यात तिने तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरुन जुहू पोलिसांनी कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा कोल्हे विरोधात दाखल केला. त्यानंतर दोघांचेही जबाब नोंदविण्यात आले. मात्र स्थानिक पोलीस उपायुक्तांसोबत त्याचे साटेलोटे असल्याने त्याला अद्याप अटक झाली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी जूहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील घोसाळकर यांच्याकडे विचारणा केली असता, सहा महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी न्यायालयाच्या नियमावलीनुसार चौकशी सुरु आहे. चौकशी अंतिम टप्प्यात असून चौकशीअंती जे सत्य उघड येईल, त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत अधिक तपास सुरु असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. याप्रकरणात कोल्हेंना लवकरच अटक होण्याची शक्यता जुहू पोलिसांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)पहिले लग्नभक्तीच्या मते, ललितने २००१ मध्ये हर्षल नावाच्या महिलेशी पहिले लग्न केले. या दोघांना मुलगा आहे. तो सध्या १६ वर्षांचा आहे. हर्षलने मात्र २००८ मध्येच आत्महत्या केल्याचे भक्तीने सांगितले. हर्षलच्या मृत्यूनंतर ललितला जळगाव पोलिसांनी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटक केली होती, असे भक्तीने सांगितले. मात्र त्याची याप्रकरणात सुटका झाली होती.१याबाबत ललिल कोल्हेने स्वत:वरील आरोप फेटाळून लावले. भक्तीचा वेश्या व्यवसायात समावेश असून, ती कोलकात्यातील रेड लाईट एरियात मुलींची विक्री केल्याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याचा आरोप ललितने केला आहे. याबाबतचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचे ललितचे म्हणणे आहे. तिचे मूळ नाव रुबी असून मी लग्नानंतर तिचे नाव भक्ती ठेवले. माझे तिच्यावर प्रेम होते म्हणून १२ वर्षे आम्ही संसार केला. निवडणुकांच्या तोंडावर राजकीय मंडळींना हाताशी धरुन आपल्याविरुद्ध षडयंत्र रचत असल्याचा आरोप ललित यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. २याशिवाय भक्तीविरोधात मी अगोदरच फॅमिली कोर्टात खटला दाखल केला असून, कलम ४९८ अ अर्थात कौटुंबिक हिंसाचार सिद्ध करुन दाखवावे असे त्याचे म्हणणे आहे. त्यात भक्ती ही आपली दुसरी पत्नी आहे. त्यात पहिल्या पत्नीबाबत तिला पूर्ण कल्पना होती. इतर ज्या महिलांचा ती उल्लेख करत आहे. त्यांचे लग्न झाले असून त्या त्यांच्या संसार आनंदाने नांदत आहे. जर तिच्याकडे याबाबत काही पुरावे असतील तर तिने ते सिद्ध करुन दाखवावे असेही कोल्हे यांनी सांगितले.