शहरं
Join us  
Trending Stories
1
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
2
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
3
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
4
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकूण काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
5
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
6
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
7
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
8
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
9
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
10
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
11
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
12
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
13
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
14
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
15
₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
17
जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
18
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
19
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
20
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण

अधिग्रहित जमिनीचा ताबा शेतकर्‍यांकडेच

By admin | Updated: July 17, 2014 00:43 IST

संग्रामपूर तालुक्यातील सावळी येथील शेतकर्‍यांच्या अधिग्रहीत जमिनीचा प्रश्न; उच्च न्यायालयाचे ‘जैसे-थे’चे आदेश.

संग्रामपूर : तालुक्यातील सावळी येथील शेतकर्‍यांच्या अधिग्रहीत जमिनीचा ताबा शेतकर्‍यांकडेच ठेवावा, असा आदेश १४ जुलै रोजी नागपूर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या.बी.आर.गवई आणि एस.बी.शुक्रे यांच्या खंडपीठाने दिला आहे. या आदेशामुळे शेतकर्‍यांना नवीन जमीन अधिग्रहण कायद्याच्या तरतुदीनुसार दिलासा मिळाला आहे.सावळी या पूरग्रस्त गावाच्या पुनर्वसनाकरिता १९६७ साली निवाडा पारित करुन शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या होत्या; परंतु त्या गावाचे पुनर्वसन आजतागायत झालेच नाही. त्यामुळे अधिग्रहीत जमिनींचा ताबा हा मूळमालक शेतकर्‍यांकडेच होता आणि तेव्हापासून ते आजपर्यंत वहिती करीत आहेत. आता सावळी हे गाव जिगाव प्रकल्पबाधित झाल्यामुळे त्या गावाच्या पुनर्वसनाकरिता शासनाने पुन्हा प्रक्रिया सुरु केली आहे. आणि या शेतकर्‍यांच्या जमिनीला जोडून अतिरिक्त जमीन अधिग्रहीत करीत आहेत; तसेच आधी घेतलेली जमीन ही शासनाची असल्यामुळे त्याचासुद्धा ताबा घेणेबाबत जमीन मोजणी प्रक्रिया सुरु झाली. या प्रकारामुळे जमिनीचे ताबाधारक रामराव रामदेव अरबट, रामराव ओंकार बावने आणि इतर पाच शे तकर्‍यांनी अँड.प्रदीप क्षीरसागर पाटील यांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करुन १ जानेवारी २0१४ पासून नव्याने अमलात आलेल्या नवीन भुमि अधिग्रहण कायदयाच्या तरतुदीनुसार १९६७ साली झालेले अधिग्रहण रद्द करण्याबाबत आणि सदर जमिनीची मालकी परत शेतकर्‍यांना देणेबाबत तसेच ताबा अबाधित ठेवण्याबाबत याचिकेत मागणी केली आहे. त्यावर १४ जुलै रोजी सुनावणी होऊन न्यायालयाने जैसे थे चा आदेश पारित केला व महसूल सचिवाला नोटीस काढल्या आणि पुढील सुनावणी चार आठवड्यांनी ठेवली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.