शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

राजकारण्यांनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, साहित्य संमेलनातून नितीन गडकरींचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 19:23 IST

राजकारण्यांनी इतरांच्या कामात हस्तक्षेप करता कामा नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी दिला आहे.

ठळक मुद्देराजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण नाही. राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे राजकारण्यांनी इतरांच्या कामात अकारण ढवळाढवळ करता कामा नये. विद्यापीठ, शिक्षण, साहित्य, कविता ही ज्यांची ज्यांची क्षेत्रे आहेत त्यांनी तिथे काम करावेजेथे संवाद होत नाही तेते विसंवाद होतो आणि त्यातून वितंडवाद निर्माण होतो. त्यामुळे मतभिन्नता असली तरी मनभिन्नता असता कामा नये

 यवतमाळ -राजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण नाही. राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. दुर्दैवाने सत्ताकारणाचा अर्थ राजकारण असा झाला. राजकारण्यांनी इतरांच्या कामात अकारण ढवळाढवळ करता कामा नये. विद्यापीठ, शिक्षण, साहित्य, कविता ही ज्यांची ज्यांची क्षेत्रे आहेत त्यांनी तिथे काम करावे, असा सल्ला केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी दिला आहे. ते 92 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी बोलत होते.  जेथे संवाद होत नाही तेते विसंवाद होतो आणि त्यातून वितंडवाद निर्माण होतो. त्यामुळे मतभिन्नता असली तरी मनभिन्नता असता कामा नये, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाच्या उदघाटनासाठी दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने वादाला तोंड फुटले होते. त्यावरून राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना साहित्य संमेलनात उदभवलेल्या वादासह विविध विषयांवर भाष्य केले. गडकरी म्हणाले, ''राजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण नाही. राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. दुर्दैवाने सत्ताकारणाचा अर्थ राजकारण असा झाला. राजकारण्यांनी इतरांच्या कामात अकारण ढवळाढवळ करता कामा नये. विद्यापीठ, शिक्षण, साहित्य, कविता ही ज्यांची ज्यांची क्षेत्रे आहेत त्यांनी तिथे काम करावे.''

तसेच मतभिन्ना असावी मात्र मनभिन्नता असू नये, आपल्याला विरोध करणाऱ्याचाही सन्मानच केला पाहिजे असा सल्लाही गडकरींनी दिला. ''जिथे संवाद होत नाही तिथे विसंदवाद होते, त्यातून वितंडवाद निर्माण होतो. त्यामुळे एकमेकांच्या मर्यांदा सांभाळून एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मतभिन्नता असली पाहिजे. पण मनभिन्नता असता कामा नये.'' असे गडकरी म्हणाले. यावेळी गडकरींनी नयनतारा सहगल यांच्यावरही नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला. ज्यांना आपण मोठे समजतो. त्यांच्याजवळ जाऊन आल्यावर आपण समजतो तेवढे  ते मोठे नाहीत हे लक्षात येते. पण ज्यांना लहान समजतो त्यांच्या जवळ गेल्यावर ते खूप मोठे आहेत. हे लक्षात येते. वैशालीताईंना तुम्ही बोलावले हे चांगले केले. जीवनाच्या संघर्षामध्ये आत्मविश्वासाने कसे जगायचे हे दाखवून दिले आहे.'' असे गडकरींनी सांगितले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळPoliticsराजकारण