शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

उमेदवारी अर्जासाठी राजकीय पक्षांचे शुल्कही भारी!

By admin | Updated: January 24, 2017 19:30 IST

अकोला : निवडणूक लढणे आता एैऱ्यागैऱ्याचे काम नाही. त्यासाठी बक्कळ पैसा असावाच लागतो.

अकोला : निवडणूक लढणे आता एैऱ्यागैऱ्याचे काम नाही. त्यासाठी बक्कळ पैसा असावाच लागतो. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने त्यावर शिक्कामोर्तब केलेच आहे, तर त्याचवेळी हाडाच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या तिकिटावर निवडून आणण्याचा बडेजाव मिरवणाऱ्या पक्षांनी उमेदवारी अर्जांच्या नावे गोळा केलेली रक्कम पाहता सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होण्याचीच वेळ येते. पक्षाला निवडणुकीसाठी लागणारा खर्च गोळा करावा लागतो, हे गृहीत आहे. त्यासाठी उमेदवारांना तिकीट देण्यासाठी अर्जाचे शुल्क घेतले जाते, हेही खरे आहे. मात्र, एखाद्या पक्षाने ते किती वसूल करावे, ही बाब निवडणूक लढणारांसाठी तेवढीच महत्त्वाची ठरते. पक्षाने उमेदवारी अर्जासाठी घेतलेली रक्कम परत मिळत नाही. ती निवडणूक कामासाठी खर्ची घालण्यासाठी असते, असे सांगितले जाते. या उमेदवारी अर्जासाठी काँग्रेसने एक हजार ते २५०० रुपये शुल्क घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एक हजार ते दोन हजार रुपये घेतले आहेत. भाजपने सरसकट आठ हजार रुपये, तर शिवसेनेने पाच ते सात हजार रुपये शुल्क आकारून उमेदवारी अर्ज दिले आहेत. भारिप-बमसंने साध्या कागदावर लिहिलेले अर्ज विनामूल्य स्वीकारले आहेत. महिला, मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमातींसाठी काही पक्षांनी वेगवेगळे शुल्क वसूल केल्याची माहिती आहे. काही पक्षांनी वसूल केलेली शुल्काची रक्कम पाहता ती लाखोंच्या घरात आहे. आयोगाकडूनही उमेदवारीसाठी असलेल्या नामनिर्देशनपत्राचे शुल्क घेतले जाते. सोबतच अनामत रक्कमही घेतली जाते. ती रक्कम राखीव नसलेल्या प्रवर्गासाठी पाच हजार रुपये, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी राखीव जागेसाठी २५०० रुपये, नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २५०० रुपये आणि महिलांसाठीही तेवढीच रक्कम घेतली जाते. ही रक्कम परतही मिळते. विजयी उमेदवाराच्या एकूण मतांपैकी एक अष्टमांशपेक्षा कमी मते मिळाल्यास ती जप्त होते.