शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
7
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
8
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
9
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
10
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
11
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
12
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
13
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
14
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
15
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
16
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
17
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
18
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
19
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
20
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

राजकीय घराणेशाही

By admin | Updated: February 7, 2017 23:30 IST

कोल्हापुरातील चित्र : प्रस्थापितांचे सतरा वारसदार मैदानात

विश्वास पाटील-- कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद या वेळेला खुले झाल्याने प्रत्येक नेत्याला आपल्या वारसाला तिथे संधी देण्याची घाई झाली आहे. त्यामुळे घराणेशाहीला ऊत आला आहे. या जिल्ह्यात तब्बल सतरा वारसदार आपले भविष्य आजमावत आहेत. त्यामध्ये विद्यमान आमदार व खासदारांचे तिघे जवळचे नातलग आहेत.निवडणूक कोणतेही असो त्यातील घराणेशाही ही आता मतदारांच्यासुद्धा अंगवळणी पडू लागली आहे. किंबहुना मतदारांकडूनच ती जोपासली जात आहे. कोल्हापुरात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील हे आपला मुलगा राहुल याला उमेदवारी द्यायला तयार नव्हते परंतु त्या मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल आठ तास त्यांना रोखून धरले. राहुल पाटील यांला उमेदवारी दिल्याशिवाय अन्य मतदारसंघांतील काँग्रेसच्या उमेदवारांनी ए बी फॉर्म स्वीकारले नाहीत. शेवटी लोकांच्या दबावापुढे नमते घेऊन मुलास रिंगणात उतरविण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला.लोकसभा व विधानसभेला प्रस्थापित कुटुंबातील उमेदवारांना संधी मिळते. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीला तरी किमान पक्षासाठी व नेत्यांसाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जावी, अशी अपेक्षा असते; परंतु तसे घडताना दिसत नाही. कारण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ता या देखील नवे आर्थिक व राजकीय सत्ताकेंद्र ठरल्या आहेत. तिथे जाऊन जशी विकासकामे करता येतात तशी अनेकांची कोंडी करता येते. ग्रामीण राजकारणावर वर्चस्व मिळविता येते. त्यासाठी मग हे पद आपल्याच गोतावळ््यात राहावे, असे नेत्यांना वाटत आहे.कोल्हापुरात भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका रिंगणात आहेत. दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा नातू वीरेंद्र शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत आमदार गोविंदराव कलिकते यांची सून गेल्या निवडणुकीत रिंगणात होती, आता त्यांचा मुलगाच संजय मैदानात आहे म्हणजे घराणेशाही जोपासण्यात सगळेच डावे-उजवे पक्ष हिरीरीने पुढे आहेत शिवाय ही घराणेशाही कोल्हापूरपासून चेन्नई ते उत्तर प्रदेशपर्यंत सगळीकडेच आहे.यासंदर्भात राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांना विचारले असता ते म्हणाले,‘राजकीय नेतृत्वाच्या वारसदारांना संधी दिली जावी, अशी मानसिकता आता मतदारांची आणि राजकीय पक्षांचीही होत आहे. त्यांच्याकडे आर्थिक सामर्थ्य, राजकीय वर्चस्व आणि यंत्रणा राबविण्याची ताकद असते. हे सगळे वारसाला अलगदपणे मिळते. ही घराणेशाही सर्व पक्षांत दिसते म्हणून तर जयललितांशी कोणताही संबंध नसताना लोकशाही संकेत पायदळी तुडवून आता तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी शशिकला यांची निवड होत आहे. नेत्यांच्या वारसदारांना त्यांच्याकडे क्षमता असेल तर का संधी मिळू नये, अशीही विचारणा केली जाते; परंतु समान संधीच्या तत्त्वाचा विचार केल्यास हे वारसदार शर्यत सुरू होण्यापूर्वीच पुढे असतात. पद्मश्री विखे-पाटील कुटुंबापासून ते अनेक ठिकाणी असे अनुभवण्यास येते की तिथे मागच्या पिढीच्या तुलनेत पुढील पिढीतील नेतृत्व तितकेसे प्रभावशाली नाही परंतु तरीही त्यांना वारसा म्हणून ही संधी मिळाली आहे.सातऱ्यातही वारसदारचसचिन जवळकोटे ल्ल सातारासातारा जिल्ह्यात कोरेगावचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुडाळ (ता. जावळी) गटातून अर्ज दाखल केला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू व सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सोमवारी तरडगाव (ता.फलटण) गटातून अर्ज दाखल केला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वहिनी शिवांजलीराजे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनीही सोमवारी जिल्हा परिषदेच्या साखरवाडी (ता.फलटण)गटातून अर्ज दाखल केला. विधान परिषदेचे सदस्य व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव पाटील यांचे पुत्र प्रताप आनंदराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सुपने (ता.कराड) गटातून उमेदवारी अर्ज सोमवारी शक्तिप्रदर्शनासह दाखल केला. माजी मंत्री व ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अ‍ॅड. उदय पाटील यांनी येळगाव (ता.कराड) जिल्हा परिषद मतदार संघातून विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. ते प्रथमच एका सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत.