शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
2
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
3
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
4
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
5
Stock Markets News: फार्मावर १००% टॅरिफ, सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरला; निफ्टी २४,८०० च्या खाली, फार्मा शेअर्स आपटले
6
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
7
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
8
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...
9
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
10
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
11
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
12
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
13
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
14
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
15
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
16
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
17
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
18
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
19
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
20
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश

पोलीस कोठडी बनतेय मृत्यूचा सापळा

By admin | Updated: February 9, 2015 05:55 IST

दुष्मनो से बचने के लिए पोलीस की कोठडी से ज्यादा सुरक्षित कोई और जगह नहीं, हा डायलॉग हिंदी चित्रपटात सर्रासपणे वापरला जातो

जमीर काझी, मुंबईदुष्मनो से बचने के लिए पोलीस की कोठडी से ज्यादा सुरक्षित कोई और जगह नहीं, हा डायलॉग हिंदी चित्रपटात सर्रासपणे वापरला जातो, प्रत्यक्षात मात्र त्याच्या विपरीत परिस्थिती बनत असल्याचे चित्र आहे. गेल्या ७ वर्षांत राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांतील विविध कोठडींत तब्बल २२४ जणांचा मृत्यू झाला आहे. दरवर्षी त्याचे प्रमाण वाढत राहिले असून, सरलेल्या वर्षात सर्वाधिक ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तपासावेळी आलेल्या दबावामुळे कुणी रक्तदाब वाढल्याने, कोणी हृदयविकाराच्या धक्क्याने तर बहुतांश जण जुन्या व्याधीमुळे मृत्युमुखी पडले आहेत. मात्र खाकी वर्दीवाल्याच्या ताब्यात असताना आयुष्याची अंतिम घटका मोजल्याने त्याचे खापर खात्यावर फ ोडले जात आहे. अशा मृत्यूच्या वाढत्या आलेखामुळे पोलीस कोठडी आहे की मृत्यूचे सापळे, असा प्रश्न मानवाधिकार संघटनांकडून विचारला जात आहे़ विविध गुन्ह्यांप्रकरणी तपासकामासाठी आणलेले संशयित आरोपी किंवा गुन्ह्यांसंबंधी व्यक्तींच्या नातेवाइकांचा मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे़ न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या मृत्यूच्या प्रकरणांचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) केला जात आहे. मात्र अद्यापही बहुतांश प्रकरणांचा तपास पूर्ण झाला नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला गुन्ह्याबाबत तपासासाठी अटक केली अथवा ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याशी करावयाच्या वर्तणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मानवी हक्काबाबत मार्गदर्शक तत्त्वे घालून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. २४ तासांच्या आत वैद्यकीय चाचणी करून न्यायालयात हजर करणे, संशयित किंवा आरोपीच्या नातेवाइकांना कळविणे आदीबाबतची कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केली जात असली, तरी अनेक वेळा सराईत गुन्हेगाराकडून माहिती काढून घेण्यासाठी ‘थर्ड डिग्री’चा वापर केला जातो. पोलिसांच्या मारहाणीमुळे तर काहीवेळा बदनामीच्या भीतीने अनेकांना धक्का बसून कोठडीत मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत राहिली आहे़ गेल्या सात वर्षांमध्ये पोलीस कोठडीत एकूण २२४ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये व अधीक्षक कार्यालयांच्या हद्दीतील पोलीस कोठडीत घडणाऱ्या मृत्यूचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या प्रकरणाची माहिती दिल्लीतील राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राज्य सरकार व पोलीस महासंचालकांकडे पाठविली जाते. याप्रकरणी नागरी हक्क व संरक्षण विभागाचे अपर महासंचालक समन्वय अधिकारी म्हणून काम पाहिले जाते. मात्र गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोठडीतील मृत्यूंबाबतची बहुतांश प्रकरणे अद्याप तपासात रखडलेली आहेत. अपुरे मनुष्यबळ व अन्य कामामुळे याबाबत तपास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.