शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

पोलीस उपनिरीक्षकाची भामटे‘गिरी’

By admin | Updated: September 13, 2014 02:37 IST

अनेक मुलींना गंडा घालत त्यांची फसवणूक करणारा सहाय्यक पोलीस निरीक्षकच लखोबा लोखंडे निघाला असून, त्याने तीन महिलांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारल्याची माहिती ‘लोकमत’ च्या हाती आली

लक्ष्मण मोरे, पुणेअनेक मुलींना गंडा घालत त्यांची फसवणूक करणारा सहाय्यक पोलीस निरीक्षकच लखोबा लोखंडे निघाला असून, त्याने तीन महिलांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारल्याची माहिती ‘लोकमत’ च्या हाती आली आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम केलेल्या आणि अंगावरील गणवेशाच्या ‘ताकदी’ची जाणिव झालेल्या या बहाद्दराने तीन तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या कुटुंबियांकडून त्याने लाखो रुपये, सोने नाणे आणि वाहने खरेदी करुन घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. महिलांनी समोर येऊन तक्रार देऊनही अद्याप या उपनिरीक्षकाला पोलिसांनी अटक केलेली नाही. गजानन आनंद गिरी (मूळ रा. सावरखेडा, जि. हिंगोली) असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. गिरी हा २०११-१२ मध्ये पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून भरती झाला होता. २०१३ मध्ये फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये नेमणुकीस असताना त्याचे काजल कैलास गिरी या तरुणीशी लग्न ठरले होते. आपण स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत असल्याचे कारण देत त्याने लग्न साधेपणाने करण्याची अट घातली होती. त्यानुसार काजलच्या कुटुंबियांनी आळंदी येथे २२ जानेवारी २०१४ रोजी त्यांचे लग्न लावून दिले. त्यावेळी त्याने साडेपाच लाख रुपये हुंडा, ८ तोळ्याचे सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतर अवघ्या दहा दिवसांनंतरच त्याने काजलला मारहाण सुरु केली. आळंदीमध्ये लग्न लावून दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत त्याने पुन्हा दुसऱ्यांदा थाटामाटात लग्न लावून देण्याचा आग्रह धरला. याला पत्नीने विरोध केल्यावर त्याने पुन्हा मारहाण सुरु केली. काजलने ही बाब माहेरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनीही गिरी याला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने आग्रह सोडला नाही. अखेर २२ फेब्रुवारी रोजी दुसऱ्यांदा थाटामाटात लग्न लावून दिले. त्यावेळी गिरी याने हुंड्यामध्ये बुलेट घेतली. लग्नानंतर हिंगोलीला मूळ गावी गेल्यावर आठवडाभरातच त्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी काजलला मारहाण सुरु केली. या त्रासामुळे काजल आजारी पडली. तिला पुन्हा पुण्यात आणून रुग्णालयात दाखल करुन माहेरी सोडण्यात आले. त्यावेळी काजलच्या आईवडीलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने सासऱ्यांनाच धमकी देत नांदवणार नसल्याचे सांगितले.