शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
2
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
3
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
4
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
5
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
6
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
7
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
8
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
9
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
10
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
11
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
12
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
13
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
14
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
15
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
16
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
17
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
18
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
19
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
20
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘मातोश्री’कडे निघालेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 01:00 IST

उस्मानाबादचे खासदार रवी गायकवाड यांना तिकीट नाकारल्याने त्यांचे समर्थक शनिवारी रात्री आंदोलनासाठी ‘मातोश्री’कडे निघाले होते. हे कळल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री त्यांना तुळजापूर येथे रोखून परत पाठविले.

उस्मानाबाद/नवी मुंबई : उस्मानाबादचे खासदार रवी गायकवाड यांना तिकीट नाकारल्याने त्यांचे समर्थक शनिवारी रात्री आंदोलनासाठी ‘मातोश्री’कडे निघाले होते. हे कळल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री त्यांना तुळजापूर येथे रोखून परत पाठविले.रवी गायकवाड यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी शनिवारी उमरगा येथे मेळावा घेतला. त्यात ठरल्याप्रमाणे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हे आपले राजीनामे देण्यासाठी व आंदोलनासाठी शनिवारी रात्री मुंबईकडे निघाले होते. दरम्यान, बसमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी तुळजापूर येथे पहाटे १ वाजण्याच्या सुमारास या समर्थकांच्या बसेस अडवून त्यांना रोखण्यात आले. यानंतर त्यांना नोटीस बजावून परत पाठविले. या नोटीसीत सकाळी ८ वाजेपुर्वी गाव सोडू नये, असेही निर्देशित केले होते. मात्र तरीही रातोरात इतर वाहनांची सोय करून अनेकजण मुंबईच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, समर्थकांच्या काही बसेस मुंबई जवळील वाशी टोलनाक्यानजिकही अडविण्यात आल्या होत्या़ तेथूनही निसटलेल्या समर्थकांना दादर पोलिसांनी ‘मातोश्री’कडे जाण्यापासून रोखले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले़

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक