शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

‘मातोश्री’कडे निघालेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 01:00 IST

उस्मानाबादचे खासदार रवी गायकवाड यांना तिकीट नाकारल्याने त्यांचे समर्थक शनिवारी रात्री आंदोलनासाठी ‘मातोश्री’कडे निघाले होते. हे कळल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री त्यांना तुळजापूर येथे रोखून परत पाठविले.

उस्मानाबाद/नवी मुंबई : उस्मानाबादचे खासदार रवी गायकवाड यांना तिकीट नाकारल्याने त्यांचे समर्थक शनिवारी रात्री आंदोलनासाठी ‘मातोश्री’कडे निघाले होते. हे कळल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री त्यांना तुळजापूर येथे रोखून परत पाठविले.रवी गायकवाड यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी शनिवारी उमरगा येथे मेळावा घेतला. त्यात ठरल्याप्रमाणे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हे आपले राजीनामे देण्यासाठी व आंदोलनासाठी शनिवारी रात्री मुंबईकडे निघाले होते. दरम्यान, बसमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी तुळजापूर येथे पहाटे १ वाजण्याच्या सुमारास या समर्थकांच्या बसेस अडवून त्यांना रोखण्यात आले. यानंतर त्यांना नोटीस बजावून परत पाठविले. या नोटीसीत सकाळी ८ वाजेपुर्वी गाव सोडू नये, असेही निर्देशित केले होते. मात्र तरीही रातोरात इतर वाहनांची सोय करून अनेकजण मुंबईच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, समर्थकांच्या काही बसेस मुंबई जवळील वाशी टोलनाक्यानजिकही अडविण्यात आल्या होत्या़ तेथूनही निसटलेल्या समर्थकांना दादर पोलिसांनी ‘मातोश्री’कडे जाण्यापासून रोखले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले़

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक