शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

'त्या' विधानामुळे मुख्यमंत्री, आठवलेंविरोधात पोलीस तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 22:05 IST

अ‍ॅड. संजय वानखडे यांच्याकडून तक्रार दाखल

अमरावती : पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी अपमानास्पद भाष्य केले. या वक्तव्यामुळे मातंग समाजाच्या भावना दुखावल्या. त्यामुळे केंद्रीय मंत्री आठवलेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी तक्रार अ‍ॅड. संजय वानखडे यांनी रविवारी सायंकाळी फ्रेजरपुरा पोलिसांत केली. ३ जुलै रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आठवले यांनी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या गीताचा अपभ्रंश करून म्हटले की, 'माझी मैना गावाकड राहिली, म्हणून मी मुंबईकडे दुसरी पाहिली'. आठवले यांच्या या व्यक्तव्यामुळे मातंग समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आठवलेंच्या या व्यक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांचे हे शब्द शांतता व सुव्यवस्था बिघडवू शकतात. त्यांनी शासकीय कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांचा अपमान केला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. सोबतच पिंपरी चिंचवड येथील महापालिका प्रशासनही जबाबदार आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९५(अ), ५०४, १२०(ब) व अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचे कलम ३(१), (यू), (व्ही) नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाची तक्रार मानवहित लोकशाही पक्षाचे विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड. संजय वानखडे यांनी फ्रेजरपुरा पोलिसांत दिली आहे. याबद्दलची तक्रार मिळाली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाईची दिशा ठरेल, असे ठाणेदार पंजाब वंजारी यांनी सांगितले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRamdas Athawaleरामदास आठवले