शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

झाडे तोडणाऱ्यांवर पोलीस कारवाई करा - सयाजी शिंदे मित्रपरिवाराचे आंदोलन

By admin | Updated: January 18, 2017 09:43 IST

गेले आठ महिने जपलेल्या वृक्षांची कत्तल होऊन २४ तास उलटल्यानंतरही पोलिसांनी पंचनामा केला नसून आरोपीच्या ताबडतोब मुसक्या आवळाव्यात अशी मागणी अभिनेता सयाजी शिंदे यांच्यातर्फे करण्यात आली.

ऑनलाइ लोकमत
मुंबई, दि. १८ -  लहान मुलांप्रमाणे काळजी घेत गेली आठ महिने जपलेल्या वृक्षांची कत्तल होऊन २४ तास उलटले, पण पोलिसांनी साधा पंचनामा करण्याचेही सौजन्य दाखविले नाही. एवढेच नव्हे तर थातूरमातूर कारवाईचा देखावा निर्माण करून केवळ अदखलपात्र गुन्हा (एन.सी) दाखल केला आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल करून आरोपींच्या मुसक्या ताबडतोब आवळाव्यात, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन आयोजित करण्याचा निर्णय 'चार गाव जलयुक्त शिवार अभियानातील' (पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसेवाडी व दिवडी, ता. माण, जि. सातारा) ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी घेतला आहे. या आंदोलनात सयाजी शिंदे मित्र परिवाराचे सदस्यही सहभागी होतील.
 
राज्यातील वृक्षप्रेमी, जलसंधारण चळवळीतील कार्यक्रते यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वृक्षतोडीच्या निषेधार्थ चार गावच्या मुंबईतील ग्रामस्थांनी काल रात्री (मंगळवारी) तातडीची बैठक आयोजित केली होती. वृक्षतोडीच्या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतानाच पोलिसांची कार्यवाही अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. हे घृणास्पद कृत्य करणारया गुन्हेगाराला तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
 
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकाराने चार गावांत १५ हजार पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत. पांढरवाडी येथे साधारण ६ फुट उंचीची १०० झाडे जून २०१६ मध्ये रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली होती. यात वड, पिंपळ, उंबर, महागुणी, बदाम, कडूलिंब, साग इत्यादी वृक्षांचा समावेश होता. ग्रामस्थ व शाळकरी मुलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे गेली आठ महिने या झाडांची देखभाल केली. स्वत: सयाजी शिंदे आणि त्यांच्या मित्रपरिवाराचे या झाडांवर लक्ष होते. झाडांना वेळेवर पाणी घालणे, तण काढणे, आळी करणे अशी देखभाल नियमितपणे केली जात होती. कोवळी शाळकरी मुले तर डोक्यावर हंडा घेऊन झाडांना पाणी घालत असायची. 
 
सर्वांच्या मेहनतीने ही झाडे चांगली बहरली होती. गावात प्रवेश करतानाच ही झाडे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घ्यायची. पण काही विकृत मनोवृत्तीच्या नतद्रष्टाने यांतील ५० झाडे मध्यरात्री तोडून टाकली. अक्षरश: कुऱ्हाडीने घाव घातलेली झाडे उन्मळून पडलेल्या अवस्थेत पाहताना गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर राज्यभरातील वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
 
पण दहिवडी पोलीस ठाण्याला हा प्रकार गंभीर वाटत नाही. आतापर्यंत आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना तुरूंगाची हवा दाखवायला हवी होती. ज्या हातांनी झाडे तोडली त्या हातात बेड्या पडायला हव्या होत्या. पण पोलिसांनी अतिशय नेभळट भूमिका घेऊन आपल्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडविले आहे.
ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी अद्याप पंचनामा सुद्धा केला नाही. साधा मोबाईल चोरिला गेला तरी एफआयआर दाखल होतो, मात्र अत्यंत नियोजनबद्धपणे झाडांची कत्तल करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी साधी एन.सी. दाखल केली आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी
जलयुक्त शिवार अभियानाच्या चळवळीअंतर्गत ही झाडे लावली होती. या चार गावांतील लोकांनी अभुतपूर्व अशी एकजूट करून महाराष्ट्रात आदर्शवत ठरतील अशी कामे केली आहेत. पण अशा सामाजिक कार्यात अडथळे आणणाऱ्या समाजकंटकांवर पोलीस काहीच कारवाई करणार नसतील तर चांगल्या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचले जाईल. चार गाव जलयुक्त शिवार अभियानातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असे आवाहन केले आहे.