शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

विषबाधा विदर्भात, उपाययोजना मराठवाड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 05:15 IST

फवारणीतून विषबाधेचे मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात होत आहे. मात्र सरकार उपाययोजना मराठवाड्यात करीत असल्याने ‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’ असा प्रकार सुरू झाला आहे.

- रूपेश उत्तरवारयवतमाळ -  फवारणीतून विषबाधेचे मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात होत आहे. मात्र सरकार उपाययोजना मराठवाड्यात करीत असल्याने ‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’ असा प्रकार सुरू झाला आहे.गेल्यावर्षी फवारणीतून विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात २२ शेतकरी, मजुरांचे बळी गेले. ९०० जणांना विषबाधेचा सामना करावा लागला. यावर मात करण्यासाठी ड्रोनच्या मदतीने फवारणी करण्याचा प्रयोग हाती घेण्यात आला. यामुळे छोट्या क्षेत्रातही फवारणी करणे सहज सोपे होणार आहे. त्याची चाचपणी करण्यासाठी अकोला कृषी विद्यापीठाच्या क्षेत्रात चाचणी घेण्यात आली. यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात फवारणी करण्याचा प्रयोग इतर जिल्ह्यात होणार आहे. त्याकरिता मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्याला दृष्टीआड करण्यात आले आहे.साधारणत: विदेशात मोठ्या क्षेत्रावर ड्रोनच्या मदतीने फवारणी केली जाते. ही फवारणी करताना छोट्या भौगोलीक क्षेत्राचा वापर केला, तर प्रयोग यशस्वी होईल की नाही, यासाठी विद्यापीठाने ‘स्प्रेर्इंग डेमो’ केला. यात ड्रोनवर कार्यक्षेत्र निश्चित करूण ठरावीक ठिकाणी फवारणीचा प्रयोग घेण्यात आला. पिकांपासून एक ते दीड फूट उंचीवर ड्रोनचे अंतर निश्चित करायचे. नंतर औषधाची फवारणी करायची आहे. यामुळे शेतकरी आणि शेतमजूर सुरक्षित राहणार आहे.ज्या भागामध्ये विषबाधा झाली, त्या भागात ड्रोनच्या मदतीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना प्रत्यक्षात काय अडचणी येतात, याची चाचपणी करण्यासाठी गुरूवारी अकोल्यात प्रात्याक्षिक घेण्यात आले. येत्या सोमवारी लातूरमध्ये प्रात्यक्षिक होणार आहे. मात्र ज्या यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक विषबाधा झाल्या, त्याच जिल्ह्याला यातून वगळण्यात आले आहे. सर्वसामान्य शेतकºयांना ड्रोन खरेदी करणे परवडेल काय, हा मुळात मोठा गंभीर प्रश्न आहे. त्याला पर्याय म्हणून सामूहिक शेती अथवा अनुदानावर ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले, तर शेतकºयांना आधुनिक पद्धतीने शेती करणे सुलभ होणार आहे.आधी कृषी विद्यालय पळविले, आता प्रयोगहीयवतमाळकरिता मंजूर झालेले कृषी विद्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जन्मगावी पळविले. ही घटना ताजी असताना आता विषबाधेने सर्वाधिक मृत्यू झालेल्या जिल्ह्यातून हा प्रयोगही पळविण्यात आला. वास्तविक यवतमाळ जिल्ह्यातील विषबाधीत गावांमध्येच हा प्रयोग होणे अपेक्षित होते. त्यामुळे शेतकरी, मजुरांची धास्ती कमी झाली असती. मात्र या गावांमध्ये हा प्रयोग न करता विद्यापीठ आणि राजकीय वजन असलेल्या जिल्ह्यात त्याची चाचणी दाखविली जात आहे.डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळापुढे येणार प्रस्तावड्रोनच्या मदतीने यशस्वीरित्या फवारणी करता येते. ही बाब स्पष्ट झाल्यानंतर येत्या डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळापुढे हा विषय येणार आहे. त्यावर सरकार काय निर्णय घेते, याकडे यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यावरूनच कृषी क्षेत्रातील पुढील धोरण निश्चित होणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीnewsबातम्या