शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधा विदर्भात, उपाययोजना मराठवाड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 05:15 IST

फवारणीतून विषबाधेचे मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात होत आहे. मात्र सरकार उपाययोजना मराठवाड्यात करीत असल्याने ‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’ असा प्रकार सुरू झाला आहे.

- रूपेश उत्तरवारयवतमाळ -  फवारणीतून विषबाधेचे मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात होत आहे. मात्र सरकार उपाययोजना मराठवाड्यात करीत असल्याने ‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’ असा प्रकार सुरू झाला आहे.गेल्यावर्षी फवारणीतून विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात २२ शेतकरी, मजुरांचे बळी गेले. ९०० जणांना विषबाधेचा सामना करावा लागला. यावर मात करण्यासाठी ड्रोनच्या मदतीने फवारणी करण्याचा प्रयोग हाती घेण्यात आला. यामुळे छोट्या क्षेत्रातही फवारणी करणे सहज सोपे होणार आहे. त्याची चाचपणी करण्यासाठी अकोला कृषी विद्यापीठाच्या क्षेत्रात चाचणी घेण्यात आली. यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात फवारणी करण्याचा प्रयोग इतर जिल्ह्यात होणार आहे. त्याकरिता मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्याला दृष्टीआड करण्यात आले आहे.साधारणत: विदेशात मोठ्या क्षेत्रावर ड्रोनच्या मदतीने फवारणी केली जाते. ही फवारणी करताना छोट्या भौगोलीक क्षेत्राचा वापर केला, तर प्रयोग यशस्वी होईल की नाही, यासाठी विद्यापीठाने ‘स्प्रेर्इंग डेमो’ केला. यात ड्रोनवर कार्यक्षेत्र निश्चित करूण ठरावीक ठिकाणी फवारणीचा प्रयोग घेण्यात आला. पिकांपासून एक ते दीड फूट उंचीवर ड्रोनचे अंतर निश्चित करायचे. नंतर औषधाची फवारणी करायची आहे. यामुळे शेतकरी आणि शेतमजूर सुरक्षित राहणार आहे.ज्या भागामध्ये विषबाधा झाली, त्या भागात ड्रोनच्या मदतीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना प्रत्यक्षात काय अडचणी येतात, याची चाचपणी करण्यासाठी गुरूवारी अकोल्यात प्रात्याक्षिक घेण्यात आले. येत्या सोमवारी लातूरमध्ये प्रात्यक्षिक होणार आहे. मात्र ज्या यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक विषबाधा झाल्या, त्याच जिल्ह्याला यातून वगळण्यात आले आहे. सर्वसामान्य शेतकºयांना ड्रोन खरेदी करणे परवडेल काय, हा मुळात मोठा गंभीर प्रश्न आहे. त्याला पर्याय म्हणून सामूहिक शेती अथवा अनुदानावर ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले, तर शेतकºयांना आधुनिक पद्धतीने शेती करणे सुलभ होणार आहे.आधी कृषी विद्यालय पळविले, आता प्रयोगहीयवतमाळकरिता मंजूर झालेले कृषी विद्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जन्मगावी पळविले. ही घटना ताजी असताना आता विषबाधेने सर्वाधिक मृत्यू झालेल्या जिल्ह्यातून हा प्रयोगही पळविण्यात आला. वास्तविक यवतमाळ जिल्ह्यातील विषबाधीत गावांमध्येच हा प्रयोग होणे अपेक्षित होते. त्यामुळे शेतकरी, मजुरांची धास्ती कमी झाली असती. मात्र या गावांमध्ये हा प्रयोग न करता विद्यापीठ आणि राजकीय वजन असलेल्या जिल्ह्यात त्याची चाचणी दाखविली जात आहे.डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळापुढे येणार प्रस्तावड्रोनच्या मदतीने यशस्वीरित्या फवारणी करता येते. ही बाब स्पष्ट झाल्यानंतर येत्या डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळापुढे हा विषय येणार आहे. त्यावर सरकार काय निर्णय घेते, याकडे यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यावरूनच कृषी क्षेत्रातील पुढील धोरण निश्चित होणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीnewsबातम्या