शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

विषबाधा विदर्भात, उपाययोजना मराठवाड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 05:15 IST

फवारणीतून विषबाधेचे मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात होत आहे. मात्र सरकार उपाययोजना मराठवाड्यात करीत असल्याने ‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’ असा प्रकार सुरू झाला आहे.

- रूपेश उत्तरवारयवतमाळ -  फवारणीतून विषबाधेचे मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात होत आहे. मात्र सरकार उपाययोजना मराठवाड्यात करीत असल्याने ‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’ असा प्रकार सुरू झाला आहे.गेल्यावर्षी फवारणीतून विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात २२ शेतकरी, मजुरांचे बळी गेले. ९०० जणांना विषबाधेचा सामना करावा लागला. यावर मात करण्यासाठी ड्रोनच्या मदतीने फवारणी करण्याचा प्रयोग हाती घेण्यात आला. यामुळे छोट्या क्षेत्रातही फवारणी करणे सहज सोपे होणार आहे. त्याची चाचपणी करण्यासाठी अकोला कृषी विद्यापीठाच्या क्षेत्रात चाचणी घेण्यात आली. यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात फवारणी करण्याचा प्रयोग इतर जिल्ह्यात होणार आहे. त्याकरिता मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्याला दृष्टीआड करण्यात आले आहे.साधारणत: विदेशात मोठ्या क्षेत्रावर ड्रोनच्या मदतीने फवारणी केली जाते. ही फवारणी करताना छोट्या भौगोलीक क्षेत्राचा वापर केला, तर प्रयोग यशस्वी होईल की नाही, यासाठी विद्यापीठाने ‘स्प्रेर्इंग डेमो’ केला. यात ड्रोनवर कार्यक्षेत्र निश्चित करूण ठरावीक ठिकाणी फवारणीचा प्रयोग घेण्यात आला. पिकांपासून एक ते दीड फूट उंचीवर ड्रोनचे अंतर निश्चित करायचे. नंतर औषधाची फवारणी करायची आहे. यामुळे शेतकरी आणि शेतमजूर सुरक्षित राहणार आहे.ज्या भागामध्ये विषबाधा झाली, त्या भागात ड्रोनच्या मदतीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना प्रत्यक्षात काय अडचणी येतात, याची चाचपणी करण्यासाठी गुरूवारी अकोल्यात प्रात्याक्षिक घेण्यात आले. येत्या सोमवारी लातूरमध्ये प्रात्यक्षिक होणार आहे. मात्र ज्या यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक विषबाधा झाल्या, त्याच जिल्ह्याला यातून वगळण्यात आले आहे. सर्वसामान्य शेतकºयांना ड्रोन खरेदी करणे परवडेल काय, हा मुळात मोठा गंभीर प्रश्न आहे. त्याला पर्याय म्हणून सामूहिक शेती अथवा अनुदानावर ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले, तर शेतकºयांना आधुनिक पद्धतीने शेती करणे सुलभ होणार आहे.आधी कृषी विद्यालय पळविले, आता प्रयोगहीयवतमाळकरिता मंजूर झालेले कृषी विद्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जन्मगावी पळविले. ही घटना ताजी असताना आता विषबाधेने सर्वाधिक मृत्यू झालेल्या जिल्ह्यातून हा प्रयोगही पळविण्यात आला. वास्तविक यवतमाळ जिल्ह्यातील विषबाधीत गावांमध्येच हा प्रयोग होणे अपेक्षित होते. त्यामुळे शेतकरी, मजुरांची धास्ती कमी झाली असती. मात्र या गावांमध्ये हा प्रयोग न करता विद्यापीठ आणि राजकीय वजन असलेल्या जिल्ह्यात त्याची चाचणी दाखविली जात आहे.डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळापुढे येणार प्रस्तावड्रोनच्या मदतीने यशस्वीरित्या फवारणी करता येते. ही बाब स्पष्ट झाल्यानंतर येत्या डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळापुढे हा विषय येणार आहे. त्यावर सरकार काय निर्णय घेते, याकडे यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यावरूनच कृषी क्षेत्रातील पुढील धोरण निश्चित होणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीnewsबातम्या