शहरं
Join us  
Trending Stories
1
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
2
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
3
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
4
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
5
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
6
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
7
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
8
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
9
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
10
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
11
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
12
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
13
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
14
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
15
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
16
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
17
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
18
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
19
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
20
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी

कविवर्य शंकर वैद्य यांचे निधन

By admin | Updated: September 23, 2014 12:50 IST

स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला या अजरामर शब्दरचनेतून रसिकांवर छाप पाडणारे कविवर्य शंकर वैद्य यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २३ - कालस्वर, दर्शन या कवितासंग्रहांमधून मराठी रसिकांच्या मनात स्थान पटकावणारे कविवर्य शंकर वैद्य यांचे मंगळवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. दादरमधील सुश्रुषा रुग्णालयात वैद्य यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी १२ वाजता वैद्य यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहे. वैद्य यांच्या निधनामुळे काव्य जगत पोरके झाले असल्याची भावना व्यक्त होत आहे. 

जुन्नर तालुक्यातील ओतूर गावात १५ जून १९२८ रोजी शंकर वैद्य यांचा जन्म झाला. निसर्गरम्य वातावरणात वैद्य यांचे बालपण गेल्याने त्यांच्या कवितांमधूनही निसर्गप्रेम दिसून यायचे. यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी वैद्य जुन्नरमध्ये आले. कौतुकाची थाप म्हणून वैद्य यांना एक कविता संग्रह देण्यात आला व यानंतर वैद्य यांची पावले साहित्याकडे वळली. आला क्षण, गेला क्षण हा वैद्य यांचा पहिला कथासंग्रह. मात्र हा कथासंग्रह काहीसा दुर्लक्षितच राहिला.
वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून बीए व एम.ए केले. त्यानंतर  त्यांनी सात वर्षे नोकरीही केली. मात्र या काळातही त्यांचे कविता लेखन सुरुच होते. कालस्वर व दर्शन हे त्यांचे काव्यसंग्रह चांगलेच गाजले. वैद्य यांनी रेडिओवरुन कवितावाचनही केले व त्यांचा हा कार्यक्रम रसिकांनाही चांगलाच भावला होता. काव्यसमीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई, पालखीत कोण? आम्हां पुसायचे नाही, आई दिसली, उभी उंच सरस्वती या अशा दर्जेदार शब्दरचनांमधून वैद्य यांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवले. गेल्या काही वर्षांपासून वैद्य आजारी होते. अखेर मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल कवी महेश केळुस्कर, अशोक नायगावकर यांनी शोक व्यक्त केला आहे.