शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

चैतन्यानं लदबदलेलं झाड सुकलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 09:44 IST

त्यांचे ते पायजमा-शर्टमधील भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि शेती-मातीतील कविता ऐकल्याने भारावून गेलो. आपणही शेती करतो आणि आपलेच सुख-दु:ख त्यात मांडले आहे, हे  जाणवले. त्यावेळी महानोरदादांशी ओळख नव्हती. परंतु, नंतर मी  त्यांना पळसखेडला भेटायला गेलो. आज त्या गोष्टीला चाळीस वर्षे होऊन गेली.

प्रकाश होळकर, कवी -कविता लिहीत नव्हतो, चाचपडत होतो. त्यावेळी महानोरदादांना पहिल्यांदा मी नांदेडला शंकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पाहिले आणि ऐकले. कविसंमेलनात एखादं चैतन्याचं लदबदलेलं झाडच आपण बघतो आहे की काय, अशी अनुभूती मी घेतली. त्यांचे ते पायजमा-शर्टमधील भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि शेती-मातीतील कविता ऐकल्याने भारावून गेलो. आपणही शेती करतो आणि आपलेच सुख-दु:ख त्यात मांडले आहे, हे  जाणवले. त्यावेळी महानोरदादांशी ओळख नव्हती. परंतु, नंतर मी  त्यांना पळसखेडला भेटायला गेलो. आज त्या गोष्टीला चाळीस वर्षे होऊन गेली.

त्यावेळी माझ्या नावावर कवितासंग्रह नव्हता. एखादी कविता ‘अनुष्टुभ’ला प्रसिद्ध झालेली असेल. परंतु, दिवसभर दादा आमच्यासोबत होते. त्यांनी शेतात फिरवले. सीताफळाच्या बागा दाखवल्या. कविता ऐकवल्या. पुस्तके दिली. हा अनुभव माझ्याच बाबतीत नाही, तर नवा कवी कुणीही त्यांच्याकडे गेला की, ते मार्गदर्शन करीत असत. त्याला कवितांचे संदर्भ, उदाहरणे देत असत. हजारो कविता त्यांना मुखोद्गत होत्या.

दादा प्रत्येकावर भरभरून प्रेम करायचे. माझ्या प्रत्येक सुख-दु:खात ते सोबत असायचे. छोटी-छोटी संमेलने व्हावीत, हा त्यांचा  आग्रह असायचा. छोट्या संमेलनांमध्ये खऱ्या अर्थाने विचारांचे आदान-प्रदान होते, असे ते म्हणायचे. खेडेगावातून  अस्सल कविता उदयाला येते, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.   

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Songsमराठी गाणी