शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

चैतन्यानं लदबदलेलं झाड सुकलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 09:44 IST

त्यांचे ते पायजमा-शर्टमधील भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि शेती-मातीतील कविता ऐकल्याने भारावून गेलो. आपणही शेती करतो आणि आपलेच सुख-दु:ख त्यात मांडले आहे, हे  जाणवले. त्यावेळी महानोरदादांशी ओळख नव्हती. परंतु, नंतर मी  त्यांना पळसखेडला भेटायला गेलो. आज त्या गोष्टीला चाळीस वर्षे होऊन गेली.

प्रकाश होळकर, कवी -कविता लिहीत नव्हतो, चाचपडत होतो. त्यावेळी महानोरदादांना पहिल्यांदा मी नांदेडला शंकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पाहिले आणि ऐकले. कविसंमेलनात एखादं चैतन्याचं लदबदलेलं झाडच आपण बघतो आहे की काय, अशी अनुभूती मी घेतली. त्यांचे ते पायजमा-शर्टमधील भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि शेती-मातीतील कविता ऐकल्याने भारावून गेलो. आपणही शेती करतो आणि आपलेच सुख-दु:ख त्यात मांडले आहे, हे  जाणवले. त्यावेळी महानोरदादांशी ओळख नव्हती. परंतु, नंतर मी  त्यांना पळसखेडला भेटायला गेलो. आज त्या गोष्टीला चाळीस वर्षे होऊन गेली.

त्यावेळी माझ्या नावावर कवितासंग्रह नव्हता. एखादी कविता ‘अनुष्टुभ’ला प्रसिद्ध झालेली असेल. परंतु, दिवसभर दादा आमच्यासोबत होते. त्यांनी शेतात फिरवले. सीताफळाच्या बागा दाखवल्या. कविता ऐकवल्या. पुस्तके दिली. हा अनुभव माझ्याच बाबतीत नाही, तर नवा कवी कुणीही त्यांच्याकडे गेला की, ते मार्गदर्शन करीत असत. त्याला कवितांचे संदर्भ, उदाहरणे देत असत. हजारो कविता त्यांना मुखोद्गत होत्या.

दादा प्रत्येकावर भरभरून प्रेम करायचे. माझ्या प्रत्येक सुख-दु:खात ते सोबत असायचे. छोटी-छोटी संमेलने व्हावीत, हा त्यांचा  आग्रह असायचा. छोट्या संमेलनांमध्ये खऱ्या अर्थाने विचारांचे आदान-प्रदान होते, असे ते म्हणायचे. खेडेगावातून  अस्सल कविता उदयाला येते, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.   

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Songsमराठी गाणी