शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 16:24 IST

'2014 मध्ये सुमारे 100 सिंचन प्रकल्प अनेक दशकांपासून प्रलंबित होते, त्यापैकी 26 प्रकल्प एकट्या महाराष्ट्रातील होते. काँग्रेसने महाराष्ट्राचा किती मोठा विश्वासघात केला, याची कल्पना करा.'

PM Modi in Maharashtra: लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले असून, आता तिसऱ्या मतासाठी निवडणूक प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असून, आज त्यांनी माढा, लातूर, धारिशिव येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरादर हल्लाबोल केला. गेल्या 10 वर्षात मी माझ्या शरीराचा प्रत्येक कण आणि माझा प्रत्येक क्षण तुमच्या सेवेत वापरला, असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणतात, देशात 10 वर्षांपूर्वी रिमोट कंट्रोलचे सरकार असताना महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते कृषीमंत्री होते. ते बलाढ्य नेते दिल्लीवर राज्य करायचे, तेव्हा उसाची एफआरपी 200 रुपयांच्या आसपास होती. आज भाजप सरकारच्या काळात उसाची एफआरपी 350 रुपयांच्या आसपास आहे. आज देशातील आणि महाराष्ट्रातील जनता मोदी सरकारची 10 वर्षे आणि काँग्रेस सरकारची 60 वर्षे, यातील फरक पाहत आहे. जे काँग्रेस 60 वर्षात करू शकले नाही, ते आम्ही 10 वर्षात करुन दाखवले. 

महाराष्ट्रातील लोक जेव्हा प्रेम आणि आशीर्वाद देतात, तेव्हा ते कोणतीही कसर सोडत नाहीत. पण जेव्हा कोणी दिलेले आश्वासन पूर्ण करत नाही, तेव्हा महाराष्ट्रातील जनता ते लक्षात ठेवते आणि वेळ आल्यावर हिशोबही करते. 15 वर्षांपूर्वी एक मोठा नेता येथे निवडणूक लढवण्यासाठी आला होता. त्यांनी मावळत्या उन्हात दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवण्याची शपथ घेतली होती, पण त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. 

2014 मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर मी माझी संपूर्ण शक्ती या सिंचन प्रकल्पांवर केंद्रित केली. काँग्रेसचे प्रलंबित असलेले 100 पैकी 63 प्रकल्प आम्ही पूर्ण केले. प्रत्येक शेतात आणि प्रत्येक घरात पाणी पोहोचवणे हे माझ्या आयुष्यातील एक मोठे ध्येय आहे. विदर्भ असो किंवा मराठवाडा...पाण्याच्या थेंबासाठी लोक वर्षानुवर्षे त्रासले होते. देशाने काँग्रेसला 60 वर्षे देशावर राज्य करण्याची संधी दिली. या 60 वर्षांत जगातील अनेक देश पूर्णपणे बदलले, पण काँग्रेसला शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवता आले नाही. 2014 मध्ये सुमारे 100 सिंचन प्रकल्प अनेक दशकांपासून प्रलंबित होते, त्यापैकी 26 प्रकल्प एकट्या महाराष्ट्रातील होते. काँग्रेसने महाराष्ट्राचा किती मोठा विश्वासघात केला, याची कल्पना करा.

काँग्रेसच्या राजवटीत रोज सकाळी वर्तमानपत्रात नवीन घोटाळा उघड व्हायचा. कोलगेट घोटाळा, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा, 2-जी घोटाळा...पण आज बातम्या येतात, इथे इतके करोडो रुपये पकडले गेले... तिकडे इतके करोडो रुपये पकडले गेले, नोटांचे बंडले सापडले. काँग्रेसने आपल्या राजवटीत भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. पण, आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनला आहे. काँग्रेसच्या राजघराण्याने आपल्या मुलांसाठी कोणता वारसा सोडला? पैसा...देशातील प्रमुख ठिकाणी जमिनी...सत्ता आणि विशेषाधिकार... आणि 6 दशकात देशाला कोणता वारसा दिला? तर फक्त गरिबी...अशी टीकाही मोदींनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्सmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीlaturलातूरUsmanabad S Pपोलीस अधीक्षक, उस्मानाबाद